शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

कऱ्हाड-चिपळूण मार्गाचा बागुलबुवा

By admin | Updated: March 3, 2015 00:35 IST

मोहन केळुसकर यांचा सुरेश प्रभूंवर आरोप

कणकवली : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात कऱ्हाड-चिपळूण या नवीन मार्गासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वास्तविक या मार्गावर कोयना धरण असून या धरणाच्या पाण्यापासून वीजनिर्मिती करणारे संयंत्रे जमिनीखाली १०० मीटर खोदाई करून बसविली आहेत. त्यामुळे भौगोलिक आणि व्यवहारीदृष्ट्या कऱ्हाड-चिपळूण हा रेल्वे मार्ग म्हणजे प्रभंूचा बागलबुवा आहे. जागतिक स्तरावर जलवाहतूक स्वस्त असल्याने बंदरांना कमालीचे महत्त्व आले आहे. या परिस्थितीत प्रभूंनी केवळ पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला खूृश करण्यापेक्षा कोल्हापूर-रत्नागिरी किंवा कणकवलीला जोडणाऱ्या मार्गाची घोषणा केली असती तर हे मार्ग पुढे बंदरांना जोडता आले असते. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांची ही घोषणा केवळ बागलबुवा आहे, अशी टीका कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी शनिवारी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.या प्रसिद्धीपत्रकात केळुसकर म्हणाले, कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाची मागणी ही केवळ राज्याच्या अथवा कोकणच्या भल्यासाठी नाही. या मार्गामुळे देशाचा उत्तर-दक्षिण भाग जवळच्या मार्गावरून जोडला गेला आहे. संरक्षणाच्यादृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे जलद वाहतुकीच्यादृष्टीने या मार्गाचे दुपदरीकरण तातडीने होणे हे देशाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. प्रभूंच्या स्वप्नातील ५० हजार रोजगार निर्मितीची क्षमता दुपदरीकरणामुळे फलद्रुप होईल. कऱ्हाड-चिपळूण मार्ग झाला तर त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, बागायतदार, साखर कारखाने, उद्योगांना होणार आहे. त्याऐवजी कोल्हापूर-रत्नागिरी अथवा कणकवलीला जोडणारा मार्ग हवा. त्यातही विजयदुर्ग बंदर होऊ घातले आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पही मार्गी लागणार आहे. त्यामुळे कोल्हापूर ते विजयदुर्ग हा बंदर जोडणारा मार्ग संयुक्त ठरेल. त्यामुळे कोकणासह राज्यातील सर्व पक्षांच्या खासदारांनी या रेल्वेच्या दुपदरीकरणासह बंदराला जोडणारा मार्ग होण्यासाठी रेल्वे मंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी लॉबी निर्माण करायला हवी. (प्रतिनिधी)