शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

आधीची भरपाई गारठली

By admin | Updated: June 30, 2015 23:36 IST

पुढचं पाठ, मागचं सपाट : नुकसानग्रस्तांबाबत सापत्न भाव

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाकडे या आर्थिक वर्षासाठी नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून प्राप्त झाली आहे. मात्र, पुढचं पाठ मागचं सपाट, या उक्तीनुसार गेल्या वर्षीच्या नुकसानग्रस्तांचा मात्र विसर पडला आहे. शासनाच्या या उफराट्या न्यायामुळे जनावरांचे नुकसान झालेले शेतकरी तसेच खासगी मालमत्ताधारक नुकसानग्रस्त यांना अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. गेल्या वर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने ८९० घरे व गोठ्यांचे एकूण १००,२४,४८६ रूपयांचे नुकसान केले आहे. ३१ सार्वजनिक मालमत्तांचे ५ लाख २१ हजार ४०० रूपयांचे, तर ४७ खासगीमालमत्तांचे ६ लाख ४१ हजार ७६१ रूपयांचे असे एकूण १ कोटी २१ लाख ३१ हजार ५४७ रूपयांचे नुकसान झाल्याची नोंदप्रशासनाकडे असली तरीही त्याहीपेक्षा जास्त नुकसान जिल्ह्यात झाले आहे. या नुकसानाची भरपाई आतापर्यंत केवळ २९ लाख रूपये इतकेच शासनाकडून देण्या आले आहेत. तसेच या कालावधीत पावसाने बळी घेतलेल्या पाच व्यक्तिंच्या वारसांना प्रत्येकी दीड लाख रूपयांप्रमाणे साडेसात लाख रूपये देण्यात आले आहेत. यात केवळ ८१ घरे व गोठ्यांच्या नुकसानभरपाईचा समावेश आहे. उर्वरित शेतकरी व खासगी मालमत्ताधारकांना अद्याप भरपाईही मिळालेली नाही. यावर्षीसाठी नव्याने निधी आला. मात्र, मागच्या वर्षीच्या नुकसानग्रस्तांचा विसर शासनाला पडलेला दिसतो. जिल्ह्यात या पावसाळ्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंच्या वारसांना ८ लाख रूपयांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात पडझड झालेली घरे व गोठ्यांसाठी १० लाख रूपये देण्यात आले आहेत. यावर्षी मृत जनावरांच्या मालकांना अडीच लाखाचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत २० लाख ५० हजार रूपयांचे वितरण झाले आहे. यावर्षी सुरूवातीला झालेल्या पावसात बळी गेलेल्यांच्या वारसांना, मृत जनावरांच्या मालकांना तसेच पडझड झालेली घरे, गोठ्यांसाठी शासनाकडून निधी आला आहे. मात्र, गतवर्षीच्या नुकसानाबाबत शासन बेदखल आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षेचे बियाणेकोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. या नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना खेटे घालावे लागत आहेत. पुढचं पाठ मागचं सपाट या न्यायाने गत नुकसानग्रस्तांची भरपाई लाल फितीत अडकली आहे. शेतीचे, शेतजनावरांचेही नुकसान सोसावे लागल्यामुळे मागील नुकसानभरपाई कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे.तपशीलसंख्यानुकसानाची रक्कमप्रत्यक्ष मिळालेलीघरे व गोठे८९० १००,२४,४८६२९,००,००० (८१ घरे व गोठ्यांसाठी)व्यक्ती०५७,५०,०००७,५०,०००जनावरे०८१,९४,५००अद्याप नाही सार्वजनिक३१५,२१,४००अद्याप नाही खासगी ४७६,४१,१६१अद्याप नाही