शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या तालुक्यात पाणीटंचाई !

By admin | Updated: May 18, 2016 00:06 IST

५२ गावे, ५०५ वाड्या-वस्त्यांवर समस्या : माणमध्ये तलाव कोरडे, चाऱ्याचा प्रश्नही गंभीर

अर्ध्या तालुक्यात पाणीटंचाई !५२ गावे, ५०५ वाड्या-वस्त्यांवर समस्या : माणमध्ये तलाव कोरडे, चाऱ्याचा प्रश्नही गंभीरनवनाथ जगदाळे ल्ल दहिवडीदुष्काळी माण तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील ५२ गावे व ५०५ वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. खासगी ५६ व सरकारी ३ असे ५९ टँकरद्वारे दररोज १६२ खेपा करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. मात्र, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने सध्या तरी ८२ खेपा होताना दिसत आहेत. माण तालुक्यातील लोधवडे वगळता गंगोती, महाबळेश्वरवाडी, ढाकणी, आंधळी, राणंद या मुख्य तलावात मृत साठा राहिला आहे. ब्रिटिशकालीन पिंगळी तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे. तालुक्यातील विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे दिवसभर पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे.जवळपास १८ ठिकाणी खासगी विहिरींचे पाणी अधिग्रहण करण्यात आले असून, तालुक्यातील ८७,७१३ लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नव्याने मोगराळे, राणंद, पुकळेवाडी या गावाचे प्रस्ताव आले आहेत. मे महिन्यात यापुढे पाण्याची भीषणता आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेखर गोरे प्रतिष्ठानचे ८ टँकर शासनाच्या मदतीला मोफत पाणीपुरवठा करीत आहेत. तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वर्षी तेलकट रोगाने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले होते. तर चालूवर्षी दुष्काळ असल्याने डाळिंब बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न तर याहूनही गंभीर आहे. १५ दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. असा शासनाचा अहवाल असतानाही संबंधित कोणतीच पावले उचलताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे एकही छावणीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल झालेला नाही. गेल्या वेळीचा इतिहास पाहता छावणी चालकही पुढे येत नाहीत. कडब्याची १ पेंडी ३० ते ४० रुपये, उसाची मोळी १०० रुपये तर ओली मका ४ ते ५ रुपये किलोने मिळत आहे. तालुक्यातील ३५,९२२ जनावरांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तब्बल १९ गावांतील जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. २२ विहिरीचे अधिग्रहण केले आहे. शेळ्या-मेंढ्याचा प्रश्नही गंभीर आहे. दिवसभर वणवण भटकूनही चारा मिळत नाही. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नसल्याने मेंढपाळ मैलोनमैल पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. तालुक्यात जलयुक्तच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रुंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणीची कामे सुरू असली तरी यंत्राच्या साह्याने कामे सुरू आहेत. रोजगार हमीची कामे सुरू होण्याची गरज आहे. मजुरांसाठी काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.त्याचबरोबर माण तालुक्यातील शिंगणापूर, महिमानगड, दहिवडी, म्हसवड प्राधिकरण योजना नियमित सुरू राहण्याची गरज आहे. तरच पाणीटंचाई जाणवणार नाही.नेहमीचीच समस्यामाण तालुका दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. दर चार-पाच वर्षांनी तालुक्यात दुष्काळ हा ठरलेलाच आहे. त्यामुळे येथील लोकांना स्थलांतराशिवाय पर्याय राहत नाही. गेल्यावर्षीही तालुक्यात पाऊस कमी झाला. त्यामुळे तलावात पाणीसाठा कमी झाला. परिणामी पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न जानेवारी महिन्यापासूनच निर्माण झाला होता. विशेष म्हणजे गेल्यावर्षी दिवाळीनंतरच तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक गावांना शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यानंतर पाण्याची समस्या आणखी तीव्र होत गेली. आतातर अर्धा तालुका पाणीटंचाईच्या समस्येशी सामना करीत आहे. अशा समस्यांना तोंड देण्यासाठी पाणी योजना पूर्ण होण्याची गरज आहे.