शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस वर्षांपासून पाण्याची आस!

By admin | Updated: November 20, 2015 00:07 IST

वाई तालुक्याचा पश्चिम भाग : कृष्णेचे पाणी शिवारात येणार का?

 संजीव वरे -- वाई तालुक्यात धोम धरणाच्या निर्मितीला चाळीसहून अधिक वर्षे लोटली आहे. धरणात येथील शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. धरणामुळे राज्यातील हजारो एकर जमिनी ओलिताखाली आहे. मात्र, धरणाच्या काठावरील व शेतीपाण्यापासून वंचित असलेल्या गावातील शेतकऱ्यांची जमीन तहानलेली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने जललक्ष्मी योजनेतून पाणी देण्याची मागणी होऊ लागली आहे.वाई तालुक्याच्या पश्चिम भागात कृष्णा नदीवर धोम व बलकवडी ही दोन धरणे बांधण्यात आली. या भागात दरवर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते; परंतु यावर्षी पाऊस कमी पडल्याने बलकवडी धरण भरले. परंतु धोम धरणात सरासरी चाळीस टक्केच पाणीसाठा झाला आहे. परिणामी सर्वत्र दुष्काळी व पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. धोम धरणनिर्मितीच्या वेळी धरणाच्या काठावरील व शेतीपाण्यापासून वंचित असलेल्या गावांना सहा टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला होता. व शासनाच्या वतीने जललक्ष्मी योजना करून दिली जाणार होती. या योजनेसाठी येथील जनतेने मोठा लढा दिला. यावर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट सामोरे येत आहे. जललक्ष्मी योजनेतून पाणी सोडावे ,अशी मागणी या परिसरातील शेतकरी व जनतेतून होऊ लागली आहे. त्यामुळे कृष्णेचे पाणी शिवारात पाहण्याची चाळीस वर्षांपासूनचे स्वप्त आता तरी पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या योजनेतून पाणी सोडण्याची मागणी माजी सभापती विजयसिंह नायकवडी, बाजार समितीचे संचालक दत्ता भणगे, महादेव वाडकर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र पुजारी, मालतपूरचे माजी सरपंच किसन वाडकर, दसवडीचे सुनील फणसे, कुसगावचे उपसरपंच विनायक वाडकर, आनंदराव हगवणे, सदाशिव वरे, हरिभाऊ वरे, एकसरचे माजी सरपंच रघुनाथ मालुसरे, बाळकृष्ण तरडे, पसरणीच्या उपसरपंच शुभांगी महांगडे, विलास येवले, बाजीराव महांगडे, माजी सरपंच बाबू शिर्के आदींनी आमदार मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे. ४५ कोटींचा निधी आलाया योजनेसाठी चाळीस वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर बलकवडी धरणाच्या या पाण्यात या योजनेची जलवाहिनी टाकली गेली. धोमधरणातील राखीव पाणीसाठा व बलकवडी धरणात ठेवून बंदिस्त जलवाहिनेने बलकवडी ते वाई ग्रामीण अशी सुमारे २५ किलोमीटर अंतराहून जास्त लांबून पाणी आणले गेले आहे. मकरंद पाटील या मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर ४५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. संपूर्ण सिमेंट जलवाहिनी व जागोजागी पाणी वितरणाची दारी व एअरव्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. दुष्काळी भागाला पाणी सोडणारयावर्षी महाबळेश्वर आणि धोम, बलकवडी धरण परिसरातही पाण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. त्यामुळे धोम धरणात फक्त चाळीस टक्केच पाणीसाठा झाला. गेल्या काही दिवसांत बलकवडी धरणातून धोम धरणात मोठ्या प्रमाणात सोडले आहे. त्यामुळे दुष्काळी भागाला व दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन पाणी नियोजनाच्या तयारीला लागले आहे.