शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

गरोदर मातांना घडतोय धोकादायक प्रवास ...

By admin | Updated: May 3, 2014 17:05 IST

शासनाने सुरू केलेली जननी सुरक्षा योजना चांगली असली तरी त्याचा ताण सीपीआरमधील प्रसूती विभागावर पडत आहे. प्रत्येक तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांवर उपचार करण्यास चालढकल केली जात आहे.

बाजीराव जठार (वाघापूर) : शासनाने सुरू केलेली जननी सुरक्षा योजना चांगली असली तरी त्याचा ताण सीपीआरमधील प्रसूती विभागावर पडत आहे. प्रत्येक तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांवर उपचार करण्यास चालढकल केली जात आहे. गर्भवती महिलांना रुग्णवाहिकेतून दूर अंतरावरून आणताना त्यांचा प्रवासही धोकादायक बनत असल्याचे वास्तव पुढे येत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून बहुतांशी गर्भवती महिलांना सीपीआरमध्ये पाठविले जाते. त्यामुळे सीपीआरमध्ये रुग्णांना सुविधा देताना कसरत करावी लागत आहे. जिल्‘ातील ग्रामीण भागात ११० प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत तसेच ६ ग्रामीण रुग्णालये आहेत. आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील गर्भवती महिला प्रसूतीसाठी येतात. अनेकवेळा येथे महिलांची किरकोळ तपासणी करून थेट सीपीआरकडे पाठवून दिले जाते. त्यासाठी १०८ या दूरध्वनी क्रमांकावर मिळणारी जननी सुरक्षा अभियानातील रुग्णवाहिका बोलावून घेतली जाते व त्या गाडीतून सीपीआरकडे पाठविले जाते, अशा गर्भवतींना घेऊन भरधाव वेगाने वाहतुकीचे अडथळे चुकवत सीपीआरच्या दिशेने येतात. दिवसाला किमान १५ ते २० गर्भवती सीपीआरमध्ये दाखल होतात. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात. सीपीआरमध्ये प्रसूती विभागात ६५ बेड आहेत. त्यातील प्रसूतीसाठी किमान ४० बेड वापरले जातात व इतर उपचारासाठी दाखल केलेल्या महिलांसाठी उर्वरित बेड वापरले जातात. येथे उपचार घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या बेडच्या संख्येपेक्षा जास्त महिला दाखल होतात. त्यामुळे या विभागाला अक्षरश: कसरत करून येथे सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. यामुळे गर्भवती महिलांचा प्रवास धोकादायक होतो. सीपीआरमध्ये कमी बेडची संख्या असल्याने गर्दी होते. काहीवेळेला फरशीवरच झोपावे लागते. त्याचा बाळंतिणीला त्रास होतो. सीपीआरमध्ये बाळंतिणींना दाखल करण्यासाठी शाहूवाडी, गगनबावडा, शिरोळ, गारगोटी, चंदगड अशा तालुक्यातील गावांतून रुग्णवाहिका सीपीआरपर्यंत आणल्या जातात. रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढती आहे. ते अडथळे दूर करत येथे महिलांना आणले जाते. या सार्‍यातून रुग्णवाहिकांची सोय चांगली असली तरीही रस्त्यावरील प्रवासाचा धोका मात्र वाढतो आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातून सीपीआरमध्ये महिलांना पाठविण्याची वृत्ती ही गैरसोय व धोका वाढविणारी आहे. त्यामुळे या सुविधेला दिशा देण्याची गरज आहे. बातमी जोड देत आहे.