शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

एसटीवरच्या जाहिराती उतरवल्या

By admin | Updated: September 16, 2014 23:27 IST

आचारसंहिता : जबाबदारी एकाची; काम दुसऱ्याचे

जगदीश कोष्टी - सातारा -निवडणुकीची आचरसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील एसटी गाड्यांवरील शासनाच्या जाहिराती काढल्या आहेत.विधानसभेसाठी १५ आॅक्टोबरला मतदान आहे. शुक्रवारपासून (दि. १२) आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाने साधारणत: पंधरा दिवसांपूर्वीच सर्व विभागांना आचारसंहितेच्या अंमलबजावणीचे पत्र दिले आहे.दररोज लाखो लोकांचा दळणवळणाचा प्रश्न सोडविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाकडे हजारो गाड्या लोकांच्या सेवेत कार्यरत आहेत. या गाड्या महाबळेश्वर, जावळीसह पाटण तालुक्यातील दुर्गम, डोंगरी भागांबरोबरच अनेक गावांमध्ये धावतात. एसटीच्या जनसंपर्काचा फायदा घेण्यासाठी खासगी कंपन्यांबरोबर शासनानेही विविध योजनांची माहिती देणारे जाहिरात फलक एसटीवर लावले होते. सर्वसामान्यांना शासनांच्या योजनांची माहिती व्हावी, योजनांपासून कोणीही वंचित राहू नये, हा या जाहिरातीचा हेतू असला तरी एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना केलेल्या कामाचा प्रचारच होत होता.आचारसंहितेच्या काळात फलक तसेच राहिले तर आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. त्यामुळे एसटीच्या सातारा विभागाने जाहिरात लावण्याचा ठेका असलेल्या संबंधित कंपनीला हे फलक काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. तरी बरेच दिवस फलक तसेच होते.