शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

आम्ही आत्महत्या करायच्या का ?

By admin | Updated: March 3, 2015 00:36 IST

डंपर मालकांनी विचारला जाब : आंबोली घाटातून अवजड वाहतूक सुरू करण्याची मागणी

सावंतवाडी : विदर्भात ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तशा आत्महत्या डंपर मालकांना तसेच इतर व्यावसायिकांना करण्यासाठी प्रशासन भाग पाडत आहे का, असा सवाल डंपर मालक, लाकूड व्यावसायिकांबरोबरच आंबोली ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता अनामिका जाधव तसेच पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांना केला आहे. दोन दिवसांत हा रस्ता खुला केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ही दिला आहे.यावेळी माजी सभापती मंगेश तळवणेकर, पंचायत समिती सदस्य बाळा सावंत, दत्तू नार्वेकर, रामदास करंदीकर, सुनिल नार्वेकर, ओवळिये सरपंच बळिराम सावंत, आदी यावेळी उपस्थित होते.आंबोली घाटात पुलाचे काम सुरू आहे. हे काम करण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी पोलीस व बांधकाम विभागाने संयुक्तरीत्या आंबोली घाटातून अवजड वाहतूकच बंद करायची, असा निर्णय घेतला. या निर्णयानंतर त्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली होती; पण यामुळे कोल्हापूरसह चंदगड, आजरा या ठिकाणी खडी वाळू वाहतूक करणारे तसेच बेळगावला लाकूड वाहतूक करणाऱ्यांना याचा फटका बसू लागला आहे. यामुळे संतप्त डंपर चालकांसह लाकूड व्यावसायिक चांगलेच आक्रमक झाले असून, हा रस्ता तत्काळ सुरू करा, अशी मागणी लावून धरली आहे.दोन दिवसांपूर्वी याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधण्यात आले होते; पण कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या डंपर चालकांनी बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता अनामिका जाधव यांची सोमवारी भेट घेत हा रस्ता तत्काळ सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.तर पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांची ही आंदोलनकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी देसाई यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेतली; पण एकेरी वाहतूक सुरू झालीच आणि एखादी दुर्घटना घडली तर त्याला कोण जबाबदार, असा सवाल केला. यावर डंपर मालकांनी आम्ही जबाबदारी घेतो, असे उत्तर दिले. तसेच मुलांच्या परीक्षा सुरू असताना रास्ता रोको केल्यास आपल्या विरोधात गुन्हे दाखल करू, असा इशारा पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी दिला आहे.तर डंपर मालकांनीही विदर्भात जशा आत्महत्या सुरू आहेत. तशा आत्महत्या आम्ही करायच्या का, असा सवाल करीत हा रस्ता ऐन हंगामात खोदण्याचा हेतू काय, असा सवालही केला आहे. (प्रतिनिधी)पुलाचे खड्डेही पिशव्यांनी भरलेआंदोलनकर्त्यांनी या पुलाच्या कामाच्या वेगवेगळ्या सुरस कथा सांगितल्या. गरज नसताना प्रशासनाने हे काम काढले आहे. त्यातच पुलाच्या खड्ड्यात दगड माती टाकायची सोडून पिशव्या टाकल्या जात आहेत. या कामावर कोणाचे लक्ष नाही आणि पुलावर स्लॅब टाकल्यानंतर चार दिवसांत त्यावरून वाहतूक कशी सुरू करणार, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.पालकमंत्र्यांनाही प्रशासन जुमानत नाहीआंदोलनकर्त्यांनी सांगितले की, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीला भेट दिली होती. त्यावेळी आम्ही आमची कैफियत मांडली; पण पालकमंत्री त्याकडे दुर्लक्ष करीत असून आंबोलीत मोठ्या प्रमाणात निकृष्ट कामे यापूर्वी झाली तसेच आता होत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.