शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख १५ हजार कुटुुंबीय शौचालयाविना

By admin | Updated: September 17, 2014 22:26 IST

जिल्हा परिषद : निर्मल भारत अभियानांचे आव्हान

रत्नागिरी : जिल्ह्यातील १,१५,५७१ कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसल्याचे पाहणी दरम्यान स्पष्ट झाले आहे. ही शौचालये २०२२ पर्यंत बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्मल भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने समोर ठेवले आहे.उघड्यावर शौचास बसणे म्हणजे रोगराईला निमंत्रण देण्याचाच एक भाग आहे. रत्नागिरी जिल्हा निर्मल करतानाच प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे. त्यासाठी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मात्र, सध्या आवश्यक तेवढ्या प्रमाणात जनजागृती होत नसल्याचे दिसून येत आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्हा आरोग्याच्या दृष्टीने फार पुढे आहे. त्यासाठी ग्रामीण भागामध्येही स्वच्छतेला महत्व दिले जाते. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रुपये अनुदान, तर एमआरजीएसमधून १० हजार रुपये अनुदान देण्यात येते.जिल्ह्यातील अनेक गावे निर्मलग्राम झाली आहेत. तरीही अनेक गावांमधील कुटुंबांमध्ये शौचालये नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या अभियानाचा हेतूच धोक्यात आल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील किती कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत, याबाबत निर्मल भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) ३५,२७५ कुटुंबीयांकडे आणि दारिद्र्यरेषेवरील ७४,६७६ कुटुंबीय, एससी - ४५८४, एस. टी. - १०३६ व शौचालय नसल्याचे दिसून येत आहे.जिल्हा रोगमुक्त व्हावा, हा उद्देश समोर ठेवूनच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकडून जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने प्रस्ताव मागविले होते. प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय असणे आवश्यक असले तरी लोकप्रतिनिधींकडून याबाबत योग्य प्रमाणात जनजागृती करण्यात येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागात या योजनेचा आता पुरता बोजवारा उडाला आहे. त्याचा संपूर्ण भार प्रशासकीय यंत्रणेवर पडत आहे. (शहर वार्ताहर)