शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

मालकीबाबत कुळांमध्येच उदासीनता

By admin | Updated: November 11, 2015 00:15 IST

दोन जिल्ह्यात अधिनियम लागू : मालकी हक्क प्रस्थापित करण्यात चिपळूण अग्रक्रमाकांवर

रत्नागिरी : कुळांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळावा, यासाठी शासनाने अगदी अल्पशी नजराणाची रक्कम भरून त्यांना मालक होण्याची संधी दिली असली तरी याबाबत कुळांमध्येच कमालीची उदासीनता दिसत आहे. याबाबत अनेक उपक्रम राबवूनही आतापर्यंत ५८ टक्के खातेदारांनीच नजराणाची रक्कम भरून मालकी प्रस्थापित केली आहे. मात्र, सर्वाधिक मालकी हक्क प्रस्थापित करण्यात चिपळूण तालुका अग्रक्रमांकावर आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ लागू करण्यात आला आहे. आता कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीची विक्री करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची गरज नाही, अशी सुधारणा या कायद्यात करण्यात आली आहे. त्यानुसार आता कुळांनी खरेदी केलेल्या जमिनीची खरेदी - विक्री, देणगी, अदलाबदल, गहाण ठेवणे, भाडेपट्ट्याने देणे, अभिहस्तांतरण यासाठी कोणत्याही पूर्वमंजुरीची आवश्यकता राहणार नाही. मात्र, त्यासाठी ४० पट नजराणा भरून मालकी हक्क प्रस्तापित करणे गरजेचे आहे. या जमिनी मालकांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी त्या जमिनीच्या आकाराच्या ४० पट नजराणा भरून सातबारावर रितसर नोंद करून घेणे अनिवार्य आहे. नजराण्याची रक्कम ही अतिशय अल्प म्हणजे अगदी पाच रुपयांपासून पुढे अशी आहे. मात्र, याबाबत कुळांमध्येच उदासीनता दिसून येत आहे. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने कुळांची मालकी प्रस्तापित होऊन त्यांचे नाव सातबारावर नोंदवण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. मात्र, त्यालाही कुळांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात एक लाख ८० हजार ७९१ खातेदार आणि २ लाख ३९ हजार १०९ पोटहिस्से आहेत. मात्र, आत्तापर्यंत ९१,५३४ खातेदारांनी १ लाख ३८ हजार ६४० पोटहिस्से यांची नजराणा रक्कम भरून जमीनीवर मालकी हक्क प्रस्थापित केला आहे. अजूनही ८९ हजार २५७ खातेदारांची नजराणा रक्कम भरावयाची आहे. कुळांना मालकी हक्क प्रस्थापित करून देण्याचे सर्वाधिक काम चिपळूण तालुक्यात झाले आहे. त्याखालोखाल गुहागर, रत्नागिरी आणि लांजाचा क्रमांक लागतो. संगमेश्वरमध्ये निम्म्यापेक्षा जास्त कुळांनी या हक्काचा लाभ घेतला आहे. मात्र, मंडणगड राजापूर आणि दापोली तालुक्यांमध्ये अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला आहे. (प्रतिनिधी)सध्या या जमिनी नियंत्रण सत्ता प्रकार (निसप्र) पद्धतीने शासनाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यावर इतर कुणीही हक्क प्रस्थापित करू शकत नाहीत. यापैकी काही सहहिस्सेदार बाहेरगावी राहतात. त्यामुळे मालकी हक्काबाबत कुळे फारसा गंभीरपणे विचार करताना दिसत नाहीत. जेव्हा जमीन विकायची असेल, तेव्हा बघू, असे म्हणत आहेत.तालुकाखातेदारनजराणा भरलेले शिल्लकमंडणगड२२,०८९३५४२१,७३५ दापोली२८,८१३३,९७२२४,८४१खेड१७,३३२१३,०४७४,७८५ चिपळूण२१,३८४२१,०३०३५४संगमेश्वर२३,६३५१२,५१७११,११८गुहागर १२,७१५११,२५५१,४६०रत्नागिरी ३१३९४२१,५२९९,८६५राजापूर१४,५०९२,६५४११,८५५लांजा ८,४२०५,१७६३,२४४एकूण१,८०,७९१९१,५३४८९,२५७आतापर्यंत ५८ टक्के खातेदारांनीच नजराणाची रक्कम भरून मालकी हक्क केला प्रस्थापित.कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीच्या विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची गरज नाही.नजराणाची रक्कम अतिशय अल्प आहे.