शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

अर्ध्या तालुक्यात पाणीटंचाई !

By admin | Updated: May 18, 2016 00:06 IST

५२ गावे, ५०५ वाड्या-वस्त्यांवर समस्या : माणमध्ये तलाव कोरडे, चाऱ्याचा प्रश्नही गंभीर

अर्ध्या तालुक्यात पाणीटंचाई !५२ गावे, ५०५ वाड्या-वस्त्यांवर समस्या : माणमध्ये तलाव कोरडे, चाऱ्याचा प्रश्नही गंभीरनवनाथ जगदाळे ल्ल दहिवडीदुष्काळी माण तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील ५२ गावे व ५०५ वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. खासगी ५६ व सरकारी ३ असे ५९ टँकरद्वारे दररोज १६२ खेपा करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. मात्र, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने सध्या तरी ८२ खेपा होताना दिसत आहेत. माण तालुक्यातील लोधवडे वगळता गंगोती, महाबळेश्वरवाडी, ढाकणी, आंधळी, राणंद या मुख्य तलावात मृत साठा राहिला आहे. ब्रिटिशकालीन पिंगळी तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे. तालुक्यातील विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे दिवसभर पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे.जवळपास १८ ठिकाणी खासगी विहिरींचे पाणी अधिग्रहण करण्यात आले असून, तालुक्यातील ८७,७१३ लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नव्याने मोगराळे, राणंद, पुकळेवाडी या गावाचे प्रस्ताव आले आहेत. मे महिन्यात यापुढे पाण्याची भीषणता आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेखर गोरे प्रतिष्ठानचे ८ टँकर शासनाच्या मदतीला मोफत पाणीपुरवठा करीत आहेत. तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वर्षी तेलकट रोगाने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले होते. तर चालूवर्षी दुष्काळ असल्याने डाळिंब बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न तर याहूनही गंभीर आहे. १५ दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. असा शासनाचा अहवाल असतानाही संबंधित कोणतीच पावले उचलताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे एकही छावणीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल झालेला नाही. गेल्या वेळीचा इतिहास पाहता छावणी चालकही पुढे येत नाहीत. कडब्याची १ पेंडी ३० ते ४० रुपये, उसाची मोळी १०० रुपये तर ओली मका ४ ते ५ रुपये किलोने मिळत आहे. तालुक्यातील ३५,९२२ जनावरांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तब्बल १९ गावांतील जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. २२ विहिरीचे अधिग्रहण केले आहे. शेळ्या-मेंढ्याचा प्रश्नही गंभीर आहे. दिवसभर वणवण भटकूनही चारा मिळत नाही. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नसल्याने मेंढपाळ मैलोनमैल पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. तालुक्यात जलयुक्तच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रुंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणीची कामे सुरू असली तरी यंत्राच्या साह्याने कामे सुरू आहेत. रोजगार हमीची कामे सुरू होण्याची गरज आहे. मजुरांसाठी काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.त्याचबरोबर माण तालुक्यातील शिंगणापूर, महिमानगड, दहिवडी, म्हसवड प्राधिकरण योजना नियमित सुरू राहण्याची गरज आहे. तरच पाणीटंचाई जाणवणार नाही.नेहमीचीच समस्यामाण तालुका दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. दर चार-पाच वर्षांनी तालुक्यात दुष्काळ हा ठरलेलाच आहे. त्यामुळे येथील लोकांना स्थलांतराशिवाय पर्याय राहत नाही. गेल्यावर्षीही तालुक्यात पाऊस कमी झाला. त्यामुळे तलावात पाणीसाठा कमी झाला. परिणामी पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न जानेवारी महिन्यापासूनच निर्माण झाला होता. विशेष म्हणजे गेल्यावर्षी दिवाळीनंतरच तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक गावांना शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यानंतर पाण्याची समस्या आणखी तीव्र होत गेली. आतातर अर्धा तालुका पाणीटंचाईच्या समस्येशी सामना करीत आहे. अशा समस्यांना तोंड देण्यासाठी पाणी योजना पूर्ण होण्याची गरज आहे.