शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

आंबा उत्पादनात तुडतुड्याची समस्या

By admin | Updated: December 28, 2015 00:36 IST

मोहोर संरक्षण गरजेचे : कोकणातील कीटकनाशकांच्या सहा फवारण्या प्रमाणित

आंबा पिकाला उत्पादनामध्ये मोहोरावर येणारे तुडतुडे ही अतिशय महत्त्वाची समस्या आहे. परंतु, अलिकडच्या काही वर्षामध्ये मोहोरावर येणाऱ्या तुडतुड्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे आंबा बागा धोक्यात आहेत. ही कीड भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. परंतु, कोकणात ही कीड अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात येऊ लागली आहे. तिचे नियंत्रण करणे कठीण होऊ लागले. याची कारणे पूर्वेतिहास व अलिकडील सध्याची परिस्थिती याचा आढावा कोकणातील आंबापीक संरक्षणाच्या दृष्टीने पाहिल्यास बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकेल. महाराष्ट्रात कोकण विभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातव्यावसायिकदृष्ट्या आंबा लागवड पूर्वीपासून केली जाते. कोकणात हापूस या एकाच जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यामुळेव आंबा हेच फळपीक उत्पादनाचे मुख्य साधन असल्याने बागायतदारांना तुडतुड्यांमुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचे फवारे पूर्वीपासून मारले जात होते. कोकणासाठी कीटकनाशकांच्या सहा फवारण्या प्रमाणित करण्यात आल्या आहेत. परंतु, काही शेतकरी १० ते १२ कीटकनाशकांच्या फवारण्या करतात, असे आढळून आले आहे. साधारण २५ ते ३० वर्षांपूर्वी कोकणातही २ ते ३ फवारण्या केल्या जात होत्या व त्यामुळे तुडतुड्यांचे व्यवस्थापन नीट होत होते. कार्बारिल व एन्डोसल्फान ही दोनच कीटकनाशके वापरली जात होती. मात्र, १९८१-८२ साली कार्बारीलची फवारणी करुनही तुडतुडे मोठ्या प्रमाणात आले व आंबा फळपिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कारण विभागामध्ये अ‍ॅब्रिटोडस अ‍ॅटकिनसोनी ही तुडतुड्याची जात होती ती कमी होऊन कीटकनाशकास मुळातच जास्त प्रतिकारक्षम असलेले आईडिओस्कोपस निव्हीओस्पायसस ही जात मोठ्या प्रमाणात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी सिथेटिक पायरेथ्राईड गटाची कीटकनाशके प्रभावी आढळून आल्याने त्यांचा अंतर्भाव फवारणीत सुचित करण्यात आला. मात्र, या कीटकनाशकाचा एकच फवारा देण्याचे नमूद करण्यात आले होते व इतर कीटकनाशके ही अदलूनबदलून वापरावीत. त्यामुळे तुडतुड्यामध्ये कीटकनाशकाची प्रतिकारक्षमता निर्माण होणार नाही, याची काळजी फवारणी सुचवताना घेण्यात आली होती. परंतु, आंबा बागायतदारांनी जाणता-अजाणता फवारणी सूचीनुसार कीटकनाशकाचा वापर केला नाही. तसेच कीटकनाशके मोजून न घेणे अदलूनबदलून वापर न करणे, कीटकनाशके एकमेकात मिसळून वापरणे, यामुळे तुडतुड्याची प्रतिकारक्षमता वाढली. तसेच कीटकनाशकाचा वापर अतिप्रमाणात झाल्यामुळे शत्रुकिडीवर उपजीविका करणारे इतर मित्रकीटकांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे कमी नुकसानकारक कीडीही मोठ्या प्रमाणात वाढून आंबा पिकाचे नुकसान करू लागल्या. त्या शत्रुकिडीमध्ये प्रामुख्याने मोहोरावरील मिजमाशी, पिठ्या ढेकूण, फुलकिडे, तांबडा कोळी, फळपोखरणारी अळी व खवले कीड आदी समावेश आहे म्हणून तुडतुड्याचे नियंत्रण, व्यवस्थापन करताना इतर किडीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे आंब्यामध्ये पुन्हा मोहोर येण्याचे प्रमाण वाढले आहे. आंब्याला नियमित व लवकर मोहोर येण्यासाठी पॅक्लोब्युट्रॉझॉल (कल्टार) वापरही अवाजवी झाल्यास मोहोर अखुड व झुबकेदार येत असल्यामुळे कीटकनाशकाची फवारणी मोहोराच्या आतील भागात पोहोचू शकत नाही. जुन्या आंबा बागामुळे झाडाची उंची १० मीटरपर्यंत उंच असल्याने फवारणी यंत्राचा उपयोग करणे शक्य नसते. सदोष फवारणी बरेच आंबा बागायतदार झाडावर चढून फवारा शेंड्यापर्यंत पोहोचावा म्हणून पिचकारी पद्धतीचा अवलंब करतात. त्यामुळे फवारणीची कीटकनाशके मोहोरावर व पानावर चिकटून न राहता खाली पडतात. झाडाच्या आतील फांद्याची विरळणी करावी, जेणेकरून सूर्यप्रकाश आतमध्ये पोहोचेल व हवा खेळती राहील. तसेच कीटक, कीडनाशकांची फवारणी संपूर्ण झाडावर करता येतील. खताचा संतुलित वापर करावा. ज्या ठिकाणी मिजमाशीचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा ठिकाणी झाडाखालची जमीन नांगरावी, झाडाखाली काळ प्लास्टिक टाकावे. मिजमाशी अळ्या कोषावस्थेत जाण्यास अडथळा येऊन प्रादुर्भाव कमी होईल. कीटकनाशकाच्या वेळापत्रकानुसार फवारण्या कराव्यात, त्यामुळे तुडतुड्यामध्ये कीटकनाशकास प्रतिकारक्षमता वाढणार नाही. परंतु, तुडतुड्याशिवाय इतर कीडीही आंबा मोहोरावर आढळून येतो. तेव्हा किडींची पाहणी करून फवारणी वेळापत्रकात बदल करणे आवश्यक आहे. कीडनाशकाची फवारणी करताना ती मोजून घेऊन तुषार पद्धतीने सर्व ठिकाणी पोहोचेल अशा पद्धतीने करावी. बागेत तुडतुडा आहे/नाही, यासाठी मोहोराची नियमित निरीक्षणे घ्यावीत व प्रादुर्भाव आढळून येताच फवारणी करावी. पावसाळा संपल्यानंतर मोहोर येण्यापूर्वी १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी संपूर्ण झाडावर व्यवस्थित करावी. सिंथेटिक पायथ्राईड व इमिडाक्लोप्रिड ही फवारणीसाठी एकदाच वापरावीत. दोन कीटकनाशके एकत्र मिसळून फवारू नका. तसेच कमी तीव्रतेची किंवा अधिक तीव्रतेची औषधे फवारु नयेत. शिफारस न केलेली औषधे व इतर रासायनिक पदार्थ द्रावणात मिसळू नका.- दादा गरंडे कृषी सहाय्यक, कालुस्ते, चिपळूण