शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

बागायतदारांवर अस्मानी संकट

By admin | Updated: March 3, 2015 00:28 IST

आंबा पीक धोक्यात : उपासमारीची वेळ, प्रशासनाकडून नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवार रात्रीपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी तसेच आंबा, काजू बागायतदारांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आंब्याचा मोसम सुरू होतानाच पावसाने हजेरी लावल्याने कर्ज काढून झाडांची मशागत केलेल्या बागायतदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अस्मानी संकटाने येथील शेतकरी हवालदील झाला आहे. सर्वत्र आंब्याचा मोहोर गळून पडल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आंबा आणि काजू नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करून जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्तांनी सोमवारी सादर केला.शनिवारपासून पडत असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसला असून प्रशासनाने याबाबत प्राथमिक अहवाल तयार केला आहे. यात जिल्ह्यातील एकूण ५४७ गावांमधील ४९४१ शेतकऱ्यांच्या ४,७३४ हेक्टर आंबा पिकाची नुकसानी झाली आहे. तर काजू पिकाबाबत जिल्ह्यातील ४८८ गावांमधील ४0९९ शेतकऱ्यांच्या ३६७४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात शनिवारी हजेरी लावलेल्या पावसाने रविवारीही सातत्य राखले होते. दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे बागायतदार, शेतकरी नाराज झाले आहेत. देवगड तालुक्यातील कोटकामते कुंभारवाडी येथील उत्तम हिंदळेकर यांची १० एकर आंबा पिकाची बागायत आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच विजय हिंदळेकर, प्रदीप पारकर, उत्तम दळवी, राजाराम आजगावकर, शिवराम हिंदळेकर, अनंत हिंदळेकर, शरद हिंदळेकर, कामतेकर अशा अनेक आंबा बागायतदारांचेही लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.वर्षभर हजारो आंब्यांच्या कलमांची साफसफाई, औषध फवारणी व इतर खर्च असा ४ लाख रूपयांहून खर्च एका बागायतदाराला सामान्यपणे येत असतो. मे महिन्याच्या हंगामात जर पाऊस पडला तर कर्ज काढून केलेल्या कामाची नुकसानी मोठ्या प्रमाणात होते. ही नुकसान भरपाई आम्हाला कोण देऊ शकेल? असा प्रश्न जिल्ह्यातील बागायतदारांमधून विचारला जात आहे.काजू, आंबा पिकाला जानेवारीमध्ये सुरूवात झाली होती. मात्र ऐन मोसमात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बागायतदारांवर तसेच या बागायतीवर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.देवगड हापूस आंबा हा देशात एक नंबरचा आंबा म्हणून ओळखला जातो. अचानक पडलेल्या पावसामुळे या आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा बागायतींमध्ये सर्वत्र हा आंबा जमिनीवर पडलेला दिसत आहे. आज आंब्याच्या एका डझनाची किंमत २ ते ३ हजार रूपये आहे. काही बागायतदारांचे आंबे बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. मात्र अवकाळी पावसाने बागायतदारांच्या वर्षभर केलेल्या मेहनतीवर एका झटक्यात पाणी फिरविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बागायतदार चिंतातूर बनले आहेत. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन तातडीने मदत करावी, अशी मागणी बागायतदारांमधून करण्यात येत आहे. (वार्ताहर)फोंडाघाटमध्ये दरड कोसळून वाहतूक दोन तास ठप्पअवकाळी पावसाने फोंडाघाटात सोमवारी पहाटे दरड कोसळली. यामुळे घाटमार्ग दोन तास ठप्प राहिला. अकरा वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्ववत सुरू झाली. अवकाळी पावसामुळे माती भुसभुशीत झाल्याने दरड कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास दगड आणि मातीचा मोठा ढिगारा घाटमार्गावर कोसळला. यामुळे मार्ग पूर्णत: ठप्प झाला होता. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याची माहिती मिळताच पोलिस पथक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता के. कन्नादासन आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. दोन जेसीबींच्या साहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. आठ वाजण्याच्या सुमारास एकेरी वाहतूक सुरू झाली. अकरा वाजेपर्यंत रस्त्यावरील दगड आणि माती पूर्ण हटवून मार्ग सुरळीत करण्यात आला.अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात परिस्थितीचा अहवाल शासनास तत्काळ सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत. त्याप्रमाणे वस्तुस्थितीचा अहवाल लवकरच सादर केला जाईल. मात्र शासनाकडून नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देश प्राप्त झाले नाहीत. शासन निर्देश प्राप्त होताच तत्काळ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनास सादर केला जाईल.- ई. रवींद्रन, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग