शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजननासाठी इंजेक्शनचा वापरमत्स्योत्पादन वाढणार :

By admin | Updated: July 25, 2014 22:50 IST

सद्य स्थितीत गरजेचा प्रयोग

रत्नागिरी : गोड्या पाण्यातील माशांना प्रजननासाठी प्रेरित करण्याकरिता चक्क इंजेक्शनचा वापर केला जात आहे. माशांचे बिजोत्पादन व मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी इंजेक्शनचा वापर करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्याला १५७ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मासेमारी प्रामुख्याने समुद्रात होत असली तरी नदीपात्रातील गोड्या पाण्यात मासेमारी केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात त्याचे अल्प आहे. जुलैमध्ये पाऊस झाल्याने नदीपात्र भरली आहेत. नदीपात्रातही अ‍ॅक्वेलिंग प्रक्रिया होते. मासे पावसाचे तुषार झेलण्यासाठी उथळ पात्रात येतात. नदीपात्रात मासे अंडी घालतात. जून ते आॅगस्ट हा माशांच्या प्रजननाचा काळ ओळखला जातो. मात्र, सध्या नद्यांची परिस्थितीही विदारक दिसून येत आहे. काही नद्यांच्या ठिकाणी मगरींचा वावर आहे, तर काही नद्यांमध्ये रेती उत्खनन सुरू असल्याचा प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम बिजोत्पादन व मत्स्योत्पादनावर होत आहे. प्रा. डॉ. हिरालाल चौधरी व डॉ. के. एच. अलिकुन्ही यांनी ओरिसा येथे १० जुलै १९५७ साली कटक माशाला इंजेक्शन देऊन प्रजननासाठी प्रेरित केले. संबंधित प्रयोग यशस्वी झाल्यानंतर १० जुलै ‘राष्ट्रीय मत्स्यदिन’ साजरा करण्यात येऊ लागला. मात्र, डॉ. चौधरी व डॉ. अलिकुन्ही यांचा प्रयोग सध्याच्या स्थितीत गरजेचा बनला आहे. नदीपात्रातील रोहू, कटला, रिगल या माशांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे घटणारे मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी बिजोत्पादन वाढविणे गरजचेचे आहे. रायगड येथे ३ खासगी व ठाणे तलासरी येथे शासकीय एक बिजोत्पादन केंद्र मिळून चार केंद्र आहेत. प्रजननासाठी प्रेरित करणाऱ्या नर व मादी तत्सम् जातीच्या माशांना एका टँकमध्ये सोडले जाते. त्याठिकाणी कृत्रिम तुषार निर्माण करून पावसाळी वातावरण तयार केले जाते. नंतर ‘ओव्हा प्रिम’सारखे इंजेक्शन नर व मादीला देऊन प्रजननासाठी प्रेरित केले जाते. जेणेकरून घटणारे मत्स्योत्पादन, बिजोत्पादन टिकविण्यास मदत होते.बहुतांश नद्या गाळाने भरल्या आहेत. काही नदीपात्र तर संपुष्टात आली आहेत. बहुतांश नद्यांमध्ये मगरींचा वावर दिसून येतो. एकूणच प्रतिकूल परिस्थितीत मत्स्योत्पादन व त्याचे बिजोत्पादन टिकविण्यासाठी इंजेक्शनचा वापर सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बिजोत्पादन केंद्र नसल्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अभ्यासवजा प्रयोग दाखविण्यासाठी जिल्ह्याबाहेर नेले जात आहे. (प्रतिनिधी)घटलेले मत्स्योत्पादन वाढविणे किंवा त्यांचे बीज वाढविणे काळाची गरज आहे. त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या पूर्ण अभ्यास करून इंजेक्शन प्रक्रियेचा अवलंब केला जात आहे. वास्तविक ही पध्दत जुनी व सर्वदृढ आहे. त्यामुळे बीजोत्पादन केंद्रात बीजनिर्मितीसाठी त्याचा वापर केला जात आहे. - प्रा. विजय जोशी, डीन, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी-बिजोत्पादनासाठी नवा पर्याय-गोड्या पाण्यातील मासेमारी वाढण्यासाठी नवा उपाय-रोजगाराची मोठी संधी मिळणार-पावसाळी हंगामात मोठा व्यवसाय उभा करता येणे शक्य-रेती उत्खननाचा बिजोत्पादनावर होणाऱ्या दुष्परिणामांवरही पर्याय-रत्नागिरीत बिजोत्पादन केंद्र नाही, विद्यार्थी प्रशिक्षण बाहेरच