शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

विरोध चिरडण्यासाठी नगराध्यक्षांचा ‘फासा’?

By admin | Updated: July 19, 2015 23:34 IST

रत्नागिरी पालिका : अतिक्रमण विषयावरुन होणार विरोधकांची घुसमट!

रत्नागिरी : राजकीय चमत्कार घडविण्यात माहीर असलेले रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आपल्या विरोधकांना चारी मुंड्या चीत करण्यासाठी नवा ‘फासा’ टाकला आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेली मोठ्या संख्येतील अतिक्रमणे हटवण्याचा सोमवारपासून होणारा प्रारंभ हा याच डावपेचांचा भाग आहे. त्यात काही राजकीय नेत्यांच्या अतिक्रमणांचाही समावेश असल्याने विरोधकांची घुसमट करण्यासाठीच ही कारवाई असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रत्नागिरी नगर परिषदेत सध्या राजकारण तापले आहे. शिवसेना आणि भाजपमधील संबंध टोकाला गेले असल्याने सध्या रत्नागिरी पालिकेतील राजकारण केंद्रीत बनले आहे. अत्यंत नाट्यमय पध्दतीने भाजपातील स्वत:सह सहा नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करून महेंद्र मयेकर यांनी भाजपकडून आधी मिळणार नसलेले नगराध्यक्षपद हिसकावले. सहा जणांचा वेगळा गट झाल्याने भाजपकडे केवळ २ नगरसेवक उरले. त्यामुळे सत्ता तर हाती राहील, या उद्देशाने महेंद्र मयेकर यांना भाजपचेच नगराध्यक्ष म्हणून भाजप नेत्यांना जाहीर करावे लागले होते. त्यांच्या या नगराध्यक्षपदाला २४ जुलै २०१५ रोजी सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. सत्तेवर आलेल्या तत्कालिन युतीचा पाच वर्षांचा कालावधी संपायला अजून, सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. सध्या मात्र पालिकेत युती नाही. त्यामुळे पदाचा राजन्ीाामा देण्याचा प्रश्न येत नाही, असे नगराध्यक्षांनीच सांगितले आहे. त्यामुळे पुढील सव्वा वर्षासाठी सेनेला नगराध्यक्षपद मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची राजकीय कोंडी करण्याची व्यूहरचना त्यांच्या पालिकेतील विरोधकांनी आखली आहे. त्यात मयेकर यांना अडकवण्याचे प्रयत्न जोरात आहेत. त्यामुळे आपली कोंडी होण्याआधी विरोधकांचीच कोंडी करण्याचा फासा नगराध्यक्षांनी फेकला असल्याची चर्चा आहे. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप ते दांडा फिशरीजपर्यंतच्या मुख्य मार्गाच्या दुतर्फा रस्ता व गटाराच्या जागेत व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामध्ये फिरत्या हातगाड्या म्हणून परवाना मिळविणारे ८० पेक्षा अधिक विक्रेते रस्त्याच्या कडेला गटारावर एकाच ठिकाणी आपली दुकाने थाटून आहेत.त्यांना काही लाभार्थी राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त आहे. राजकीय स्वार्थापोटी काहींनी या व्यवसायाच्या आडून आपली दुकाने सुरू केली आहेत. पालिकेपेक्षा मधल्या एजंट्सना अधिक कर द्यावा लागत आहे. काही पुढाऱ्यांसाठी ही बलस्थाने आहेत. नेमकी हीच बलस्थाने मोडून काढण्यासाठी नगराध्यक्ष मयेकर सरसावले आहेत. याशिवाय मुख्य रस्त्यालगतच्या काही दुकानदारांनी आपल्या दुकानांची छपरे गटारांवर व्यापली आहेत. गटारांवरही काही ठिकाणी बांधकामे झाली आहेत. त्यामुळे गटारांच्या या जागा मोकळ्या करण्यासाठी अशा गटारांना व्यापलेल्या छपरांवरही हातोडा फिरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अतिक्रमण हटवण्याची ही कारवाई मोठ्या पोलीस बंदोबस्तात होणार आहे. त्यामुळे कारवाईच्या वेळी कोणाला ब्र ही काढता येणार नाही, अशी योजना आखण्यात आली आहे. (प्रतिनिधी)नोटीसची गरजच नाही...अतिक्रमणवाल्यांना समजपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चार दिवसांपूर्वीच अतिक्रमणे, गाड्या हटवण्याची समज देण्यात आली आहे. त्यांना नोटीस बजावली काय, असे विचारता पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले. तरीही संबंधितांना समज देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. गॉडफादर होणार उघडमुख्य मार्गावरील अतिक्रमणे हटवताना ती वाचवण्यासाठी काहीजण प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तसे झाले तर या अतिक्रमणांमागे असलेले ‘गॉड फादर’ आपोआपच उघड होणार असल्याचीही चर्चा आहे.