शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

चाळीस वर्षांपासून पाण्याची आस!

By admin | Updated: November 20, 2015 00:07 IST

वाई तालुक्याचा पश्चिम भाग : कृष्णेचे पाणी शिवारात येणार का?

 संजीव वरे -- वाई तालुक्यात धोम धरणाच्या निर्मितीला चाळीसहून अधिक वर्षे लोटली आहे. धरणात येथील शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. धरणामुळे राज्यातील हजारो एकर जमिनी ओलिताखाली आहे. मात्र, धरणाच्या काठावरील व शेतीपाण्यापासून वंचित असलेल्या गावातील शेतकऱ्यांची जमीन तहानलेली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने जललक्ष्मी योजनेतून पाणी देण्याची मागणी होऊ लागली आहे.वाई तालुक्याच्या पश्चिम भागात कृष्णा नदीवर धोम व बलकवडी ही दोन धरणे बांधण्यात आली. या भागात दरवर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते; परंतु यावर्षी पाऊस कमी पडल्याने बलकवडी धरण भरले. परंतु धोम धरणात सरासरी चाळीस टक्केच पाणीसाठा झाला आहे. परिणामी सर्वत्र दुष्काळी व पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. धोम धरणनिर्मितीच्या वेळी धरणाच्या काठावरील व शेतीपाण्यापासून वंचित असलेल्या गावांना सहा टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला होता. व शासनाच्या वतीने जललक्ष्मी योजना करून दिली जाणार होती. या योजनेसाठी येथील जनतेने मोठा लढा दिला. यावर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट सामोरे येत आहे. जललक्ष्मी योजनेतून पाणी सोडावे ,अशी मागणी या परिसरातील शेतकरी व जनतेतून होऊ लागली आहे. त्यामुळे कृष्णेचे पाणी शिवारात पाहण्याची चाळीस वर्षांपासूनचे स्वप्त आता तरी पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या योजनेतून पाणी सोडण्याची मागणी माजी सभापती विजयसिंह नायकवडी, बाजार समितीचे संचालक दत्ता भणगे, महादेव वाडकर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र पुजारी, मालतपूरचे माजी सरपंच किसन वाडकर, दसवडीचे सुनील फणसे, कुसगावचे उपसरपंच विनायक वाडकर, आनंदराव हगवणे, सदाशिव वरे, हरिभाऊ वरे, एकसरचे माजी सरपंच रघुनाथ मालुसरे, बाळकृष्ण तरडे, पसरणीच्या उपसरपंच शुभांगी महांगडे, विलास येवले, बाजीराव महांगडे, माजी सरपंच बाबू शिर्के आदींनी आमदार मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे. ४५ कोटींचा निधी आलाया योजनेसाठी चाळीस वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर बलकवडी धरणाच्या या पाण्यात या योजनेची जलवाहिनी टाकली गेली. धोमधरणातील राखीव पाणीसाठा व बलकवडी धरणात ठेवून बंदिस्त जलवाहिनेने बलकवडी ते वाई ग्रामीण अशी सुमारे २५ किलोमीटर अंतराहून जास्त लांबून पाणी आणले गेले आहे. मकरंद पाटील या मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर ४५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. संपूर्ण सिमेंट जलवाहिनी व जागोजागी पाणी वितरणाची दारी व एअरव्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. दुष्काळी भागाला पाणी सोडणारयावर्षी महाबळेश्वर आणि धोम, बलकवडी धरण परिसरातही पाण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. त्यामुळे धोम धरणात फक्त चाळीस टक्केच पाणीसाठा झाला. गेल्या काही दिवसांत बलकवडी धरणातून धोम धरणात मोठ्या प्रमाणात सोडले आहे. त्यामुळे दुष्काळी भागाला व दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन पाणी नियोजनाच्या तयारीला लागले आहे.