शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक आरोग्य सेवेचा गैरवापर

By admin | Updated: November 11, 2015 00:14 IST

कटू सत्य : सधन रूग्णांकडून मोफत रूग्णवाहिकेसाठी वेगळीच क्लुप्ती

राजेंद्र यादव -- रत्नागिरी -जिल्हा शासकीय रूग्णालयात दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने आतापर्यंत जिल्हाभरामध्ये हजारो रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. मात्र, त्या अत्यावश्यक सेवेचा गैरवापर केला जात असल्याचे दिसत आहे. खासगी रुग्णालयातून केवळ मोठ्या शहरात रुग्णाला नेण्यासाठी या रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे ही अत्यावश्यक सेवा नेमकी कोणासाठी आहे? असा सवाल केला जात आहे.दि. १९ मे २०१४ रोजी मोठा गाजावाजा करीत शासनाने रत्नागिरी जिल्ह्याकरिता एक रुग्णवाहिका आरोग्य सेवेत दाखल केली. १0८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ती रूग्णवाहिका तत्काळ रूग्ण जिथे असेल तिथे जाऊन सेवा देते. प्रारंभी १०८ क्रमांकावर फोन केल्यानंतर १५ मिनिटांत दाखल होणाऱ्या या रुग्णवाहिकेला आता शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणाहून मुंबई - पुणे अथवा कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरातील रुग्णालयामध्ये अधिक उपचाराकरिता रुग्ण घेऊन जावे लागते. अशावेळी ही रुग्णवाहिका बराच काळ मुख्य ठिकाणापासून बाहेर राहते. अशावेळी एखादी घटना घडल्यास घटनास्थळी पोहोचण्याकरिता इतर ठिकाणावरील रुग्णवाहिकेला पाचारण करावे लागते. परिणामी योजनेचे उद्दिष्ट सफल होत नाही, असे निदर्शनास येऊ लागले आहे.सधन रुग्ण उपचाराकरिता खासगी रुग्णालयामध्ये दाखल होतात. मात्र, त्यांना अधिक उपचाराकरिता मुंबई, पुणे अथवा कोल्हापूरकरिता जायचे असल्यास केवळ रूग्णवाहिकेचा खर्च टाळण्यासाठी हे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होतात. दाखल झाल्यापासून अवघ्या काही मिनिटामध्ये या रुग्णसेवेचा लाभ घेतात व खासगी रुग्णवाहिकेला मोजावे लागणारे पैसे हे लोक वाचवतात. मोठ्या शहरामधील शासकीय रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल करतात व थोड्याचवेळात तो तेथील खासगी रुग्णालयामध्ये हलवला जातो. सधन रुग्णांनी १०८ रुग्णवाहिकेचा लाभ घेणे हे उचित आहे काय? असा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे.१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकारी व चालक यांना भत्ता मिळत नसल्याने ते गरीब रुग्णांना मुंबई अथवा पुणे या ठिकाणी रुग्णवाहिकेतून थेट नेण्याकरिता टाळाटाळ करतात. अशावेळी मुंबईकरिता जाण्यासाठी ठराविक अंतराने दोन ते तीन ठिकाणी राष्ट्रीय रूग्णवाहिका सेवेच्या रुग्णवाहिका बदलल्या जातात. हे रुग्णांच्या जीवितासाठी योग्य आहे काय? मात्र श्रीमंत रुग्णासाठी हेच वैद्यकीय अधिकारी व चालक थेट मुंबई वा पुण्यापर्यंत जाण्यास तयार असतात. अशावेळी त्यांना भत्ता कोण देतो? किंवा त्यावेळी त्यांना मुंबईत जाणे कसे परवडते, असा प्रश्नही केला जात आहे.अपघातग्रस्त किंवा गरीब, गरजू रूग्णांसाठीच्या रुग्णवाहिकेचा गैरवापर करण्याचा सल्ला काही खासगी रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच दिला जात असल्याची माहितीही पुढे आली आहे. मुंबईसाठी खासगी रूग्णवाहिका १0 ते १५ हजार इतका दर आकारतात, हे पैसे वाचवण्यासाठी ही क्लुप्ती लढवली जात आहे.सेवा कोणासाठी? : रूग्ण जिल्ह्याबाहेर नेण्यासाठीच वापर जास्तरूग्णवाहिकेने वाचविले हजारोंचे प्राण.१५ मिनिटात रूग्णवाहिका दाखल होते. मुख्य ठिकाणापासून रूग्णवाहिका दूर राहात आहे. १०८ सेवेचा लाभ केवळ खासगी रूग्णवाहिकांचा खर्च वाचवण्यासाठीच होत आहे.१०८ रूग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकारी व चालकांना भत्ता मिळत नसल्याने गरीब रूग्णांना कोल्हापूर, पुणे येथे नेण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत.मुंबईला जाण्यासाठी ठराविक अंतराने दोन ते तीन ठिकाणी १०८ रूग्णवाहिका बदलल्या जातात. त्यामुळे रूग्णांचे हाल होताना दिसत आहेत, याला जबाबदार कोण?