शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

मराठीचे प्राध्यापक वाचत नाहीत

By admin | Updated: November 30, 2014 00:53 IST

नागनाथ कोतापल्ले यांची खंत; संमेलनात पुस्तक प्रकाशन उत्साहात

असगोली : गुहागर येथे आज हे पहिले संमेलन असले तरी ‘पुढील काळात दरवर्षी परंपरा म्हणून अशी संमेलने व्हावीत. ग्रंथाच्या पूजेबरोबर ग्रंथाचे वाचन महत्वाचे होत राहिले तर आपला समाज अधिक उन्नत होत राहील. सर्व सुविधा घरी असतात पण पाच पुस्तक अनेकांच्या घरी असतात. याला मराठीचे प्राध्यापकही अपवाद नाहीत, अशी खंत आज ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केली.लेखन करणं हे आपल्या संस्कृतीमधील धर्म आहे. पुस्तक माणसाला चांगला विचार करायला शिकवतात. वाचनामुळे माणसाचे जीवन सौख्यमय होते. माणसाचे माणूसपण शोधणं हे सर्व संस्कृतीचे मुख्य सूत्र आहे. तुम्ही किती मोठे आहात यापेक्षा तुमचे समाजात स्थान काय हे महत्वाचे आहे. साहित्य हे माणसाच्या विवेकाला जागे करण्यासाठी निर्माण होते. आज विवेकाचा दिवा विजवायचा याची लढाई चालू आहे. दोन वर्षापूर्वी नरेंद्र दाभोळकरांचा झालेला खून याचे उदाहरण आहे. ज्या नगर जिल्ह्यात ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले तेथे दलितांचे तुकडे करुन खून होतो, अशी खंतही डॉ. कोतापल्ले यांनी मांडली.संमेलनाच्या दुपारच्या सत्रात संमेलनाध्यक्ष अशोक बागवे यांच्यासह काही स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार भास्कर जाधव उपस्थित होते.आजच्या विज्ञान युगात विद्यार्थी तसेच तरुणवर्ग साहित्याकडे आपला रस दाखवताना दिसत नाही. मात्र त्यातूनही इथल्या भागातील काही साहित्यिक तसेच कवींनी आजही साहित्याची ही परंपरा आपल्या पुस्तक लेखनातून व काव्यसंग्रहातून जोपासली आहे. अशाच कवींच्या पुस्तक प्रकाशनाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा.अशोक बागवे यांच्या ‘भास अभास’ या पुस्तकाच्या प्रकाशनासोबत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.बागवे यांच्या भास अभास या पुस्तकाचे प्रकाशन अक्षया कळझुणकर हिच्या हस्ते करण्यात आले. वरवेलीतील अंध कवी रामचंद्र शिवराम पवार यांच्या ‘काळोखातला अंधार’ या हस्तलिखिताचे तर शिक्षक अनिल कांबळे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ‘विश्वरत्न भीमराव रामजी आंबेडकर’ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साहित्यिक साहेबराव ठाणगे यांनी अशोक बागवे यांच्या ‘भास-अभास’ काव्यसंग्रहाबद्दल बोलताना ‘कवी जेव्हा बोलतो तेव्हा आपण नुसतं हसायचं... कवी म्हणजे कवी असतो, कवी म्हणजे ताऱ्यांमधला रवी असतो’ ही कविता सादर केली.सोहळ्याला आमदार भास्कर जाधव यांच्यासह नगराध्यक्ष जयदेव मोरे, उपनगराध्यक्षा स्नेहा वरंडे, उपसभापती सुरेश सावंत, तहसीलदार वैशाली पाटील, पद्माकर आरेकर, अशोक बागवे, मराठवाडा युवा संमेलनाच्या कार्यवाह विजया थोरात, मसाप गुहागर शाखेचे अध्यक्ष राजेेंद्र आरेकर, श्रीराम दुर्गे, राष्ट्रपाल सावंत, मामा वैद्य व साहित्य रसिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक़्रमाचे सूत्रसंचालन संजय गमरे यांनी केले. (वार्ताहर)