शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सर्व पालिकेत भगवा फडकवणार

By admin | Updated: May 23, 2016 00:26 IST

विनायक राऊत : सेनेत जुने-नवे वाद नाही; मालवणात कार्यकर्त्यांची बैठक

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेत जुने नवे कोणतेही वाद नाहीत. राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केलेल्या व पूर्वीच्या शिवसैनिकांना एकत्र घेऊनच शिवसेनेची संघटना वाढत आहे. शिवसेना विकासाच्या बाजूने नेहमीच सकारात्मक असते. आगामी निवडणुकात विकासकामांचा अभ्यास करूनच निवडणूक लढविली जाणार आहे. निवडणुकांचा विचार करता युती करण्याबाबत भाजपशी चर्चा केली जाईल. मात्र, त्यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली असेल तर जिल्ह्यातील सर्वच पालिकांवर भगवा फडकवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे, अशी माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, देवगड, ओरोस नगरपंचायत तसेच मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला नगरपरिषदांच्या निवडणुकीपूर्वी मित्रपक्ष भाजप सोबत आला तर ठीक अन्यथा सर्व पालिका निवडणुकीत शिवसेनेचा नगराध्यक्ष स्वतंत्र लढेल, अशी स्पष्ट भूमिका मांडताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्ते मरगळ झटकून कामाला लागणार आहेत, असेही राऊत यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृह मालवण येथे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर कार्यकारिणीची बैठक खासदार राऊत यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हा संघटक जान्हवी सावंत यांच्या उपस्थितीत बंद खोलीत पार पडली. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, पपू मिठबावकर, हरी खोबरेकर, सेजल परब, नितीन वाळके, राजा गावकर, दीपक मयेकर यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मालवण शहरप्रमुख नंदू गवंडी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नव्या शहर अध्यक्षाची लवकरच निवड केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सी-वर्ल्डबाबत जठारांकडून दिशाभूलसी वर्ल्ड प्रकल्पास विरोध असेल तर तो दुसरीकडे नेऊ ही भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांची भूमिका खोडून काढताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, आधी प्रकल्पाचा आराखडा तयार करा, जागा निश्चिती करा. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाची कमी केलेली जागा अभिनंदनीय आहे. मात्र, त्यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने केवळ विरोध आहे असे दाखवून सी वर्ल्ड हलविण्याचा प्रयत्न सुरु आहे. जागा निश्चिती करून जर वायंगणी तोंडवळी ग्रामस्थांची सहमती असेल तर प्रकल्प साकारावा. उगाचच प्रकल्प देवगड, वेंगुर्लेला नेणार या हवेतील बाता मारून जनतेची दिशाभूल करू नये, असाही टोला राऊत यांनी जठार यांना लगावला.