शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

शेतकऱ्यांनी दबावगट निर्माण करण्याची आवश्यकता

By admin | Updated: November 15, 2015 23:50 IST

बाळासाहेब परुळेकर यांचे प्रतिपादन : सावंतवाडीतील बागायतदारांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन

सावंतवाडी : कोकणात सेंद्रीय पद्धतीने तयार केलेल्या नारळांच्या उत्पादनाला मुंबईत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, शेतकऱ्यांना मार्केटींग करता येत नसल्याने नारळाच्या मालाला हमीभाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी दबावगट निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन कोकण कृषीभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब परू ळेकर यांनी केले. सावंतवाडी तालुक्यातील नारळ बागायतदार शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी परूळेकर बोलत होेते. याप्रसंगी माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी पुष्पसेन सावंत, सुरेश गवस, ठाणे कृषीतंत्र अधिकारी शरद आगलावे, रामानंद शिरोडकर, टी. देविदास, रमाकांत मल्हार, शंकर कलमाणी, पांडुरंग तोंडकर उपस्थित होते. यापुढे परूळेकर म्हणाले की, रासायनिक खतांचा वापर वाढल्याने निसर्गावर मानवाची कुरघोडी सुरू झाली आहे. या दहा वर्षात जमिनीचा टिकाऊपणा व पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. नारळ उत्पादनामध्ये केरळ व कोकण आघाडीवर आहेत. पण शेतकऱ्यांना मार्केटींग जमत नाही. परिणामी कोकणातील शेतकरी उत्पादन घेऊनही आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे एकत्र येऊन शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी प्रगतीशील शेतकरी यांच्या बागायतीमध्ये भेट घेऊन इतर शेतकऱ्यांनी अभ्यास करावा. सेंद्रीय पद्धतीने नारळ व नैसर्गिक वस्तूंचे उत्पादन घेतल्यास मुंबई मार्केटमध्ये त्याची मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन आणि उत्पन्न याची योग्य सांगड घालून काम केल्यास योग्य तो भाव मिळेल व शेतकऱ्यांच्या मुलांनाही नोकरी करण्याची गरज उरणार नाही. शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे. तर शेती ही प्रयोगशाळा आहे. गोमूत्र ते फिनॅल त्याने तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये किती ताकद आहे, हे यावरून दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांनी संघटीत होऊन दबावगट निर्माण करा, असे आवाहन परूळेक र यांनी केले.पुष्पसेन सावंत म्हणाले, नुसते लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहू नका. तर शेतकऱ्यांनी संघटीत होऊन आपल्या प्रश्नांबाबत प्रशासनाशी भांडणे गरजेचे आहे. ४० वर्षांच्या कालावधीत शेतकरी व बागायतदार कधीही एक झाले नाही. नवीन पिढी पॉवर ट्रिलरने शेती करतात. त्यामुळे जमीन टिकून राहत नाही. नांगराने नांगरलेलीे जमीन सुपीक होते. यामुळे नवीन पिढीने पारंपरिक शेतीही विकसित करणे आवश्यक आहे. शंकर कलमाणी यांनी नारळाच्या उत्पन्नावरच अवलंबून न राहता नारळाच्या वस्तूंवर प्रक्रिया करून छोटेमोठे उद्योग सुरू करणे आवश्यक असल्याचे सांगितले. (वार्ताहर)