शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

चौपदरीकरणासाठी जमीन मोजणी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: August 1, 2015 00:22 IST

मुंबई-गोवा महामार्ग : संगमेश्वर जवळ होणार उड्डाणपूल; चिपळूण, पाली, लांजा, राजापुरात पर्यायी मार्ग

प्रकाश वराडकर- रत्नागिरी -मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या वाढीव जमीन मोजणीचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, पाली व लांजा या बाजारपेठांतून महामार्ग चौपदरीकरणाला विरोध झाल्याने शहराबाहेरून पर्यायी मार्ग (बायपास रोड), तर संगमेश्वरमध्ये उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जमीन मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.गेल्या दीड दशकांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली जात होती. या मार्गावर आजवर शेकडो प्रवाशांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. ‘डेड ट्रॅक’ अशी भयावह ओळख झालेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पत्रकारांनी विशेष पुढाकार घेतला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रत्नागिरी दौऱ्यावेळी महामार्ग चौपदरीकरणाची घोषणा केली. त्यासाठी पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच जमीन मोजणीचे आदेशही दिले. पनवेल, महाड, पणजी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (जुना क्र. १७) असून, रस्ते वाहतूूक व महामार्ग मंत्रालयाने या मार्गापैकी इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३६६.१७० किलोमीटर्स भागाच्या चौपदरीकरण कामाला २१ जून २०१३, ४ जून २०१३ व ६ जून २०१३ अन्वये मान्यता दिली होती. इंदापूर ते कशेडी पायथा हा ८४.०० ते १६१.०० किलोमीटरचा पहिला टप्पा आहे. कशेडी पायथा ते संगमेश्वर ओझरखोल हा १६१ ते २६५ किलोमीटरचा टप्पा आहे. संगमेश्वर ओझरखोेल ते राजापूर हा २६५ ते ३५१ किलोमीटर अंतराचा तिसरा टप्पा आहे. राजापूर ते झाराप (गोवा) हा ३५१ ते ४५० किलोमीटर अंतराचा चौथा टप्पा आहे. (प्रतिनिधी)आहे.बाजारपेठा ओस पडणार ?चिपळूण, पाली, लांजा या बाजारपेठांमधून चौपदरीकरणास विरोध झाल्याने बाजारपेठेबाहेरून महामार्गासाठी पर्यायी जागेतून चौपदरीकरण होणार आहे. संगमेश्वरमध्येही उड्डाण पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे चौपदरीकरणानंतर या बाजारपेठात बाहेरून वाहने न येता थेट वळसा घालून पुढील मुक्कामाला जाणार आहेत. परिणामी या बाजारपेठा ओस पडण्याची भीती व्यक्त होत आहे. लांजा बाजारपेठेत तर ५० टक्के उलाढाल ही बाहेरून वाहनाने येणाऱ्यांकडून होत असल्याचीही चर्चा ३४ हजार झाडांची कत्तलरायगड जिल्ह्यातील ४५, रत्नागिरीतील १०४, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० मिळून महामार्ग चौपदरीकरणासाठी या तिन्ही जिल्ह्यांतील १८९ गावांतील वाढीव जमीन घेतली जाणार आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जमिनीखालील केबल्स, रोहित्रे, भारत संचार निगमचे खांब, जलवाहिनी यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. वनविभागाची चौपदरीकरणाच्या जागेत येणारी ३४,०६५ झाडे तोडावी लागणार आहेत. --राजापूरचा विषय केंद्राकडेजिल्ह्यात राजापूरमध्ये काही धार्मिक प्रार्थनास्थळांची काही जागा तसेच हनुमान मंदिर पूर्णत: चौपदरीकरणात जाणार असल्याने हे मंदिर वाचविण्याची स्थानिकांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे याठिकाणी बायपास रोडचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, याबाबतचा अहवाल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग मंत्रालयाकडे निर्णयासाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे राजापूरबाबतचा निर्णय प्रतीक्षेत आहे. तरीही या ठिकाणी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव विचाराधीन आहे.