शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

‘जलशिवार’ने तहान भागणार

By admin | Updated: November 11, 2015 23:47 IST

रत्नागिरी जिल्हा : ३९१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली...!

रत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षीपासून जलयुक्त शिवार योजना राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्याला पाचप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ४७ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याच्या पाणीसाठ्यात १५४०.५ दशलक्ष घनमीटर इतकी वाढ झाली आहे. संरक्षित सिंचनामुळे ५८६.६१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार असून, ३९१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. यावर्षी निम्मा पाऊस झाल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईचा धोका आहे. कोकणातील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे पाणी जमिनीवाटे नदी, नाले, समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे पाणी अडवण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. सध्या शासनाकडून लोकसहभागातून बंधारे उभारण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडून बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वनराई बंधारे, कच्चे बंधारे आणि विजय बंधारे उभारण्याचे काम सुरू आहे. ग्रामसेवक, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था बंधारे उभारण्याच्या कामात सहभाग होत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २०७० बंधारे उभारण्यात आले आहेत. लोकसहभागातून भविष्यात १० हजार बंधारे उभारण्याचे काम पूर्ण करून करोडो लीटर पाण्याची बचत करण्याचे उद्दिष्ट निश्चत करण्यात आले आहे.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ५६४.९९ हेक्टर क्षेत्रावर समतल चर मारल्यामुळे ४८५.५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. १६ हेक्टर क्षेत्रावर मजगी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे १५४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. ४३.१२ दशलक्ष घनमीटर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आहे. ३० शेततळी उभारण्यात आली आहेत. एका शेततळ्यात २.९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होतो. त्यामुळे शेततळ्यांव्दारे १३१.७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. ३९.९६ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे.जिल्ह्यात ३५ नालाबांध बांधण्यात आले आहेत. त्यामुळे ५६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. १३०.६० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. २० माती नाला बांध बांधण्यात आले असून, २४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. ७६.४ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यात १५४०.५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला असून, पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. ३९१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार असल्यामुळे दुबार पीक घेणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)श्रमदानातून बंधारे : ग्रामस्थांचा सहभाग1राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना जाहीर केल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही ग्रामस्थ श्रमदानाने बंधारे बांधून पाणी अडवण्याच्या कामी पुढे येताना दिसत आहेत.2दापोली, गुहागर या तालुक्यात या बंधाऱ्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून, त्याठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कृतीतून इतर गावांनाही प्रेरणा मिळू लागली आहे.3यंदा पाऊस कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाई जाणवणार हे निश्चित आहे. प्रतिवर्षी पाणीटंचाईवर करोडो रुपयांचा खर्च होतो. यावर्षी तर तो आणखीन वाढण्याची शक्यता आहे.