शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

नको नुसती मशिनरी, हवा आपुलकीचा स्पर्श

By admin | Updated: December 2, 2014 00:22 IST

कालानुरूप बदलाचा फटका : ग्रामीण भागात हवी दर्जेदार वैद्यकीय सेवा

सातारा : रात्री-अपरात्री सेवा देणारे, तपासणारे डॉक्टर हे रुग्णांना कुटुंबापेक्षा जवळचे वाटत होते. पण, कालानुरूप त्यामध्ये बदल होत गेले. गेल्या काही वर्षांत तर कट प्रॅक्टिसमुळे डॉक्टरांची प्रतिमा कुठेतरी मलीन झाल्यासारखे दिसत आहे. त्यांची प्रतिमा सुधारावी, डॉक्टर व रुग्ण यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण होण्यासाठी नको नुसती मशिनरी तर हवाय विश्वासाचा स्पर्श, अशी अपेक्षा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.वैद्यकीय व्यवसाय हा अनाधिकालापासून सुरू आहे. १९९५ पर्यंत हा एक ‘नोबल प्रोफेशन’ म्हणून ओळखला जात होता. समाजात आदराचे आणि कुटुंबामध्ये एक सदस्य म्हणून डॉक्टरांच्या शब्दाला मान दिला जात होता. त्यावेळी पदवीपेक्षा नात्याला मोठी किंमत होती; परंतु समाजात बदल घडत गेले त्याप्रमाणे वैद्यकीय व्यवसायातही बदल घडत गेले. इतर क्षेत्रात कमिशन घेत असतील तर आम्ही का नाही, असे समजून या व्यवसायातही ही भावना वाढीस लागली. याच दरम्यान समाजात दोन बदल घडून आले. डॉक्टरांना ग्राहक संरक्षक कायद्याच्या चौकटीत बांधले गेले. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर हे नाते मोडीस निघाले. रुग्ण हा ग्राहक आणि डॉक्टर हा सेवा देणारा घटक झाला. दुसरे म्हणजे, ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना मोडीत निघाली. काहीही झाले तरी आम्ही मोठ्या रुग्णालयात जाणार. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सल्लेच घेणार. या भावनेपोटी जीवा भरवशाचा असणाऱ्या फॅमिली डॉक्टरला समाज मुकला. यासंदर्भात खऱ्या अर्थाने व्यापक जनजागृती आणि बदलाचीही गरज आहे. खेडोपाडी प्रॅक्टिस करणारे, रुग्णांना दिवसरात्र आणि ऊन, वारा व पावसाची परवा न करता सेवा देणारे डॉक्टर्स कट घेतात. म्हणून त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करता येणार नाही. यामध्ये बदल घडवायचा असेल, तर शासनाने पुढे आले पाहिजे. विशेषत: ग्रामीण भागात सुविधा देणाऱ्या डॉक्टरांकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. शासनाकडून डॉक्टर, दवाखाने यांना कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात येत नाही. अशा परिस्थितीत दवाखाने सुरू करणे आणि ते चालविणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे होऊन गेलेले आहे. त्यामधूनच चुकीच्या व घातक परंपरा निर्माण होत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.जनरल प्रॅक्टिशनर हे उच्चशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर आणि समाज यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात. ग्रामीण भागातील अशिक्षित, गरीब रुग्ण असो, किंवा उच्चशिक्षित, श्रीमंत रुग्ण असो. यापैकी कोणालाही नक्की कोणत्या डॉक्टरांकडे जायचे आहे, हे माहीत नसते. कोणत्या रुग्णालयात कोणत्या सोयी आहेत, हे माहीत नसते. अशावेळी पर्याय सुचविण्याचे काम जनरल प्रॅक्टिशनरर्स करत असतात. या सूचनांचा मोबदला म्हणून कट देण्याची पद्धतही रुढ झाली. यामुळे रुग्णालयांच्या बिलामध्येही वाढ झाल्याचे दिसते. यावर योग्य पर्याय म्हणजे ‘फॅमिली डॉक्टर’ हेच आहे. या संकल्पनेचे पुनर्जीवन होणे महत्त्वाचे आहे. तसेच जनरल प्रॅक्टिशनरचा रुग्ण जेथे उपचार घेत आहे. त्याठिकाणी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा आहे. आपला रुग्ण उपचारासाठी दाखल आहे, तेथे आपली प्रॅक्टिस सोडून जाणे, तेवढा वेळ देणे अशा डॉक्टरांनाच त्यांच्या सेवेचा योग्य मोबदला देण्यास काहीही हरकत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (लोकमत टीम)समाजाचा जबाबदार घटक म्हणून डॉक्टरांनी कोणत्याही रुग्णाला अनावश्यक चाचण्या करण्याचा, हॉस्पिटल अ‍ॅडमिशन तसेच आॅपरेशन करायला लावण्याचा मोह कटाक्षाने टाळला पाहिजे. समाज जर डॉक्टरांकडे चुकीचा म्हणून बघू लागला तर अतिशय कष्टाने घेतलेल्या शिक्षणाचा नेमका किती उपयोग झाला हा प्रश्न उरतोच ?- डॉ. प्रताप गोळे