शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंपाचे ११९८ प्रस्ताव प्रलंबित

By admin | Updated: February 8, 2016 00:28 IST

रत्नागिरी जिल्हा : वर्षभरात वीजपुरवठा

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे महावितरणकडे ११९८ शेतीपंपांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. जानेवारीमध्ये ४९८ शेतीपंप कनेक्शन देण्यात आली आहेत. वर्षभरात प्रलंबित पंपांना वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी दिली.जिल्ह्यात एकूण १६ हजार कृषीपंप आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी दौऱ्यावेळी कृषीपंप वाढवण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार ३००० नवीन कृषीपंप कनेक्शन देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ज्याठिकाणी पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे. तेथे कृषीपंप देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.जिल्ह्यात १७ उपविभाग असून, दरमहा प्रत्येक विभागाला दहा मिळून जिल्ह्यात दरमहा ३५० ते ४०० कृषीपंप कनेक्शन देण्यात येणार आहेत. वर्षभरात प्रलंबित वीज प्रस्तावही पूर्ण करण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यांमध्ये वसला आहे. फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात कलमबाग लागवडीला चालना मिळाली आहे. डोंगरउतारावर बागायती लागवड करण्यात आली आहे. डोंगरउतारावरील या बागायतींसाठी पाण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी शासकीय अनुदान देण्यात येते. परंतु, डोंगरातील, कातळावरील वीज कनेक्शन देण्यासाठी ठेकेदार उपलब्ध होत नव्हते. परिणामी वीज कनेक्शन देण्यास उशीर होत होता. कातळ फोडण्यासाठीही खूप अवधी लागायचा, तसेच खर्चिक बाबीमुळे ठेकेदारांचा प्रतिसादही अल्प होता. त्यामुळे ही वीज कनेक्शन प्रलंबित राहिली होती. मात्र, ऊर्जामंत्री यांनी कृषीपंप कनेक्शन वाढवण्यासाठी हिरवा कंदील दिल्यामुळे प्रलंबित कनेक्शन महावितरणकडून प्राधान्याने देण्यात येणार आहेत. तसेच नवीन कनेक्शनसाठीही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मागणीत वाढ : पावसाचे प्रमाण कमीरत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने नदीवर किंवा ओढ्यावर कृषीपंप लावून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. महावितरणकडून कृषीपंपासाठी सवलत मिळत असल्याने कृषीपंपाची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे कृषीपंपाची संख्या वाढत आहे.थकबाकी कमीरत्नागिरी जिल्ह्यात महावितरणच्या थकबाकीचे प्रमाण खूपच कमी आहे. याठिकाणी वसुलीचेही प्रमाण चांगले असल्याचे दिसून येत आहे.