शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

हत्तींना मारणे हा सुटकेचा पर्याय नाही

By admin | Updated: July 10, 2014 23:39 IST

विद्यार्थी प्राणीमित्र संघटनेचे निवेदन

सावंतवाडी : कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील हत्तींकडून झालेले नुकसान समर्थनीय नाही. मात्र, त्यांना मारण्याचा निर्णय घेऊन आक्रमक नागरिकांना शांत करण्याचा घेण्यात आलेला निर्णय चुकीचा आहे. या हत्तींचे पुनर्वसन करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी प्राणीमित्र संघटनेनेने केली आहे.कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे हत्तींच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हत्तींनी शेतकऱ्यांचा जीवही घेतला आहे. दोन महिन्यात हत्तीबाधित क्षेत्रातील तीन जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे माणगाव येथे गेलेल्या लोकप्रतिनिधी व वन अधिकाऱ्यांनी हत्तींना मारण्याचा काढलेला मार्ग चुकीचा आहे. जर एखाद्या आरोपीलाही न्यायालय चांगल्या वागण्याच्या अटीवर सोडून देऊन त्याला जीवन जगण्याची संधी देत असेल तर जंगली प्राण्यांचे संवर्धनही होणे गरजेचे आहे. भविष्याचा विचार करता जिल्ह्यातील वन्यप्राण्यांचे संवर्धन गरजेचे असल्याने या हत्तींना जेरबंद करत त्यांचे जंगलांमध्ये पुनर्वसन करणे आवश्यक आहे. (वार्ताहर)केवळ लोकांच्या संतप्त भावना शांत करण्यासाठी हत्तींना मारण्याचा घेतलेला निर्णय योग्य नसून त्यांच्या पुनर्वसनाकडे लक्ष पुरविले जाण्याची गरज असल्याचे विद्यार्थी प्राणी मित्र संघटनेचे म्हणणे आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून सावंतवाडी तहसीलदार, वनअधिकारी यांनाही याची प्रत देण्यात आली आहे. हत्तींनाही जीवन जगण्याचा हक्क असून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात १८५ विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करुन पाठिंबा दर्शविलेला आहे.