शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणासाठी जमीन मोजणी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: August 1, 2015 00:22 IST

मुंबई-गोवा महामार्ग : संगमेश्वर जवळ होणार उड्डाणपूल; चिपळूण, पाली, लांजा, राजापुरात पर्यायी मार्ग

प्रकाश वराडकर- रत्नागिरी -मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या वाढीव जमीन मोजणीचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, पाली व लांजा या बाजारपेठांतून महामार्ग चौपदरीकरणाला विरोध झाल्याने शहराबाहेरून पर्यायी मार्ग (बायपास रोड), तर संगमेश्वरमध्ये उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जमीन मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.गेल्या दीड दशकांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली जात होती. या मार्गावर आजवर शेकडो प्रवाशांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. ‘डेड ट्रॅक’ अशी भयावह ओळख झालेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पत्रकारांनी विशेष पुढाकार घेतला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रत्नागिरी दौऱ्यावेळी महामार्ग चौपदरीकरणाची घोषणा केली. त्यासाठी पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच जमीन मोजणीचे आदेशही दिले. पनवेल, महाड, पणजी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (जुना क्र. १७) असून, रस्ते वाहतूूक व महामार्ग मंत्रालयाने या मार्गापैकी इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३६६.१७० किलोमीटर्स भागाच्या चौपदरीकरण कामाला २१ जून २०१३, ४ जून २०१३ व ६ जून २०१३ अन्वये मान्यता दिली होती. इंदापूर ते कशेडी पायथा हा ८४.०० ते १६१.०० किलोमीटरचा पहिला टप्पा आहे. कशेडी पायथा ते संगमेश्वर ओझरखोल हा १६१ ते २६५ किलोमीटरचा टप्पा आहे. संगमेश्वर ओझरखोेल ते राजापूर हा २६५ ते ३५१ किलोमीटर अंतराचा तिसरा टप्पा आहे. राजापूर ते झाराप (गोवा) हा ३५१ ते ४५० किलोमीटर अंतराचा चौथा टप्पा आहे. (प्रतिनिधी)आहे.बाजारपेठा ओस पडणार ?चिपळूण, पाली, लांजा या बाजारपेठांमधून चौपदरीकरणास विरोध झाल्याने बाजारपेठेबाहेरून महामार्गासाठी पर्यायी जागेतून चौपदरीकरण होणार आहे. संगमेश्वरमध्येही उड्डाण पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे चौपदरीकरणानंतर या बाजारपेठात बाहेरून वाहने न येता थेट वळसा घालून पुढील मुक्कामाला जाणार आहेत. परिणामी या बाजारपेठा ओस पडण्याची भीती व्यक्त होत आहे. लांजा बाजारपेठेत तर ५० टक्के उलाढाल ही बाहेरून वाहनाने येणाऱ्यांकडून होत असल्याचीही चर्चा ३४ हजार झाडांची कत्तलरायगड जिल्ह्यातील ४५, रत्नागिरीतील १०४, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० मिळून महामार्ग चौपदरीकरणासाठी या तिन्ही जिल्ह्यांतील १८९ गावांतील वाढीव जमीन घेतली जाणार आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जमिनीखालील केबल्स, रोहित्रे, भारत संचार निगमचे खांब, जलवाहिनी यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. वनविभागाची चौपदरीकरणाच्या जागेत येणारी ३४,०६५ झाडे तोडावी लागणार आहेत. --राजापूरचा विषय केंद्राकडेजिल्ह्यात राजापूरमध्ये काही धार्मिक प्रार्थनास्थळांची काही जागा तसेच हनुमान मंदिर पूर्णत: चौपदरीकरणात जाणार असल्याने हे मंदिर वाचविण्याची स्थानिकांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे याठिकाणी बायपास रोडचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, याबाबतचा अहवाल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग मंत्रालयाकडे निर्णयासाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे राजापूरबाबतचा निर्णय प्रतीक्षेत आहे. तरीही या ठिकाणी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव विचाराधीन आहे.