शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

मनरेगाच्या ११ कामांचा समावेश

By admin | Updated: April 20, 2017 04:04 IST

जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना राबवण्यात येत आहे

ठाणे : जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना राबवण्यात येत आहे. मात्र, या योजनेत नवीन कामांचा समावेश न करता महात्मा गांधी म्हणजे ‘मनरेगा’च्या ११ कामांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. या कामांव्दारे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा मानस ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी व्यक्त केला. येथील एनकेटी सभागृहात मंगळवारी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची कार्यशाळा आयोजिली असता तिच्या उद्घाटनाप्रसंगी भीमनवार बोलत होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे.पावसाळा सुरु होण्यापूर्वी मनरेगाची कामे झपाट्याने करण्याचा मानस व्यक्त करून जिओ टॅगिंग किंवा आधार संलग्नता अशा तंत्रज्ञानातून रोहयोची कामे अधिक परिणामकारक करणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करते वेळी स्पष्ट केले. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत मनरेगाच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाची ११ कामे प्रामुख्याने हाती घेण्यात आली आहेत. यातअहिल्यादेवी सिंचन विहिरीची ५०० कामे करण्यात येणार आहेत. अमृतकुंड शेततळे एक हजार २००, भू संजीवनी व्हर्मी कंपोस्टचे ५११, भू संजीवनी नाडेप कंपोस्टचे ४५०, कल्पवृक्ष- फळबागचे १२११ हेक्टरमध्ये लागवड, निर्मल शौचालये २३०० हेक्टरमध्ये, शोषखड्डे ४५०, अंकुर रोपवाटिकांमध्ये १६ लाख रोपे, समृद्ध गाव तलाव ४००, तर एक लाख ६० हजार वृक्ष लागवड आणि ग्राम सबलीकरणाची १८०० कामे या समृध्द करण्यात येणार आहेत. दोन टप्यात पार पडलेल्या या कार्यशाळेत रोहयोचे उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे, कैलास मोरे, सनी धात्रक आदी रोहयोविषयक तज्ञ व्याख्यात्यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी २०१६- १७ च्या कामांचा आढावा देखील घेण्यात आला. शासनाने दिलेल्या उद्दीष्टापेक्षा १५४ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शासनाने तीन लाख मनुष्य दिन निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, त्यापेक्षा अधिक म्हणजे चार लाख ६३ हजार १०४ मनुष्य दिन निर्मिती करण्यात आली. (प्रतिनिधी)