शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

टिळकांनी स्वराज्याचा पाया घातला तर गांधींनी कळस चढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

कऱ्हाड : ‘ब्रिटिशांनी भारताचे जेवढे शोषण केले तेवढे शोषण कुठल्याच देशाचे झालेले नाही. हे ओळखलेल्या टिळकांना पहिल्यांदा स्वातंत्र्य हवे ...

कऱ्हाड : ‘ब्रिटिशांनी भारताचे जेवढे शोषण केले तेवढे शोषण कुठल्याच देशाचे झालेले नाही. हे ओळखलेल्या टिळकांना पहिल्यांदा स्वातंत्र्य हवे होते. मात्र, त्यांनी स्वातंत्र्य हा शब्द न वापरता ‘स्वराज्य’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला. लोकांच्यात ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष तयार केला. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा पाया रचला, तर महात्मा गांधींनी त्यावर कळस चढविला असे म्हणावे लागते,’ असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

कऱ्हाड येथे दादा उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने ‘लोकमान्य टिळक’ या मराठी अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोरे बोलत होते. विनोद शिरसाठ, रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील, प्रा. गणपतराव कणसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. डॉ. मोरे म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांनी इथल्या जनतेला ब्रिटिशांची शोषकवृत्ती पटवून दिली. स्वराज्याची सर सुराज्याला येत नाही. तेही सांगितले. हे सर्व जनतेला पटल्यावर बहिष्काराचे अस्त्र त्यांनी त्यांच्या हातामध्ये दिले. पुढे महात्मा गांधीजींनी त्याचा चांगला वापर केला. म्हणूनच स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा मार्ग सापडत गेला. खरंतर काँग्रेसच्या स्थापनेनंतर स्वातंत्र्य म्हणजे काय? कोणाचे स्वातंत्र्य? कशाचे स्वातंत्र्य? कोणासाठी स्वातंत्र्य? या चर्चा सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात ब्रिटिशांनी शाळा, कॉलेज, रस्ते, रेल्वे आदी सुधारणा केल्या होत्या. त्या जरी त्यांनी त्यांच्या सोयीसाठी केल्या असल्या तरी त्याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीयांना झाला होता. भारतीय शहाणे व्हायला लागले होते.’

विनोद शिरसाठ म्हणाले, ‘ग. प्र. प्रधान व ए. के. भागवत यांनी त्या काळात लोकमान्य टिळकांवर इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले चरित्र आज मराठीत अनुवादित करण्यात आले आहे. याचा अभ्यासकांना नक्कीच फायदा होईल.’

ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, ‘ दादा उंडाळकर स्मारक समिती नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असते. दिवंगत विलासराव पाटील यांनी घालून दिलेल्या मार्गाने आमची वाटचाल सुरू असून, यापुढील काळात ती कायम राहील.’ कार्यक्रमाचे राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो आहे..

कऱ्हाड येथील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना प्रा डाॅ. सदानंद मोरे, व्यासपीठावर गणपतराव कणसे, विनोद शिरसाठ, ॲड. उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते.