शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतीव्यवसायाशी निगडित उद्योगाला प्राधान्य

By admin | Updated: July 10, 2016 01:38 IST

नाटळ येथील माउली बचतगट : एकीच्या बळाची प्रचिती; जिल्ह्यातील तरुणाईपुढे ठेवला आदर्श

कनेडी : आपला देश शेतीप्रधान आहे. येथे शेतकऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासन विविध प्रयोग करून कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल करत आहे. हे ओळखून शेतीला झुकते माप देत नाटळ-राजवाडी येथील महिलांनी एकत्र येत माउली बचतगटाची स्थापना केली. अजूनपर्यंत एकदाही कर्ज न घेता या बचतगटाने भरारी घेतली आहे. गटाच्या माध्यमातून एकीचे बळ काय असते हे या महिलांनी दाखवून दिले. या गटाच्या अध्यक्षा रेखा सावंत व सचिव सुखदा सावंत यांना पूर्वीपासूनच शेती व्यवसायाची आवड होती. त्यांनी शेती व्यवसायात पतीसोबत शेतात राबत आदर्श शेतकऱ्याचा मानही पटकावलेला आहे. नोकरीनिमित्त शहराकडे धाव घेणाऱ्या तरुणाईला कुठेतरी आळा बसावा या उद्देशाने त्यांनी काही महिलांना एकत्र आणत आपले विचार, आपला उद्देश पटवून सांगितला. महिलाही त्यांच्या मताशी सहमत होत गेल्या आणि १४ जणींचा माउली बचतगट स्थापन झाला. २९ मे २०१४ रोजी स्थापन झालेल्या गटातील महिलांनी शेतीला महत्त्व देत येथील शेतकऱ्यांना भातबियाण्यांची विक्री केली. कारण गरीब कुटुंबातील या महिलांकडे मोठा उद्योग करण्याकरिता आर्थिक भांडवल नव्हते. आर्थिक कुवतीप्रमाणे शेती हंगामास सुरुवात झाल्याने त्यांनी भात बियाण्यांची घरोघरी जाऊन विक्री केली व येथील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करीत त्यांना मदतीचा हात दिला. या छोटेखानी व्यवसायात थोडा फायदा झाला. त्यातून या महिलांनी गांडूळ खत प्रकल्पाचे स्वप्न पाहिले. नाटळ राजवाडी हा भाग तसा पाहता पशुपालनास पोषक असा आहे. कारण येथे माळरान असून डोंगरदऱ्यांनी सुजलाम असा हा भाग आहे. या सर्वांची मुबलकता ओळखून महिलांनी शेळी व्यवसाय करण्याचे धाडस केले खरे; परंतु या व्यवसायात जंगली प्राण्यांपासून त्यांना हार पत्करावी लागली. या व्यवसायात तोटा झाल्याने खचून न जाता नव्या दमाने त्यांनी गाई, म्हैशी पाळून दुग्धव्यवसाय चालू केला. या व्यवसायात दुहेरी फायदा झाला. गांडूळ खतासाठी शेण मिळाले. त्याचप्रमाणे घरोघरी दुधाची विक्री केल्याने व्यवसायात चांगला जम बसला. गटातील महिलांचे मनोबल वाढत गेले. व्यवसाय दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होता. महिलांच्या चेहऱ्यावर आनंदमय झळाळी दिसत होती. आज खऱ्या अर्थाने त्या भक्कमपणे स्वत:च्या पायावर उभ्या होत्या. नोकरीनिमित्त शहराकडे जाण्याची मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे. इतका तरुण खरोखरच शेती व्यवसायात उत्तुंग भरारी घेऊ शकतो, हे पुन्हा ओळखून हळद लागवड करण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावर केलेली हळद भरघोस पीक देऊन गेली. शेतीत बऱ्यापैकी बस्तान बसल्याने इतर जोडधंद्यांना सुरुवात केली. यामध्ये त्यांनी लग्न समारंभ, पूजा, गृहप्रवेशसारख्या कार्यक्रमात जेवण बनविण्याची कामे गटामार्फत करू लागल्या. त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी सणाला फुलांचे हार बनवून घरोघरी वितरित करण्याची कामे या महिला करू लागल्या. या व्यवसायातून बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता आलेल्या गटातील महिलांनी बेकारी हा एक शत्रू आहे त्याच्याबरोबर कसे लढले पाहिजे, त्यावर कशी मात केली पाहिजे हे लोकांना स्वत:च्या कृतीतून दाखवून दिले.आपल्याप्रमाणेच गावातील इतर महिलांना बेकारीच्या भस्मासुरापासून वाचविण्यासाठी त्यांनी एकत्रित हळदी-कुंकू, सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागृती करून मार्गदर्शन करत समाजसुधारणेचा विडा उचलला होता. महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही या गटाच्या माध्यमातून केले जात होते.अध्यक्ष रेखा सावंत व सचिव सुखदा सावंत यांना त्यांच्या यशाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, माणसाकडे प्रामाणिक, चिकाटी, श्रम करण्याची मानसिकता हे गुण असतील तर कुठलेही शिखर पादाक्रांत केले जाईल. ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते हे आम्ही सिद्ध करून दाखविले आहे. इथला तरुण नोकरीनिमित्त शहराकडे न जाता येथील शेतीमध्ये हरितक्रांती करून इथेच स्थायिक होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आम्हाला खात्री आहे की, एक ना एक दिवस हे स्वप्न नक्कीच सत्यात उतरेल.या गटामध्ये उपाध्यक्ष स्नेहा संजय सावंत, गीता गोविंद सावंत, रत्नप्रभा विलास सावंत, साक्षी समीर सावंत, संजना सतीश सावंत, नीता नीलेश सावंत, नीलम नरेंद्र सावंत, श्रेया गुरुदत्त सावंत, सायली सतीश सावंत, रत्नप्रभा सिताराम सावंत, विलासिनी विकास तेली आणि यशोदा महादेव तेली यांचा समावेश आहे. -मिलिंद डोंगरेसांघिक शेतीला महत्त्व‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे शेती हा आत्मा समजून सांघिक शेतीवर या महिलांनी भर दिला. सांघिक महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देत या महिलांनी एकमेकांची शेती करून देण्यास सुरुवात केली. यातून वेळ, पैसा, मनुष्यबळाची कमतरता या सर्व समस्यांवर रामबाण उपाय मिळाल्याने शेती व्यवसाय वाढण्यासाठी या महिलांनी कळत-नकळत मदत केली आहे. डोंगरावर झाडांचे संगोपनहळद ही बहुगुणी व बहुपयोगी असल्याने तिला सध्या जास्त भाव आहे हे सर्वांनाच समजले. गटाच्या माध्यमातून १ जुलै रोजी जागतिक कृषिदिनानिमित्त येथील डोंगरावर विविध प्रकारची झाडे लावली. या झाडांचे संगोनपही आपण करणार असल्याचे रेखा सावंत यांनी सांगितले.