शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
5
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
6
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
8
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
9
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
10
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
11
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
12
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
13
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
14
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
15
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
16
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
17
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
18
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
19
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
20
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग

योजनांची ७८९ कामे अद्याप अपूर्ण

By admin | Updated: July 19, 2015 23:35 IST

पाणीपुरवठा विभाग : १० कोटी रुपये पडून

रत्नागिरी : मागील चार वर्षांपासून राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाच्या ७८९ योजना आर्थिकदृष्ट्या अपूर्ण आहेत. या योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेली असली तरी या कार्यक्रमाचे १० कोटी रुपये अजूनही जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडे पडून आहेत.केंद्र शासनाने भारत निर्माण कार्यक्रमाचे नामकरण राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम असे केले़ या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्या आणि तांडे यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना राबविण्यात आल्या़मात्र त्यानंतरही पाणीटंचाई म्हणावी तशी दूर झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे या विविध योजनांची फलनिष्पत्ती काय? असा सवाल केला जात आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनांमुळे शेकडो वाड्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. योजनांची कामे पूर्ण झालेली असली तरी त्या योजनांच्या आर्थिक बाबी अजूनही अपूर्ण आहेत. या योजनांचा आढावा जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी ताबडतोब आर्थिक व्यवहार अपूर्ण असलेल्या योजना पूर्ण करण्याची सूचना देऊन अहवाल सादर करण्यास अधिकाऱ्यांना आदेश दिले. अध्यक्ष राजापकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर तालुक्याचे अधिकारी कामाला लागले आहेत. या कार्यक्रमाचे पाणी पुरवठा विभागाकडे १० कोटी रुपये अजूनही अखर्चित आहेत. हा निधी खर्च झाल्याशिवाय केंद्र शासनाकडून अन्य योजनांसाठीचा निधी मिळणार नाही. त्यामुळे हा निधी खर्ची कसा करणार? या विवंचनेत पाणीपुरवठा विभाग अडकला आहे. (शहर वार्ताहर)योजनांची तालुकानिहाय संख्यातालुकावाड्या चिपळूण१२७दापोली८१गुहागर५२खेड८१लांजा४८मंडणगड२५राजापूर७३रत्नागिरी६२संगमेश्वर१८९एकूण७८९