शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वृध्दांच्या ‘आनंदाश्रमा’ला प्रशासनाचा कोलदांडा

By admin | Updated: October 1, 2015 00:35 IST

आडमुठे धोरण : ज्येष्ठ नागरिकही झाले पाहुणे एक दिवसाचे!

शोभना कांबळे-रत्नागिरी -घरातील नातेवाईकांनी नाकारलेल्या वृद्धांचा अंतिम पर्वातील प्रवास आनंददायी व्हावा, यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकारानेच ‘आनंदाश्रम’ सुरू करण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे या वृद्धाश्रमासाठी जागा मिळणे दुरापास्त झाल्याने ज्येष्ठ नागरिक दिन कशासाठी करायचा, असा सवाल केला जात आहे. जिल्ह्यात २ लाख ४४ हजार ज्येष्ठ नागरिक आहेत. काळानुरूप एकत्र कुटुंबव्यवस्था हळूहळू कालबाह्य होऊ लागली असून, ‘हम दो हमारे एक या दो’ एवढ्यापुरतीच कुटुंबव्यवस्था मर्यादित होऊ लागली आहे. त्यातच पती - पत्नी दोघेही अर्थार्जनासाठी बाहेर पडू लागले आहेत. त्यातच देखभालीसाठी कुणी व्यक्ती मिळत नसल्याने घरात असलेल्या ज्येष्ठांसोबत कुणी राहायचे, ही मोठी समस्या सध्या अनेक कुटुंबांपुढे उभी आहे. त्यातूनच वृद्धाश्रमाची गरज निकडीने भासू लागली. जिल्ह्यात यासाठी काही व्यक्ती, खासगी संस्था पुढे आल्या असून, त्यांनी वृद्धाश्रम सुरू केले आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना स्वत:चा निधी उभा करून वृद्धाश्रम चालवावा लागत असल्याने काही अंशी यातील वृद्धांना सोयीसुविधा देताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या वृद्धांची आयुष्याची सायंकाळ आनंदमयी व्हावी, या उद्देशाने रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेऊन ‘आनंदाश्रम’ सुरू करण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली. २३ मार्च १०१४मध्ये कुवारबाव येथे गेली कित्येक वर्षे विनावापर पडून असलेल्या शासनाच्या दोन एकर जागेसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला. मुख्यमंत्र्यांकडूनही याबाबत हिरवा कंदील मिळाला. त्यानुसार महसूल विभागाच्या मुख्य सचिवांनी जिल्हा प्रशासनाकडून शिफारस मागितली. ज्येष्ठ नागरिक संघाला यामुळे समाधान मिळाले. पण घडले उलटेच, १० वर्षात शासकीय कार्यालयांची आवश्यकता ध्यानी घेऊन प्रशासनाने जागा नामंजूर केली. वृद्धांबाबत घरची मंडळी, शासन उदासीन असले तरी न्यायालयाने २००७ सालापासून ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हितकारक निर्णय दिले आहेत. त्यातील महत्त्वाचा म्हणजे वृद्धाश्रम बांधणाऱ्या संस्थांना जागा उपलब्ध करून द्याव्यात, असे उच्च न्यायालयाने २३ डिसेंबर २०१०मध्ये आदेश देऊनही जल्हा प्रशासनाने हे आदेशच धुडकावून लावले आहेत. ५० ज्येष्ठांसाठी आरोग्य सेवेसह सुसज्ज अशा ‘आनंदाश्रमा’साठी आतापासूनच देणगीदाते पुढे आले आहेत. यातून येथील ज्येष्ठ नागरिक संघाने ८ लाखापर्यंत निधी जमवला आहे. मात्र, आता त्यासाठी जिल्हा प्रशासनानेच जागा नाकारल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाबाबत प्रशासन किती उदासीन आहे, त्याची कल्पना येते. (प्रतिनिधी)२००७ साली वृद्धाश्रमाबाबत कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी २०१०मध्ये शासनाने अध्यादेश काढला. यात प्रत्येक जिल्ह्यात एक वृद्धाश्रम असावा, असे नमूद करण्यात आले होते. मात्र, आता या अध्यादेशाकडे दुर्लक्ष होत असलेले दिसून येत आहे. त्यामुळे इतर दिनांप्रमाणेच वृध्द मंडळींनाही ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करून एका दिवसापुरता मान देण्याचा प्रयत्न चालवलाय की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. मात्र, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचायला हव्यात. यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ प्रयत्न करत आहे. यातूनच आमचे वृद्धाश्रमासाठी प्रयत्न आहेत. यासाठी शासनस्तरावर सहकार्याची गरज आहे.- डॉ. श्रीरंग कद्रेकरअध्यक्ष, रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ.