शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

सर्व पालिकेत भगवा फडकवणार

By admin | Updated: May 23, 2016 00:26 IST

विनायक राऊत : सेनेत जुने-नवे वाद नाही; मालवणात कार्यकर्त्यांची बैठक

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेत जुने नवे कोणतेही वाद नाहीत. राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केलेल्या व पूर्वीच्या शिवसैनिकांना एकत्र घेऊनच शिवसेनेची संघटना वाढत आहे. शिवसेना विकासाच्या बाजूने नेहमीच सकारात्मक असते. आगामी निवडणुकात विकासकामांचा अभ्यास करूनच निवडणूक लढविली जाणार आहे. निवडणुकांचा विचार करता युती करण्याबाबत भाजपशी चर्चा केली जाईल. मात्र, त्यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली असेल तर जिल्ह्यातील सर्वच पालिकांवर भगवा फडकवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे, अशी माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, देवगड, ओरोस नगरपंचायत तसेच मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला नगरपरिषदांच्या निवडणुकीपूर्वी मित्रपक्ष भाजप सोबत आला तर ठीक अन्यथा सर्व पालिका निवडणुकीत शिवसेनेचा नगराध्यक्ष स्वतंत्र लढेल, अशी स्पष्ट भूमिका मांडताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्ते मरगळ झटकून कामाला लागणार आहेत, असेही राऊत यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृह मालवण येथे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर कार्यकारिणीची बैठक खासदार राऊत यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हा संघटक जान्हवी सावंत यांच्या उपस्थितीत बंद खोलीत पार पडली. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, पपू मिठबावकर, हरी खोबरेकर, सेजल परब, नितीन वाळके, राजा गावकर, दीपक मयेकर यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मालवण शहरप्रमुख नंदू गवंडी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नव्या शहर अध्यक्षाची लवकरच निवड केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सी-वर्ल्डबाबत जठारांकडून दिशाभूलसी वर्ल्ड प्रकल्पास विरोध असेल तर तो दुसरीकडे नेऊ ही भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांची भूमिका खोडून काढताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, आधी प्रकल्पाचा आराखडा तयार करा, जागा निश्चिती करा. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाची कमी केलेली जागा अभिनंदनीय आहे. मात्र, त्यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने केवळ विरोध आहे असे दाखवून सी वर्ल्ड हलविण्याचा प्रयत्न सुरु आहे. जागा निश्चिती करून जर वायंगणी तोंडवळी ग्रामस्थांची सहमती असेल तर प्रकल्प साकारावा. उगाचच प्रकल्प देवगड, वेंगुर्लेला नेणार या हवेतील बाता मारून जनतेची दिशाभूल करू नये, असाही टोला राऊत यांनी जठार यांना लगावला.