शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘जलशिवार’ने तहान भागणार

By admin | Updated: November 11, 2015 23:47 IST

रत्नागिरी जिल्हा : ३९१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली...!

रत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षीपासून जलयुक्त शिवार योजना राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्याला पाचप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ४७ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याच्या पाणीसाठ्यात १५४०.५ दशलक्ष घनमीटर इतकी वाढ झाली आहे. संरक्षित सिंचनामुळे ५८६.६१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार असून, ३९१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. यावर्षी निम्मा पाऊस झाल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईचा धोका आहे. कोकणातील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे पाणी जमिनीवाटे नदी, नाले, समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे पाणी अडवण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. सध्या शासनाकडून लोकसहभागातून बंधारे उभारण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडून बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वनराई बंधारे, कच्चे बंधारे आणि विजय बंधारे उभारण्याचे काम सुरू आहे. ग्रामसेवक, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था बंधारे उभारण्याच्या कामात सहभाग होत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २०७० बंधारे उभारण्यात आले आहेत. लोकसहभागातून भविष्यात १० हजार बंधारे उभारण्याचे काम पूर्ण करून करोडो लीटर पाण्याची बचत करण्याचे उद्दिष्ट निश्चत करण्यात आले आहे.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ५६४.९९ हेक्टर क्षेत्रावर समतल चर मारल्यामुळे ४८५.५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. १६ हेक्टर क्षेत्रावर मजगी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे १५४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. ४३.१२ दशलक्ष घनमीटर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आहे. ३० शेततळी उभारण्यात आली आहेत. एका शेततळ्यात २.९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होतो. त्यामुळे शेततळ्यांव्दारे १३१.७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. ३९.९६ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे.जिल्ह्यात ३५ नालाबांध बांधण्यात आले आहेत. त्यामुळे ५६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. १३०.६० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. २० माती नाला बांध बांधण्यात आले असून, २४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. ७६.४ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यात १५४०.५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला असून, पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. ३९१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार असल्यामुळे दुबार पीक घेणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)श्रमदानातून बंधारे : ग्रामस्थांचा सहभाग1राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना जाहीर केल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही ग्रामस्थ श्रमदानाने बंधारे बांधून पाणी अडवण्याच्या कामी पुढे येताना दिसत आहेत.2दापोली, गुहागर या तालुक्यात या बंधाऱ्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून, त्याठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कृतीतून इतर गावांनाही प्रेरणा मिळू लागली आहे.3यंदा पाऊस कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाई जाणवणार हे निश्चित आहे. प्रतिवर्षी पाणीटंचाईवर करोडो रुपयांचा खर्च होतो. यावर्षी तर तो आणखीन वाढण्याची शक्यता आहे.