शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मालकीबाबत कुळांमध्येच उदासीनता

By admin | Updated: November 11, 2015 00:15 IST

दोन जिल्ह्यात अधिनियम लागू : मालकी हक्क प्रस्थापित करण्यात चिपळूण अग्रक्रमाकांवर

रत्नागिरी : कुळांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळावा, यासाठी शासनाने अगदी अल्पशी नजराणाची रक्कम भरून त्यांना मालक होण्याची संधी दिली असली तरी याबाबत कुळांमध्येच कमालीची उदासीनता दिसत आहे. याबाबत अनेक उपक्रम राबवूनही आतापर्यंत ५८ टक्के खातेदारांनीच नजराणाची रक्कम भरून मालकी प्रस्थापित केली आहे. मात्र, सर्वाधिक मालकी हक्क प्रस्थापित करण्यात चिपळूण तालुका अग्रक्रमांकावर आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ लागू करण्यात आला आहे. आता कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीची विक्री करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची गरज नाही, अशी सुधारणा या कायद्यात करण्यात आली आहे. त्यानुसार आता कुळांनी खरेदी केलेल्या जमिनीची खरेदी - विक्री, देणगी, अदलाबदल, गहाण ठेवणे, भाडेपट्ट्याने देणे, अभिहस्तांतरण यासाठी कोणत्याही पूर्वमंजुरीची आवश्यकता राहणार नाही. मात्र, त्यासाठी ४० पट नजराणा भरून मालकी हक्क प्रस्तापित करणे गरजेचे आहे. या जमिनी मालकांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी त्या जमिनीच्या आकाराच्या ४० पट नजराणा भरून सातबारावर रितसर नोंद करून घेणे अनिवार्य आहे. नजराण्याची रक्कम ही अतिशय अल्प म्हणजे अगदी पाच रुपयांपासून पुढे अशी आहे. मात्र, याबाबत कुळांमध्येच उदासीनता दिसून येत आहे. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने कुळांची मालकी प्रस्तापित होऊन त्यांचे नाव सातबारावर नोंदवण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. मात्र, त्यालाही कुळांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात एक लाख ८० हजार ७९१ खातेदार आणि २ लाख ३९ हजार १०९ पोटहिस्से आहेत. मात्र, आत्तापर्यंत ९१,५३४ खातेदारांनी १ लाख ३८ हजार ६४० पोटहिस्से यांची नजराणा रक्कम भरून जमीनीवर मालकी हक्क प्रस्थापित केला आहे. अजूनही ८९ हजार २५७ खातेदारांची नजराणा रक्कम भरावयाची आहे. कुळांना मालकी हक्क प्रस्थापित करून देण्याचे सर्वाधिक काम चिपळूण तालुक्यात झाले आहे. त्याखालोखाल गुहागर, रत्नागिरी आणि लांजाचा क्रमांक लागतो. संगमेश्वरमध्ये निम्म्यापेक्षा जास्त कुळांनी या हक्काचा लाभ घेतला आहे. मात्र, मंडणगड राजापूर आणि दापोली तालुक्यांमध्ये अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला आहे. (प्रतिनिधी)सध्या या जमिनी नियंत्रण सत्ता प्रकार (निसप्र) पद्धतीने शासनाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यावर इतर कुणीही हक्क प्रस्थापित करू शकत नाहीत. यापैकी काही सहहिस्सेदार बाहेरगावी राहतात. त्यामुळे मालकी हक्काबाबत कुळे फारसा गंभीरपणे विचार करताना दिसत नाहीत. जेव्हा जमीन विकायची असेल, तेव्हा बघू, असे म्हणत आहेत.तालुकाखातेदारनजराणा भरलेले शिल्लकमंडणगड२२,०८९३५४२१,७३५ दापोली२८,८१३३,९७२२४,८४१खेड१७,३३२१३,०४७४,७८५ चिपळूण२१,३८४२१,०३०३५४संगमेश्वर२३,६३५१२,५१७११,११८गुहागर १२,७१५११,२५५१,४६०रत्नागिरी ३१३९४२१,५२९९,८६५राजापूर१४,५०९२,६५४११,८५५लांजा ८,४२०५,१७६३,२४४एकूण१,८०,७९१९१,५३४८९,२५७आतापर्यंत ५८ टक्के खातेदारांनीच नजराणाची रक्कम भरून मालकी हक्क केला प्रस्थापित.कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीच्या विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची गरज नाही.नजराणाची रक्कम अतिशय अल्प आहे.