शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
5
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
6
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
7
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
8
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
9
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
10
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
11
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
12
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
13
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
14
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
15
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
16
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
17
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
18
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
19
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
20
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...

चौपदरीकरणासाठी जमीन मोजणी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: August 1, 2015 00:22 IST

मुंबई-गोवा महामार्ग : संगमेश्वर जवळ होणार उड्डाणपूल; चिपळूण, पाली, लांजा, राजापुरात पर्यायी मार्ग

प्रकाश वराडकर- रत्नागिरी -मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या वाढीव जमीन मोजणीचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, पाली व लांजा या बाजारपेठांतून महामार्ग चौपदरीकरणाला विरोध झाल्याने शहराबाहेरून पर्यायी मार्ग (बायपास रोड), तर संगमेश्वरमध्ये उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जमीन मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.गेल्या दीड दशकांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली जात होती. या मार्गावर आजवर शेकडो प्रवाशांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. ‘डेड ट्रॅक’ अशी भयावह ओळख झालेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पत्रकारांनी विशेष पुढाकार घेतला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रत्नागिरी दौऱ्यावेळी महामार्ग चौपदरीकरणाची घोषणा केली. त्यासाठी पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच जमीन मोजणीचे आदेशही दिले. पनवेल, महाड, पणजी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (जुना क्र. १७) असून, रस्ते वाहतूूक व महामार्ग मंत्रालयाने या मार्गापैकी इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३६६.१७० किलोमीटर्स भागाच्या चौपदरीकरण कामाला २१ जून २०१३, ४ जून २०१३ व ६ जून २०१३ अन्वये मान्यता दिली होती. इंदापूर ते कशेडी पायथा हा ८४.०० ते १६१.०० किलोमीटरचा पहिला टप्पा आहे. कशेडी पायथा ते संगमेश्वर ओझरखोल हा १६१ ते २६५ किलोमीटरचा टप्पा आहे. संगमेश्वर ओझरखोेल ते राजापूर हा २६५ ते ३५१ किलोमीटर अंतराचा तिसरा टप्पा आहे. राजापूर ते झाराप (गोवा) हा ३५१ ते ४५० किलोमीटर अंतराचा चौथा टप्पा आहे. (प्रतिनिधी)आहे.बाजारपेठा ओस पडणार ?चिपळूण, पाली, लांजा या बाजारपेठांमधून चौपदरीकरणास विरोध झाल्याने बाजारपेठेबाहेरून महामार्गासाठी पर्यायी जागेतून चौपदरीकरण होणार आहे. संगमेश्वरमध्येही उड्डाण पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे चौपदरीकरणानंतर या बाजारपेठात बाहेरून वाहने न येता थेट वळसा घालून पुढील मुक्कामाला जाणार आहेत. परिणामी या बाजारपेठा ओस पडण्याची भीती व्यक्त होत आहे. लांजा बाजारपेठेत तर ५० टक्के उलाढाल ही बाहेरून वाहनाने येणाऱ्यांकडून होत असल्याचीही चर्चा ३४ हजार झाडांची कत्तलरायगड जिल्ह्यातील ४५, रत्नागिरीतील १०४, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० मिळून महामार्ग चौपदरीकरणासाठी या तिन्ही जिल्ह्यांतील १८९ गावांतील वाढीव जमीन घेतली जाणार आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जमिनीखालील केबल्स, रोहित्रे, भारत संचार निगमचे खांब, जलवाहिनी यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. वनविभागाची चौपदरीकरणाच्या जागेत येणारी ३४,०६५ झाडे तोडावी लागणार आहेत. --राजापूरचा विषय केंद्राकडेजिल्ह्यात राजापूरमध्ये काही धार्मिक प्रार्थनास्थळांची काही जागा तसेच हनुमान मंदिर पूर्णत: चौपदरीकरणात जाणार असल्याने हे मंदिर वाचविण्याची स्थानिकांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे याठिकाणी बायपास रोडचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, याबाबतचा अहवाल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग मंत्रालयाकडे निर्णयासाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे राजापूरबाबतचा निर्णय प्रतीक्षेत आहे. तरीही या ठिकाणी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव विचाराधीन आहे.