शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी दबावगट निर्माण करण्याची आवश्यकता

By admin | Updated: November 15, 2015 23:50 IST

बाळासाहेब परुळेकर यांचे प्रतिपादन : सावंतवाडीतील बागायतदारांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन

सावंतवाडी : कोकणात सेंद्रीय पद्धतीने तयार केलेल्या नारळांच्या उत्पादनाला मुंबईत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, शेतकऱ्यांना मार्केटींग करता येत नसल्याने नारळाच्या मालाला हमीभाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी दबावगट निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन कोकण कृषीभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब परू ळेकर यांनी केले. सावंतवाडी तालुक्यातील नारळ बागायतदार शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी परूळेकर बोलत होेते. याप्रसंगी माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी पुष्पसेन सावंत, सुरेश गवस, ठाणे कृषीतंत्र अधिकारी शरद आगलावे, रामानंद शिरोडकर, टी. देविदास, रमाकांत मल्हार, शंकर कलमाणी, पांडुरंग तोंडकर उपस्थित होते. यापुढे परूळेकर म्हणाले की, रासायनिक खतांचा वापर वाढल्याने निसर्गावर मानवाची कुरघोडी सुरू झाली आहे. या दहा वर्षात जमिनीचा टिकाऊपणा व पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. नारळ उत्पादनामध्ये केरळ व कोकण आघाडीवर आहेत. पण शेतकऱ्यांना मार्केटींग जमत नाही. परिणामी कोकणातील शेतकरी उत्पादन घेऊनही आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे एकत्र येऊन शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी प्रगतीशील शेतकरी यांच्या बागायतीमध्ये भेट घेऊन इतर शेतकऱ्यांनी अभ्यास करावा. सेंद्रीय पद्धतीने नारळ व नैसर्गिक वस्तूंचे उत्पादन घेतल्यास मुंबई मार्केटमध्ये त्याची मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन आणि उत्पन्न याची योग्य सांगड घालून काम केल्यास योग्य तो भाव मिळेल व शेतकऱ्यांच्या मुलांनाही नोकरी करण्याची गरज उरणार नाही. शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे. तर शेती ही प्रयोगशाळा आहे. गोमूत्र ते फिनॅल त्याने तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये किती ताकद आहे, हे यावरून दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांनी संघटीत होऊन दबावगट निर्माण करा, असे आवाहन परूळेक र यांनी केले.पुष्पसेन सावंत म्हणाले, नुसते लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहू नका. तर शेतकऱ्यांनी संघटीत होऊन आपल्या प्रश्नांबाबत प्रशासनाशी भांडणे गरजेचे आहे. ४० वर्षांच्या कालावधीत शेतकरी व बागायतदार कधीही एक झाले नाही. नवीन पिढी पॉवर ट्रिलरने शेती करतात. त्यामुळे जमीन टिकून राहत नाही. नांगराने नांगरलेलीे जमीन सुपीक होते. यामुळे नवीन पिढीने पारंपरिक शेतीही विकसित करणे आवश्यक आहे. शंकर कलमाणी यांनी नारळाच्या उत्पन्नावरच अवलंबून न राहता नारळाच्या वस्तूंवर प्रक्रिया करून छोटेमोठे उद्योग सुरू करणे आवश्यक असल्याचे सांगितले. (वार्ताहर)