शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

येरळा, माणगंगा नद्यांचाही नदीजोड प्रकल्पात समावेश व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST

वडूज : कृष्णा-भीमा स्थिरीकरण बोगदा व शेतकरी तसेच सर्वसामान्य ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा ...

वडूज : कृष्णा-भीमा स्थिरीकरण बोगदा व शेतकरी तसेच सर्वसामान्य ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला, तर येरळा व माणगंगा या दोन नद्यांचाही नदीजोड प्रकल्पात समावेश व्हावा, अशी भूमिका माजी

आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

यावेळी माजी सरपंच अंकुश दबडे, डॉ. हेमंत पेठे, जीवन पुकळे, प्रा. अजय शेटे, अशोक काळे, सुरेश माने, सुयोग शेटे, बापूराव काळे उपस्थित होते.

डॉ. येळगावकर म्हणाले की, ‘नदी जोड प्रकल्पांतर्गत कृष्णा-नीरा-भीमा स्थिरीकरण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा व तिच्या उपनद्यांचे पाणी मराठवाड्यात नेण्याचा सर्वपक्षीय प्रस्थापित राजकारण्यांचा घाट आहे. नदीजोड प्रकल्प हा अत्यंत चांगला प्रकल्प आहे. या माध्यमातून कर्नाटक व अन्य राज्यांत पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडविण्यात येणार आहे; मात्र मराठवाड्यातील नद्या जोडत असताना खटाव तालुक्यातील येरळा व माण तालुक्यातील माणगंगा या दोन नद्या कोरड्या ठेवणे ही दुर्दैवी बाब आहे. तालुक्याला संजीवनी ठरणाऱ्या उरमोडी, जिहे-कठापूर, टेंभू, तारळी योजनादेखील वाहून जाणाऱ्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या योजना आहेत. त्यामुळे वाहून जाणारेच पाणी या बोगद्याने गेल्यास तालुक्याचे वाळवंटच होणार आहे. शिवाय कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचा बोगदा खटाव-माण तालुक्यांतून जाणार आहे. त्यामुळे दोन्ही तालुके पाण्यासाठी अडचणीत येण्याची अधिक शक्यता आहे. मराठवाड्याला पाणी नेण्यास आमचा विरोध नाही. मात्र हे पाणी बोगद्याद्वारे न नेता जमिनीवरून भुईपाठाने नेण्यात यावे. येरळा व माणगंगा या दोन नद्यांचाही नदीजोड प्रकल्पात समावेश व्हावा, अशी आपली आग्रही मागणी आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे माजी खासदार (कै.) हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केल्यानेच प्रकल्पाचे काम थांबले होते. आता आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकलूजच्या मोहिते-पाटील यांनी नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे भूत पुन्हा जनतेच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी त्यांच्या दबावाला बळी पडून या प्रकल्पाला पाठिंबा देऊ नये. पाठिंबा देण्यापूर्वी त्यांनी आपल्या वडिलांची भूमिका, पाणी प्रश्नावर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांची मते आजमावून घ्यावीत. त्याचबरोबर त्यांच्या खासदारकीमध्ये खटाव-माण तालुक्यांच्या मतांचाही मोठा वाटा आहे, हे देखील त्यांनी लक्षात घ्यावे.

वाढत्या वीज बिलांच्या समस्येवर बोलताना डॉ. येळगावकर म्हणाले, ‘‘गेली काही वर्षे कधी ओला तर कधी सुक्या दुष्काळामुळे खटाव-माण तालुक्यांतील शेतकरी हैराण आहेत. या काळात विजेचा वापर अत्यंत कमी झाला आहे. कोरोना काळातील गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे उद्योग व्यावसायिकही हैराण आहेत. अशा परिस्थितीत सर्वच ग्राहक मेटाकुटीला आले असताना एकदम चार-पाच वर्षांची वीज बिले सक्तीने वसूल करणे अत्यंत चुकीचे आहे. वीज कंपनीच्या या अन्यायकारक धोरणाविरुद्ध आपण जनमत संघटित करणार आहोत. या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाणार आहे.