शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या तालुक्यात पाणीटंचाई !

By admin | Updated: May 18, 2016 00:06 IST

५२ गावे, ५०५ वाड्या-वस्त्यांवर समस्या : माणमध्ये तलाव कोरडे, चाऱ्याचा प्रश्नही गंभीर

अर्ध्या तालुक्यात पाणीटंचाई !५२ गावे, ५०५ वाड्या-वस्त्यांवर समस्या : माणमध्ये तलाव कोरडे, चाऱ्याचा प्रश्नही गंभीरनवनाथ जगदाळे ल्ल दहिवडीदुष्काळी माण तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील ५२ गावे व ५०५ वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. खासगी ५६ व सरकारी ३ असे ५९ टँकरद्वारे दररोज १६२ खेपा करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. मात्र, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने सध्या तरी ८२ खेपा होताना दिसत आहेत. माण तालुक्यातील लोधवडे वगळता गंगोती, महाबळेश्वरवाडी, ढाकणी, आंधळी, राणंद या मुख्य तलावात मृत साठा राहिला आहे. ब्रिटिशकालीन पिंगळी तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे. तालुक्यातील विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे दिवसभर पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे.जवळपास १८ ठिकाणी खासगी विहिरींचे पाणी अधिग्रहण करण्यात आले असून, तालुक्यातील ८७,७१३ लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नव्याने मोगराळे, राणंद, पुकळेवाडी या गावाचे प्रस्ताव आले आहेत. मे महिन्यात यापुढे पाण्याची भीषणता आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेखर गोरे प्रतिष्ठानचे ८ टँकर शासनाच्या मदतीला मोफत पाणीपुरवठा करीत आहेत. तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वर्षी तेलकट रोगाने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले होते. तर चालूवर्षी दुष्काळ असल्याने डाळिंब बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न तर याहूनही गंभीर आहे. १५ दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. असा शासनाचा अहवाल असतानाही संबंधित कोणतीच पावले उचलताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे एकही छावणीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल झालेला नाही. गेल्या वेळीचा इतिहास पाहता छावणी चालकही पुढे येत नाहीत. कडब्याची १ पेंडी ३० ते ४० रुपये, उसाची मोळी १०० रुपये तर ओली मका ४ ते ५ रुपये किलोने मिळत आहे. तालुक्यातील ३५,९२२ जनावरांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तब्बल १९ गावांतील जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. २२ विहिरीचे अधिग्रहण केले आहे. शेळ्या-मेंढ्याचा प्रश्नही गंभीर आहे. दिवसभर वणवण भटकूनही चारा मिळत नाही. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नसल्याने मेंढपाळ मैलोनमैल पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. तालुक्यात जलयुक्तच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रुंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणीची कामे सुरू असली तरी यंत्राच्या साह्याने कामे सुरू आहेत. रोजगार हमीची कामे सुरू होण्याची गरज आहे. मजुरांसाठी काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.त्याचबरोबर माण तालुक्यातील शिंगणापूर, महिमानगड, दहिवडी, म्हसवड प्राधिकरण योजना नियमित सुरू राहण्याची गरज आहे. तरच पाणीटंचाई जाणवणार नाही.नेहमीचीच समस्यामाण तालुका दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. दर चार-पाच वर्षांनी तालुक्यात दुष्काळ हा ठरलेलाच आहे. त्यामुळे येथील लोकांना स्थलांतराशिवाय पर्याय राहत नाही. गेल्यावर्षीही तालुक्यात पाऊस कमी झाला. त्यामुळे तलावात पाणीसाठा कमी झाला. परिणामी पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न जानेवारी महिन्यापासूनच निर्माण झाला होता. विशेष म्हणजे गेल्यावर्षी दिवाळीनंतरच तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक गावांना शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यानंतर पाण्याची समस्या आणखी तीव्र होत गेली. आतातर अर्धा तालुका पाणीटंचाईच्या समस्येशी सामना करीत आहे. अशा समस्यांना तोंड देण्यासाठी पाणी योजना पूर्ण होण्याची गरज आहे.