शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

शेतकऱ्यांनी दबावगट निर्माण करण्याची आवश्यकता

By admin | Updated: November 15, 2015 23:50 IST

बाळासाहेब परुळेकर यांचे प्रतिपादन : सावंतवाडीतील बागायतदारांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन

सावंतवाडी : कोकणात सेंद्रीय पद्धतीने तयार केलेल्या नारळांच्या उत्पादनाला मुंबईत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, शेतकऱ्यांना मार्केटींग करता येत नसल्याने नारळाच्या मालाला हमीभाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी दबावगट निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन कोकण कृषीभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब परू ळेकर यांनी केले. सावंतवाडी तालुक्यातील नारळ बागायतदार शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी परूळेकर बोलत होेते. याप्रसंगी माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी पुष्पसेन सावंत, सुरेश गवस, ठाणे कृषीतंत्र अधिकारी शरद आगलावे, रामानंद शिरोडकर, टी. देविदास, रमाकांत मल्हार, शंकर कलमाणी, पांडुरंग तोंडकर उपस्थित होते. यापुढे परूळेकर म्हणाले की, रासायनिक खतांचा वापर वाढल्याने निसर्गावर मानवाची कुरघोडी सुरू झाली आहे. या दहा वर्षात जमिनीचा टिकाऊपणा व पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. नारळ उत्पादनामध्ये केरळ व कोकण आघाडीवर आहेत. पण शेतकऱ्यांना मार्केटींग जमत नाही. परिणामी कोकणातील शेतकरी उत्पादन घेऊनही आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे एकत्र येऊन शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी प्रगतीशील शेतकरी यांच्या बागायतीमध्ये भेट घेऊन इतर शेतकऱ्यांनी अभ्यास करावा. सेंद्रीय पद्धतीने नारळ व नैसर्गिक वस्तूंचे उत्पादन घेतल्यास मुंबई मार्केटमध्ये त्याची मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन आणि उत्पन्न याची योग्य सांगड घालून काम केल्यास योग्य तो भाव मिळेल व शेतकऱ्यांच्या मुलांनाही नोकरी करण्याची गरज उरणार नाही. शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे. तर शेती ही प्रयोगशाळा आहे. गोमूत्र ते फिनॅल त्याने तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये किती ताकद आहे, हे यावरून दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांनी संघटीत होऊन दबावगट निर्माण करा, असे आवाहन परूळेक र यांनी केले.पुष्पसेन सावंत म्हणाले, नुसते लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहू नका. तर शेतकऱ्यांनी संघटीत होऊन आपल्या प्रश्नांबाबत प्रशासनाशी भांडणे गरजेचे आहे. ४० वर्षांच्या कालावधीत शेतकरी व बागायतदार कधीही एक झाले नाही. नवीन पिढी पॉवर ट्रिलरने शेती करतात. त्यामुळे जमीन टिकून राहत नाही. नांगराने नांगरलेलीे जमीन सुपीक होते. यामुळे नवीन पिढीने पारंपरिक शेतीही विकसित करणे आवश्यक आहे. शंकर कलमाणी यांनी नारळाच्या उत्पन्नावरच अवलंबून न राहता नारळाच्या वस्तूंवर प्रक्रिया करून छोटेमोठे उद्योग सुरू करणे आवश्यक असल्याचे सांगितले. (वार्ताहर)