शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आधीची भरपाई गारठली

By admin | Updated: June 30, 2015 23:36 IST

पुढचं पाठ, मागचं सपाट : नुकसानग्रस्तांबाबत सापत्न भाव

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाकडे या आर्थिक वर्षासाठी नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून प्राप्त झाली आहे. मात्र, पुढचं पाठ मागचं सपाट, या उक्तीनुसार गेल्या वर्षीच्या नुकसानग्रस्तांचा मात्र विसर पडला आहे. शासनाच्या या उफराट्या न्यायामुळे जनावरांचे नुकसान झालेले शेतकरी तसेच खासगी मालमत्ताधारक नुकसानग्रस्त यांना अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. गेल्या वर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने ८९० घरे व गोठ्यांचे एकूण १००,२४,४८६ रूपयांचे नुकसान केले आहे. ३१ सार्वजनिक मालमत्तांचे ५ लाख २१ हजार ४०० रूपयांचे, तर ४७ खासगीमालमत्तांचे ६ लाख ४१ हजार ७६१ रूपयांचे असे एकूण १ कोटी २१ लाख ३१ हजार ५४७ रूपयांचे नुकसान झाल्याची नोंदप्रशासनाकडे असली तरीही त्याहीपेक्षा जास्त नुकसान जिल्ह्यात झाले आहे. या नुकसानाची भरपाई आतापर्यंत केवळ २९ लाख रूपये इतकेच शासनाकडून देण्या आले आहेत. तसेच या कालावधीत पावसाने बळी घेतलेल्या पाच व्यक्तिंच्या वारसांना प्रत्येकी दीड लाख रूपयांप्रमाणे साडेसात लाख रूपये देण्यात आले आहेत. यात केवळ ८१ घरे व गोठ्यांच्या नुकसानभरपाईचा समावेश आहे. उर्वरित शेतकरी व खासगी मालमत्ताधारकांना अद्याप भरपाईही मिळालेली नाही. यावर्षीसाठी नव्याने निधी आला. मात्र, मागच्या वर्षीच्या नुकसानग्रस्तांचा विसर शासनाला पडलेला दिसतो. जिल्ह्यात या पावसाळ्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंच्या वारसांना ८ लाख रूपयांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात पडझड झालेली घरे व गोठ्यांसाठी १० लाख रूपये देण्यात आले आहेत. यावर्षी मृत जनावरांच्या मालकांना अडीच लाखाचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत २० लाख ५० हजार रूपयांचे वितरण झाले आहे. यावर्षी सुरूवातीला झालेल्या पावसात बळी गेलेल्यांच्या वारसांना, मृत जनावरांच्या मालकांना तसेच पडझड झालेली घरे, गोठ्यांसाठी शासनाकडून निधी आला आहे. मात्र, गतवर्षीच्या नुकसानाबाबत शासन बेदखल आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षेचे बियाणेकोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. या नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना खेटे घालावे लागत आहेत. पुढचं पाठ मागचं सपाट या न्यायाने गत नुकसानग्रस्तांची भरपाई लाल फितीत अडकली आहे. शेतीचे, शेतजनावरांचेही नुकसान सोसावे लागल्यामुळे मागील नुकसानभरपाई कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे.तपशीलसंख्यानुकसानाची रक्कमप्रत्यक्ष मिळालेलीघरे व गोठे८९० १००,२४,४८६२९,००,००० (८१ घरे व गोठ्यांसाठी)व्यक्ती०५७,५०,०००७,५०,०००जनावरे०८१,९४,५००अद्याप नाही सार्वजनिक३१५,२१,४००अद्याप नाही खासगी ४७६,४१,१६१अद्याप नाही