शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

टिळकांनी स्वराज्याचा पाया घातला तर गांधींनी कळस चढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

कऱ्हाड : ‘ब्रिटिशांनी भारताचे जेवढे शोषण केले तेवढे शोषण कुठल्याच देशाचे झालेले नाही. हे ओळखलेल्या टिळकांना पहिल्यांदा स्वातंत्र्य हवे ...

कऱ्हाड : ‘ब्रिटिशांनी भारताचे जेवढे शोषण केले तेवढे शोषण कुठल्याच देशाचे झालेले नाही. हे ओळखलेल्या टिळकांना पहिल्यांदा स्वातंत्र्य हवे होते. मात्र, त्यांनी स्वातंत्र्य हा शब्द न वापरता ‘स्वराज्य’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला. लोकांच्यात ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष तयार केला. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा पाया रचला, तर महात्मा गांधींनी त्यावर कळस चढविला असे म्हणावे लागते,’ असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

कऱ्हाड येथे दादा उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने ‘लोकमान्य टिळक’ या मराठी अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोरे बोलत होते. विनोद शिरसाठ, रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील, प्रा. गणपतराव कणसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. डॉ. मोरे म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांनी इथल्या जनतेला ब्रिटिशांची शोषकवृत्ती पटवून दिली. स्वराज्याची सर सुराज्याला येत नाही. तेही सांगितले. हे सर्व जनतेला पटल्यावर बहिष्काराचे अस्त्र त्यांनी त्यांच्या हातामध्ये दिले. पुढे महात्मा गांधीजींनी त्याचा चांगला वापर केला. म्हणूनच स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा मार्ग सापडत गेला. खरंतर काँग्रेसच्या स्थापनेनंतर स्वातंत्र्य म्हणजे काय? कोणाचे स्वातंत्र्य? कशाचे स्वातंत्र्य? कोणासाठी स्वातंत्र्य? या चर्चा सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात ब्रिटिशांनी शाळा, कॉलेज, रस्ते, रेल्वे आदी सुधारणा केल्या होत्या. त्या जरी त्यांनी त्यांच्या सोयीसाठी केल्या असल्या तरी त्याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीयांना झाला होता. भारतीय शहाणे व्हायला लागले होते.’

विनोद शिरसाठ म्हणाले, ‘ग. प्र. प्रधान व ए. के. भागवत यांनी त्या काळात लोकमान्य टिळकांवर इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले चरित्र आज मराठीत अनुवादित करण्यात आले आहे. याचा अभ्यासकांना नक्कीच फायदा होईल.’

ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, ‘ दादा उंडाळकर स्मारक समिती नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असते. दिवंगत विलासराव पाटील यांनी घालून दिलेल्या मार्गाने आमची वाटचाल सुरू असून, यापुढील काळात ती कायम राहील.’ कार्यक्रमाचे राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो आहे..

कऱ्हाड येथील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना प्रा डाॅ. सदानंद मोरे, व्यासपीठावर गणपतराव कणसे, विनोद शिरसाठ, ॲड. उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते.