शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

वृध्दांच्या ‘आनंदाश्रमा’ला प्रशासनाचा कोलदांडा

By admin | Updated: October 1, 2015 00:35 IST

आडमुठे धोरण : ज्येष्ठ नागरिकही झाले पाहुणे एक दिवसाचे!

शोभना कांबळे-रत्नागिरी -घरातील नातेवाईकांनी नाकारलेल्या वृद्धांचा अंतिम पर्वातील प्रवास आनंददायी व्हावा, यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकारानेच ‘आनंदाश्रम’ सुरू करण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे या वृद्धाश्रमासाठी जागा मिळणे दुरापास्त झाल्याने ज्येष्ठ नागरिक दिन कशासाठी करायचा, असा सवाल केला जात आहे. जिल्ह्यात २ लाख ४४ हजार ज्येष्ठ नागरिक आहेत. काळानुरूप एकत्र कुटुंबव्यवस्था हळूहळू कालबाह्य होऊ लागली असून, ‘हम दो हमारे एक या दो’ एवढ्यापुरतीच कुटुंबव्यवस्था मर्यादित होऊ लागली आहे. त्यातच पती - पत्नी दोघेही अर्थार्जनासाठी बाहेर पडू लागले आहेत. त्यातच देखभालीसाठी कुणी व्यक्ती मिळत नसल्याने घरात असलेल्या ज्येष्ठांसोबत कुणी राहायचे, ही मोठी समस्या सध्या अनेक कुटुंबांपुढे उभी आहे. त्यातूनच वृद्धाश्रमाची गरज निकडीने भासू लागली. जिल्ह्यात यासाठी काही व्यक्ती, खासगी संस्था पुढे आल्या असून, त्यांनी वृद्धाश्रम सुरू केले आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना स्वत:चा निधी उभा करून वृद्धाश्रम चालवावा लागत असल्याने काही अंशी यातील वृद्धांना सोयीसुविधा देताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या वृद्धांची आयुष्याची सायंकाळ आनंदमयी व्हावी, या उद्देशाने रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेऊन ‘आनंदाश्रम’ सुरू करण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली. २३ मार्च १०१४मध्ये कुवारबाव येथे गेली कित्येक वर्षे विनावापर पडून असलेल्या शासनाच्या दोन एकर जागेसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला. मुख्यमंत्र्यांकडूनही याबाबत हिरवा कंदील मिळाला. त्यानुसार महसूल विभागाच्या मुख्य सचिवांनी जिल्हा प्रशासनाकडून शिफारस मागितली. ज्येष्ठ नागरिक संघाला यामुळे समाधान मिळाले. पण घडले उलटेच, १० वर्षात शासकीय कार्यालयांची आवश्यकता ध्यानी घेऊन प्रशासनाने जागा नामंजूर केली. वृद्धांबाबत घरची मंडळी, शासन उदासीन असले तरी न्यायालयाने २००७ सालापासून ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हितकारक निर्णय दिले आहेत. त्यातील महत्त्वाचा म्हणजे वृद्धाश्रम बांधणाऱ्या संस्थांना जागा उपलब्ध करून द्याव्यात, असे उच्च न्यायालयाने २३ डिसेंबर २०१०मध्ये आदेश देऊनही जल्हा प्रशासनाने हे आदेशच धुडकावून लावले आहेत. ५० ज्येष्ठांसाठी आरोग्य सेवेसह सुसज्ज अशा ‘आनंदाश्रमा’साठी आतापासूनच देणगीदाते पुढे आले आहेत. यातून येथील ज्येष्ठ नागरिक संघाने ८ लाखापर्यंत निधी जमवला आहे. मात्र, आता त्यासाठी जिल्हा प्रशासनानेच जागा नाकारल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाबाबत प्रशासन किती उदासीन आहे, त्याची कल्पना येते. (प्रतिनिधी)२००७ साली वृद्धाश्रमाबाबत कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी २०१०मध्ये शासनाने अध्यादेश काढला. यात प्रत्येक जिल्ह्यात एक वृद्धाश्रम असावा, असे नमूद करण्यात आले होते. मात्र, आता या अध्यादेशाकडे दुर्लक्ष होत असलेले दिसून येत आहे. त्यामुळे इतर दिनांप्रमाणेच वृध्द मंडळींनाही ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करून एका दिवसापुरता मान देण्याचा प्रयत्न चालवलाय की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. मात्र, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचायला हव्यात. यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ प्रयत्न करत आहे. यातूनच आमचे वृद्धाश्रमासाठी प्रयत्न आहेत. यासाठी शासनस्तरावर सहकार्याची गरज आहे.- डॉ. श्रीरंग कद्रेकरअध्यक्ष, रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ.