शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

कुष्ठरूग्णांचे प्रमाण कमी-चिपळूण तालुका

By admin | Updated: July 24, 2014 23:12 IST

चार आरोग्य केंद्रात प्रमाण शून्य, अन्य पाच केंद्रात १२ कुष्ठरोगी

राजेश कांबळे -अडरे , चिपळूण तालुक्यात कुष्ठरोगाचे प्रमाण सर्वांत कमी असल्याचे उघड झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुस, रामपूर, कापरे, खरवते या चार आरोग्य केंद्रांत कुष्ठरूग्णांचे प्रमाण ० आहे, तर अन्य ५ प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ कुष्ठरोगी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्याच्या अनेक योजना शासन नागरिकांसाठी राबवित आहे. प्रत्येक रोगाचा परिपूर्ण अभ्यास करुन विशेष मोहीमदेखील राबविली जाते. पूर्वीच्या काळात कुष्ठरोग होणे म्हणजे मागील जन्माच्या पापाचे फळ, असा गैरसमज होता. अशा रुग्णांना बाजूला ठेवले जायचे. त्यावेळी उपचाराअभावी रुग्णांची हेळसांड होत होती. कुष्ठरोगाबाबतची भीती लोकांच्या मनातून काढून टाकण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. त्यांनी कुष्ठरोग झालेल्या रुग्णांसाठी आश्रम काढून अशा रुग्णांची सेवा करताना समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. समाजात पसरलेले गैरसमज शासनाच्या आरोग्य विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे कमी झाले आहे. चिपळूण तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अहवालानुसार मार्च २०१३ ते एप्रिल २०१४ या वर्षात कुष्ठरोगाचे फक्त १२ रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार केले जातात. पी. बी. व एम. बी. या उपचार पद्धतीचा वापर करुन कुष्ठरोगी रुग्ण बरे होतात. चिपळूण तालुक्यातील शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत संसर्गिक २ व असंसर्गिक १, उपचाराखाली ३ रुग्ण आहेत. अडरे संसर्गिक २ उपचाराखाली आहेत. सावर्डे संसर्गिक २, असंसर्गिक २ उपचार सुरु आहेत. वहाळ संसर्गिक १ उपचाराखाली आहे. दादर संसर्गिक ३ रुग्णांवर उपचार चालू आहेत. असंसर्गिक २ बरे झाले आहेत. कुष्ठरोगी असणाऱ्या रुग्णांवर १२ महिने औषधोपचार व असंसर्गिक रुग्णांवर ६ महिने औषधोपचार करुन बरे केले जातात.चिपळूण तालुक्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार मार्च २०१३ ते एप्रिल २०१४ या वर्षात कुष्ठरोगाचे फक्त १२ रूग्ण असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, यावर्षी अशा प्रकारचे रूग्ण आढळले नसल्याचे सांगण्यात आले. यावर्षी अशा रूग्णांना त्वरित उपाय करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. -- प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकही कुष्ठरोगाची नोंद नाही -- पूर्व विभागात संसर्गितांची संख्या अधिक, वैद्यकीय उपचार सुरु.-- सहा महिन्यात उपचार केल्यावर रुग्ण होतो बरा.-- पी. बी. व एम. बी. पध्दतीने रुग्ण बरा होतो.-- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्याच्या योजना राबविण्यात येत असतात.कुष्टरोग बरा होत नाही, याबाबत आपल्याकडे अनेक गोष्टी सांगितल्या जातात. काहींच्या मते हा रोग कधीही बरा होणारा नाही. पण, वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली असल्याने आता पी. बी. व एम. बी. पध्दतीने रुग्ण बरा होतो. याची जनजागृती होणे गरजेचे आहे.४चिपळूण तालुक्यातील शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत संसर्गिक २ व असंसर्गिक १ उपचाराखाली ३ रूग्ण आहेत. अडरे,सावर्डे, वहाळ, दादर केंद्रातही काही रूग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सहा महिन्यात हे रूग्ण बरे होतात व त्यानंतर त्यांना नवजीवन मिळते असा प्रयत्न हा केवळ मानसिक उर्मीतूनच करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.