शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

अंधांना दृष्टी देण्यासाठी अभियानात सहभागी व्हा

By admin | Updated: October 6, 2014 22:41 IST

सह्याद्री निसर्ग मित्र : नेत्रदानाला विशेष महत्त्व

चिपळूण : भारतीय संस्कृतीमध्ये दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग ते कन्यादान, भूदान असो की मतदान. यामध्ये सर्वश्रेष्ठ दान म्हणजे नेत्रदान आहे. सर्व धर्मात नेत्रदानाला मान्यता असून, वाल्मिकी रामायणात नेत्रदानामुळे मोक्ष प्राप्त होतो, असे म्हटले आहे. बुद्ध धर्मातही नेत्रदानाचे महत्त्व सांगितले जात आहे. त्यामुळे अंधांना दृष्टी देण्यासाठी नेत्रदान अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सह्याद्री निसर्ग मित्रचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी केले आहे. मार्कंडी येथील वंदना सुहास पंडित यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. संघर्ष क्रीडा मंडळाच्या सहकार्याने सांगली येथील दृष्टीदान आयबँक यांच्या पाठिंब्यावर डॉ. किल्लेदार, डॉ. ग. ल. जोशी, डॉ. संजीव शारंगपाणी, डॉ. वाघमारे, डॉ. मुकादम, डॉ. अनुपमा जोशी व नॅबचे डॉक्टर यांच्या सहकार्याने नेत्रदान अभियान सुरु आहे. जगातील ३ कोटी ९० लाख अंध व्यक्तींपैकी २० टक्के म्हणजे ७ लाख ८० हजार अंध भारतात आहेत. त्यातील ६० टक्के मोतीबिंदूमुळे, तर २ टक्के कॉर्नियाच्या खराब होण्यामुळे आहेत. १ लाख ५६ हजार अंधांना जर नेत्रदानापासून कॉर्निया उपलब्ध झाला तर त्यांच्या जीवनातील अंधकार दूर होऊ शकतो. भारतात आजही १ लाख कॉर्नियाच्या अभावाने अंधकारात जीवन जगत आहेत. त्यांना प्रकाश देण्याचे काम करावयाचे आहे. मागील वर्षापासून नेत्रदानाची सोय चिपळूण येथे करण्यात आली आहे. नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर ६ तासांच्या आत माणसाच्या डोळ्यामधील काळ्या बुबुळावरचे १/२ मिलिमीटरचे पारदर्शक पटल काढून ते अंध व्यक्तींना बसवले जाते. यामध्ये पूर्ण डोळा काढला जात नाही. चेहरा जशाच्या तसा राहतो. मृत्यूपूर्वी नेत्रदान अर्ज भरला नसला तरी नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान होते. कोणत्याही वयातील व्यक्तीचे नेत्र उपयोगात येतात. वाल्मिकी रामायणात तर नेत्रदानाने मोक्ष प्राप्त होतो, असे लिहिले आहे. मोतिबिंंदूच्या आॅपरेशनानंतरही नेत्रदान करता येते. नेत्रदान मोहिमेत सहभागी होऊन अंधांना दृष्टी देण्याच्या कार्यात हातभार लावावा, असे आवाहन सह्याद्री निसर्गचे भाऊ काटदरे, सेक्रेटरी उदय पंडित यांनी केले आहे. (वार्ताहर)