शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

रायझिंग हाऊस उभारणे गरजेचे : शरद पवार

By admin | Updated: May 15, 2014 00:29 IST

सिंधुदुर्गनगरी : परदेशात येथील हापूस आंब्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. यामागची कारणे शोधली पाहिजेत. याचा अभ्यास केला असता

सिंधुदुर्गनगरी : परदेशात येथील हापूस आंब्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. यामागची कारणे शोधली पाहिजेत. याचा अभ्यास केला असता प्रकर्षाने जाणवते की फळांवर प्रक्रिया करण्यासाठी रायझिंग हाऊस (फळांची काळजी घेणारे केंद्र) आपल्याकडे नाही. तसेच पॅकींग हाऊसही नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची गरज आपल्याला आहे. आंबा उत्पन्नाबाबत काळजी घेतल्यास भविष्यात अशी परिस्थिती आपल्यावर ओढवणार नाही. असे मत केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्गनगरीमध्ये बोलताना व्यक्त केले. सिंधुदुर्गात कृषी भवनाची उभारण्यात आलेली वास्तू एखाद्या पंचतारांकीत हॉटेलप्रमाणे आहे. महाराष्ट्रात कुठेही अशी वास्तू नाही. या वास्तूमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन होण्यासंबंधी संधी निर्माण केल्या पाहिजेत. ही वास्तू सतत गजबजलेली असली पाहिजे. हे केंद्र लोकोपयोगी होण्यासंबंधी काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून बसून नियोजन केले पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. राष्ट्रवादीचे सरचिटणीस कै. अ‍ॅड. गुरूनाथ कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गनगरी येथे साकारलेल्या शरद कृषी भवनाचे उद्घाटन झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कोकणचा प्रदेश हा निसर्गसौंदर्याने भरलेला आहे. येथील काजू, आंबा, नारळ, कोकम या फळबागासंबंधी प्रश्न सोडविण्याचा आपला कायमच मानस राहिला आहे. त्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. मत्स्य व्यवसायासाठी खाडीजवळील जागा घेवून त्यात कोळंबी शेती करता येईल. वास्तूचे रूपांतर कृषी माहिती केंद्रात व्हावे शरद कृषी भवनाची भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. मात्र, नुसती वास्तू उभारून चालणार नाही. तर तिचे रूपांतर कृषी माहिती केंद्र म्हणून झाले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून पुढच्या कार्यक्रमाची दिशा आखूया. असे आवाहनदेखील पवार यांनी यावेळी केले. शेतीक्षेत्रात आमूलाग्र बदल गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत आपण कृषीमंत्री झाल्यानंतर देशाच्या शेतीक्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. गेल्यावर्षी २५९ दशलक्ष टन धान्याची विक्रमी निर्मिती झाली. यावर्षी यात आणखीन भर पडून हा आकडा २६४.३८ दशलक्ष टन एवढा झाला. गहू, तांदूळ, डाळ, कापूस तसेच प्रत्येक गोष्टीमध्ये विक्रमी उत्पादनामध्ये भारत पहिल्या क्रमांकाचा देश बनला. तांदूळ निर्यात करण्यामध्ये भारत हा देश जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनला तर गहू, साखर, कापूस यामध्ये जगातील दोन क्रमांकाचा देश बनला. त्याचप्रमाणे फळबागांची निर्मिती, फळांची निर्मिती यामध्येही जगात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. मात्र, मार्केटींग करण्यामध्ये आपण मागे पडत आहोत, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग देशातील आदर्श जिल्हे आपण कृषीमंत्री झाल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा फायदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या देशातील दोनच जिल्ह्यांना झाला नाही. कारण या जिल्ह्यात शेतकर्‍यांनी घेतलेली कर्ज ते प्रामाणिकपणे परत करतात. येथील लोक ठकवाठकवी करत नाहीत. घेतलेले कर्ज व्याजासहीत परत देण्याची कोकणी माणसाची प्रवृत्ती वाखाणण्याजोगी आहे.