शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

पाऊस यंदाही रुसलेलाच!

By admin | Updated: October 1, 2015 00:34 IST

रत्नागिरी जिल्हा : पाणीटंचाईचे संकट उभे

रत्नागिरी : साधारणत: तीन ऋतू चार महिन्यात विभागण्यात आले आहेत. पावसाळ्याचे चार महिने संपले आहेत. यावर्षी पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे भविष्यात भीषणटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून आतापासूनच पाणी साठवणुकीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जून ते आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात ४ हजार ८४६.५ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, सप्टेंबरअखेर केवळ २००० मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे.शासनाकडून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजना राबवण्यात येत आहे. जलशिवार योजनेंतर्गतही पाणी साठवणुकीसाठी बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. वनराई बंधारे, नाला बंधारे, सिमेंट बंधारे आदी विविध प्रकारचे बंधारे बांधण्याचे काम दिवाळीनंतर सुरू होते. प्रशासकीय पातळीवर लोकसहभागातून बंधारे बांधण्यात येतात. मात्र, यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे बंधारे बांधण्याच्या प्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्याची गरज आहे.प्रशासकीय पातळीवर याबाबत कार्यवाही होणे गरजेचे आहे. पाणी जमिनीत मुरले तरच पाण्याचा स्रोत सुधारेल. दरवर्षी मार्च, एप्रिलपासून पाणीटंचाई जाणवते. मात्र, यावर्षी जानेवारीपासून पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात येते. जिल्ह्याचे मुख्य पीक भात आहे. नाचणी हे दुय्यम पीक घेतले जाते. जिल्ह्यातील शेतकरी दुबार पिकांतर्गत भाजीपाला, पावटा, कुळीथ, तूर, कलिंगडाचे पीक घेत असले तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. यावर्षी कमी पावसामुळे भातपिकाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिके घेणे फायदेशीर ठरेल. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली जमिनीचा पोत पाहून भाजीपाला, कडधान्ये व तत्सम् पिके घेणे गरजेचे आहे. मात्र, तसा प्रयत्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून फार कमी होताना दिसतो. त्यामुळे शेतकरी नुकसानीत येत आहे.द्वीदल धान्याचे पीक घेणे गरजेचेरत्नागिरी जिल्ह्यात तीन हजार मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र, यावर्षी एक हजार मिलिमीटर इतका पाऊस कमी झाला आहे. पाऊस कमी झाल्याने नदी, ओढ्यांच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे आणखी काही महिन्यात पाण्याचे स्रोत कमी होऊ नयेत, यासाठी बंधारे बांधकामासाठी तातडीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचे ६५ टक्के पाणी वाया जात असल्यामुळे पाणी जमिनीत मुरवणे गरजेचे आहे. तरच भविष्यात पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल. भातपीक कापणीस तयार होत आहे. त्यामुळे भाताला पर्यायी दुबार पिके घेण्याची आवश्यकता आहे. वाढत्या महागाईमुळे डाळीचे दर भडकले आहेत. त्यामुळे व्दीदल धान्यांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेण्यासाठी प्रयत्न करावेत. -डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ.पर्जन्यमान कमीचगेल्या वर्षीही पाऊस कमीच झाला होता. यंदा पावसाचे प्रमाण त्याहून कमी आहे. प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी पाऊस पडला त्याच्यापेक्षा खूपच कमी यंदा पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहेच, शिवाय यंदा डिसेंबरपासूनच भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने आतापासूनच पावले उचलायला सुरुवात केली आहे. भीषण पाणीटंचाईच्या शक्यतेने नागरिकही चिंताग्रस्त झाले आहेत.