शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

राणेंना टिकेचा अधिकार नाही : जठार

By admin | Updated: July 10, 2014 23:37 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची विविध माध्यमातून फसवणूक नारायण राणे यांनी केली

कणकवली : गेली २५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची विविध माध्यमातून फसवणूक नारायण राणे यांनी केली आहे. त्यामुळे मोदी सरकार जनतेची फसवणूक करीत आहे, असे म्हणण्याचा अधिकार त्यांना नाही. सिंधुदुर्गबरोबरच महाराष्ट्राचा कारभारी आगामी निवडणुकीत जनता बदलणार आहे. त्यामुळे कारभारी बदला हा संदेश घेऊन ‘कमल शक्ती सप्ताहा’च्या माध्यमातून जनतेसमोर जाणार असल्याचे आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आमदार जठार म्हणाले, जिल्ह्याचा अथवा राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी कारभारी चांगला असावा लागतो. मात्र तसे होताना दिसत नाही. गेल्या २५ वर्षात नारायण राणेंनी काय केले? हे त्यांच्या मुलाला कळले, पण स्वत: राणेंना कळले नाही. त्यामुळे आता जिल्ह्याचा कारभारीच बदलायला हवा. लोकसभा निवडणुकीत मोदी लाट नव्हती, असे जर राणे म्हणत असतील तर राणेंविरोधाची लाट इथे होती, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे त्याबाबत नारायण राणेंनी चिंतन करणे आवश्यक आहे. गेली अनेक वर्षे राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाही त्यांना लोकोपयोगी काम करता आले नाही. त्याची नाराजी जनतेत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. जिल्ह्यातील ग्रामविकास यंत्रणा खिळखिळी झाली असून ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पदवीधर पशुवैद्यकीय अधिकारी, कोतवाल, तलाठी अशा अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी राज्य शासनाशी असहकार सुरू केला आहे. अंगणवाडी सेविका संपावर जाण्याच्या पवित्र्यात आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे बंद असून जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामविकास यंत्रणाच आजारी पडली असून काँग्रेस शासनाच्या नाकर्तेपणाचा हा परिणाम आहे. त्यामुळे जनतेसमोर हाच विषय घेऊन कमल सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही जाणार आहोत, असेही आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी बोलताना म्हणाले. (वार्ताहर)