शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
4
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
5
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
6
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
7
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
8
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
9
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
10
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
11
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
12
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
13
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
14
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
15
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
16
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
17
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
18
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
19
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
20
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

चिपीमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार

By admin | Updated: July 10, 2014 23:35 IST

भूसुरूंगामुळे ग्रामस्थ अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची

कुडाळ : अतितीव्रतेमुळे भूसुुरूंग लावल्यामुळे जाब विचारण्यास गेलेल्या परुळे चिपी येथील ग्रामस्थ व चिपी विमानतळाचे अधिकारी यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिपी विमानतळाचे काम युध्द पातळीवर सुरू असून हे काम लवकर होण्याकरिता या ठिकाणी जमीनीमध्ये परवानगी नसतानाही अतितीव्रतेचे भूसुरुंग लावलेले आहेत. त्यामुळे येथील आजूबाजूच्या गावाला भूकंपासारखे हादरे बसतात. येथील घणांना तडे जात आहेत. भिंती पडून राहत्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या ठिंकाणी अतितीव्रतेचे भुसुरुंग लावू नये, याकरिता वेळोवेळी जनतेने आंदोलन केली. परंतु आंदोलने सुरू झाल्यानंतर काही काळ भूसुरुंगांचे काम कमी तीव्रतेचे भुसुरुंग वापरून करण्यात येत असे. परंतु नंतर पुन्हा भुसुरुंग अति तीव्रतेचे वापरण्यात येत असतात. हल्ली गेले काही दिवस सांगूनही या विमानतळाच्या कामाकरिता अतितीव्रतेचे भूसुरुंग वापरण्यात येत होते. त्यामुळे याबाबत जाब विचारण्यासंदर्भात येथील ग्रामस्थ चिपी विमानतळाच्या कार्यालयाकडे गेले. त्यावेळी ग्रामस्थ व अधिकारी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची व नंतर धक्काबुक्की झाली. त्यामुळे हा वाद पुन्हा चिघळला आहे. (प्रतिनिधी)