शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

वांग-मराठवाडीच्या व्हॉल्व्हला गळती

By admin | Updated: November 18, 2014 23:34 IST

पाणीसाठ्यावर परिणाम : लाभक्षेत्रातील गावांवर पाणीटंचाईचे संकट

सणबूर : वांग-मराठवाडी प्रकल्पाच्या गेट व्हॉल्व्हला गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे़ परिणामी ऐन उन्हाळ्यात जलसाठा कमी होऊन लाभक्षेत्रातील पिकांना व विविध गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हॉल्व्हची दुरूस्ती करून गळती थांबवावी, अशी मागणी लाभक्षेत्रातून होऊ लागली आहे़ तत्कालीन युती शासनाच्या प्रयत्नाने १९९७ साली वांग-मराठवाडी प्रकल्पाचा शुभारंभ झाला़ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या प्रश्नावरून सतत संघर्षाचा सामना करत व रखडत २०१२ मध्ये प्रकल्पाची पहिल्या टप्प्याची घळभरणी झाली. ०़६० टीएमसी इतका पाणीसाठा करण्यात आला; पण ५० टक्क्यांच्या वर धरणग्रस्त पुनर्वसन प्रक्रियेची वाट पाहत जाग्यावरच होते. ते जलाशयामुळे अडचणीत येऊ लागले़ आज १७ वर्षांनंतरही धरणग्रस्त पुनर्वसनापासून वंचितच आहेत़ सध्या धरणाचा व्हॉल्व्ह बंद करून पाणी अडवण्याची प्राथमिकता औपचारिकपणे प्रशासनाने पूर्ण केली आहे; पण ०़६० क्षमतेइतका पाणीसाठा जलाशयात नाही़ म्हणजेच उशिरा पाणी अडविले; पण व्हॉल्वची गळती सुरूच आहे़ त्यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते़ त्यामुळे हळूहळू पाणीपातळी घटत चालली आहे़ज्यावेळी पाण्याची नितांत गरज असते, त्यावेळी बागायती पिकासाठी व नदीकाठावर नळपाणी पुरवठा योजना राबविलेल्या गावांना पिण्यासाठी पाण्याची मागणी वाढते़ त्यातच वांग-मराठवाडी प्रकल्पाखाली पाटण तालुक्यातील ३० गावे व कऱ्हाड तालुक्यातील १६ अशी एकूण ४६ गावे आहेत. लाभक्षेत्रासाठी चार एकराचा स्लॅब लावून जमिनी काढून घेतलेल्या आहेत़ काही धरणग्रस्तांचे पुनर्वसन करून त्यांना जमिनी वाटप केले असून ते धरणग्रस्त त्या जमिनी प्रत्यक्षात करत आहेत व त्यातून उत्पन्न घेत आहेत़ मात्र जर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार नसेल तर पाण्यावरून लाभक्षेत्रातही संघर्ष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही़ (वार्ताहर)गावठाणही नाही अन् जमीनही नाहीज्या धरणग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही़ त्यांना गावठाणही नाही व जमीनही नाही़ त्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्यामुळे तीही कसता येत नाही. अशा शेतकऱ्यांनी धरणात पाणीसाठा करण्यास विरोध केला आहे़ त्याला भिऊन प्रशासन प्रकल्पात पाणी अडविण्यात टाळाटाळ व विलंब करते; पण त्यांचे पुनर्वसन करण्यास प्राधान्य देत नाही़