शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

बिले पाठवलेलीच नाहीत

By admin | Updated: March 1, 2015 23:15 IST

विधानसभा निवडणूक : निवडणूक शाखेकडून उपविभागीय कार्यालयांना नोटीस

रत्नागिरी : विधानसभा निवडणुका होऊन चार महिने उलटून गेले असले तरी अजूनही जिल्ह्यातील पाच उपविभागीय कार्यालयाकडून खर्चाची बिले निवडणूक शाखेकडे जमा करण्यात आलेली नाही. आता मार्च सुरू झाल्याने ही बिले आता लागलीच सादर केली नाहीत, तर मंजूर न झालेल्या बिलाची जबाबदारी संबंधित उपविभागीय कार्यालयांवर राहील, अशी नोटीस आता निवडणूक शाखेकडून या कार्यालयांना पाठवण्यात येणार आहे.आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांच्या खर्चाची जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या खर्चाचे अधिकार या पाच उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या खर्चात प्रामुख्याने निवडणूक कर्मचारी भत्ता, मतदान जागृती अभियान, सीसीटीव्ही उपकरण, इंधन खर्च, छपाई, अतिकालिक भत्ता, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे भोजन, प्रशिक्षण, मतमोजणी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अधिकारी भत्ता, वाहतूक खर्च, इलेक्ट्रॉनिक मशीन, मतदान साहित्य आदी खर्चाचा समावेश आहे. यांपैकी काही बाबींच्या खर्चासाठी आगाऊ रक्कम निवडणूक विभागाकडून पाचही उपविभागीय कार्यालयांकडे देण्यात आली होती. तर काहींच्या खर्चाची रक्कम अद्याप देणे बाकी आहे. अजूनही निवडणुकीच्या कामगिरीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे भत्ते मिळालेले नाहीत.तसेच काही इतर खर्चही अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे हे कर्मचारी तसेच काही इतर व्यक्ती आपला झालेला खर्च कधी मिळतो, याची प्रतिक्षा करीत आहेत. मात्र, अजूनही बिलेच जिल्हा कार्यालयाकडे गेली नसल्याने खर्चाची रक्कम रखडली आहे.यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून वारंवार खर्चाची बिले सादर करण्याबाबत कळवण्यात आले आहे. मात्र, चार महिने उलटून गेले आहेत. तरी याबाबत अजूनही या कार्यालयांनी खर्चाची बिले अद्यापही जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेली नाहीत. आता मार्च महिना सुरू असल्याने हे आर्थिक वर्ष संपायला आले आहे. तरी अजूनही कुठल्याच उपविभागीय कार्यालयाला ही सर्व बिले पाठवण्याबाबत जाग आलेली नाही. त्यामुळे वारंवार तोंडी आणि त्यानंतर लेखी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आता मार्च संपण्यापूर्वी ही बिले सादर न झाल्यास झालेला खर्च मिळण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे आता या खर्चाची बिले ज्या उपविभागीय कार्यालयांकडून येणार नाहीत, त्यांचा खर्च न मिळाल्यास ती जबाबदारी संबंधित कार्यालयावर राहील, अशी शेवटची नोटीस आता निवडणूक शाखेकडून पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (प्रतिनिधी)