शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
14
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
15
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
16
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
17
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
18
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
19
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
20
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा

मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अटकाव

By admin | Updated: July 10, 2014 00:28 IST

रेडी सरपंचांसह बाराजण ताब्यात : कोणतीही कारवाई न करताच सोडले, जमीनदारांची कारवाईबाबत तक्रार

वेंगुर्ले : कनयाळ येथे होणारा तेरेखोल ते रेडी बंदर रस्त्याची मोजणी करण्यास आलेल्या प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षण, तलाठी, भूमिअभिलेख अधिकारी यांना कनयाळ येथील जमीन मालकांनी जाब विचारल्याने रेडी सरपंच सुरेखा कांबळी यांच्यासह १२ जणांना वेंगुर्ले पोलिसांनी बुधवारी सकाळी ताब्यात घेतले. मात्र, कोणतीही कारवाई न करता सायंकाळी उशिरा त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान, आपल्या जमिनीत घुसून मोजणी व सीमांकन करण्यास आलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार जमीनदारांनी पोलीस निरीक्षक रतनसिंग रजपूत यांच्याकडे केली आहे. कनयाळ येथे होणारा तेरेखोल ते रेडी हा पर्यायी रस्ता केवळ खासगी कंपनीच्या फायद्यासाठी होत आहे. त्यामुळे या रस्त्याचा जमीन संपादनाचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी कनयाळ येथील ग्रामस्थांनी सरपंच सुरेखा कांबळी यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तेरेखोल ते रेडी बंदराला जाण्यासाठी इतर रस्ते अस्तित्वात असताना खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी नवीन रस्ता केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांची होती. त्यामुळे रस्त्यासाठी जमीन संपादनास ग्रामस्थांचा विरोध आहे. जून महिन्यात बाधित शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुन्हा सीमांकन करून घेण्याचे आदेश दिले होते. परंतु आजपर्यंत पुन्हा सीमांकन झालेले नाही. त्यामुळे पुन्हा बेकायदेशीर नोटीस बजावून जमीन सीमांकन करावे, अशी लेखी मागणी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. असे असतानाही कोणतीही लेखी सूचना न देता बुधवारी सकाळी रेडी कनयाळ येथे दोन पोलीस व्हॅन व सुमारे १५० पोलिसांच्या फौजफाट्यासह प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार जगदीश कातकर, पोलीस निरीक्षक आर. बी. रजपूत, तलाठी धुरी, भूमीअभिलेखचे सर्व्हेअर चव्हाण यांनी खासगी जमिनीत घुसून थेट नीस लावून बेकायदेशीर सीमांकन कारवाई सुरू केली. त्यावेळी त्या ठिकाणी तेथील जमीनदार उपस्थित राहिले व त्यांनी त्यांना याची विचारणा केली असता, आम्ही वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सरपंच सुरेखा कांबळी यांच्यासह नीलेश कामत, प्रकाश कामत, महादेव मराठे, सुनील सातजी, प्रमोद राऊळ, दत्तगुरू मराठे, प्रशांत कांबळे, गजानन राऊळ, अजित राणे, हरेष राणे, लक्ष्मीकांत राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले. या सर्वांचे जाबजबाब घेऊन सायंकाळी उशिरा त्यांना सोडून देण्यात आले. रेडी पोर्ट विकासासाठी शासनाने जॉन अर्नेस्टला कराराने दिलेला रेडी पोर्ट ५ वर्षे होऊनही कोणताही विकास अद्यापपर्यंत झालेला नाही. असे असताना फक्त जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन ती खासगी कंपनीच्या घशात घालण्याचा घाट राजकीय दबावाखाली प्रशासन करीत असल्याची प्रतिक्रिया रेडी ग्रामस्थांनी दिली. आताचे संपादित जमिनीतून जाणारा रस्ता तेरेखोल ते मारुती मंदिरपर्यंत जातो. त्यामुळे ज्या बंदरासाठी रस्ता संपादित केला जातो, तो हेतू पूर्ण होत नाही. पाच वर्षात रेडी पोर्टने मनमानी कारभार चालविला आहे. शासन म्हणजे स्थानिकांना विश्वासात घेऊन विकास करा. परंतु रेडी पोर्ट मनमानी कारभार करीत आहे. बेकायदेशीरपणे संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीत १२ घरे, मंदिरे व स्मशानभूमीत गुरांचे वाडे येत असल्याने त्या संपादनाला विरोध असल्याचे रेडी सरपंच सुरेखा कांबळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. वेंगुर्ले पोलीस ठाण्यात सरपंच सुरेखा कांबळी यांच्यासह ताब्यात घेतलेल्या १२ जमीनदारांशी तहसीलदार जगदीश कातकर, पोलीस निरीक्षक रतनसिंग रजपूत यांनी जमीनमालकांचे वकील अ‍ॅड. प्रमोद आजगावकर यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आले. (प्रतिनिधी)