शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात एसटीची प्रवाशांकडे पाठ !

By admin | Updated: May 15, 2015 23:38 IST

मध्यवर्ती बसस्थानक : फलाटांकडे तोंड करुन उभे करण्याच्या नियमांना चालकांकडून केराची टोपली...

सातारा : शाळा-महाविद्यालयांना लागलेल्या सुट्या, लग्नसराई यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या गावोगावच्या बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी गाड्या फलाटांकडे तोंड करुन उभ्या कराव्यात, असा नियम असतानाही सातारा मध्यवर्ती बसस्थानकात पुणे, फलटण, बारामती, सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्या प्रवाशांकडे पाठ करुन उभ्या राहत आहेत. त्यामुळे प्रवाशांची पळापळ होत आहे.राज्य परिवहन महामंडळ ‘प्रवाशांच्या सोयीसाठी’ हे ब्रीद वाक्य घेऊन काम करत असताना दैवत असलेल्या प्रवाशांची गैरसोय टाळावी म्हणून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना करत असते. यासाठी परिपत्रकेही काढल्या होतात. मात्र, त्या पत्रकांची कडक अमलबजावणी खालच्या पातळीवर केली जात नसल्याचेच उघड होत आहे.आगारातून येणाऱ्या किंवा बाहेरगावाहून येणाऱ्या गाड्या यापूर्वीही रिव्हर्समध्ये आणून फलाटावर लावल्या जात असत. मात्र, संबंधीत गाडी कोठे जाणार आहे, हे पाहण्यासाठी जेष्ठ नागरिकांना पळापळ करावी लागते. त्यातून गर्दी असल्यास धक्काबुक्की होते. यासंदर्भात प्रवासीमित्र संघटनांनी काही वर्षांपूर्वी आवाज उठविला होता. याची दखल घेऊन बसस्थानकात येणाऱ्या गाड्या फलटाकडे तोंड करुन उभ्या कराव्यात, असे परिपत्रक मध्यवर्ती कार्यालयाकडून काही वर्षांपासून निघाले होते. त्याची अंमलबजावणीही केली जात आहे.सातारा मध्यवर्ती बसस्थानकात मात्र सध्या गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. कोल्हापूर, सांगलीसह कोकणात जाणाऱ्या गाड्या नियमानुसार फलाटाकडे तोंड करुन उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे फलटावर गाड्यांची प्रतीक्षा करत थांबलेल्यांना लांबूनही गाडी कोठे जाणार आहे, याची माहिती मिळते. अन् पळापळ, चेंगराचेंगली वाचते. याच्याच उलट चित्र पुणे, बारामती, सोलापूर, महाबळेश्वर, फलटण, अहमदनगर दिशांना जाणाऱ्या वाहनांच्या बाबतीत आहे. या फलाटावर लागणाऱ्या गाड्या झुणका भाकर केंद्रापर्यंत जातात. तेथून त्या पाठीमागे घेत फलाटाकडे पाठ करुन उभ्या केल्या जात असतात. उन्हाचा त्रास होऊ नये, लहान मुलं पळापळ करु नयेत, म्हणून ज्येष्ठ नागरिक, महिला साहित्य, मुलांना घेऊन बसस्थानकात थांबलेले असतात. याच ठिकाणी एसटी पाठमोरी येऊन उभी झाल्यास कोठे जाणार आहे, हे पाहण्यासाठी उठून जावे लागत आहे. त्याठिकाणी गेल्यानंतर संबंधीत गाडी दुसरीकडेच जाणार आहे, हे समजल्यावर पुन्हा फलाटावर यावे लागत आहे. यामुळे जेष्ठ नागरिक,महिला, महाविद्यालयीन तरुणींचे हाल होत आहेत. फलटाकडे तोंड करुन वाहने उभी करण्याच्या सूचना चालकांना कराव्यात, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)यांचे झाले काय-बसस्थानकात आल्यानंतर तान्हुल्याला स्तनपान करण्यासाठी एकांत मिळत नाही. त्यामुळे भूकेमुळे बाळाला त्रास सहन करावा लागत होता. हे पाहून मातेच्या जीवाची घालमेल होत होती. यासाठी ‘हिरकनी कक्ष’ सुरू केले. मात्र, अनेक बसस्थानकात हे कक्ष नाहीत.बसस्थानकात एसटी उभी राहिल्यानंतर पुढील प्रवासाला निघण्यापूर्वी वाहकाने प्रवाशांना अभिवादन करण्याची संकल्पना आणली होती. यामध्ये वाहकाने स्वत:चे नाव सांगून एसटी बस कोठे जाणार आहे. या मार्गात कोठे-कोठे थांबणार आहे. किती वेळ थांबणार आहे, याची माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, ही योजना पंधरा दिवसही चालली नाही.एसटीला फलक नसल्यास प्रवाशांची फसगत होते. त्यामुळे कोणतीही बस फलकाशिवाय धावणार नाही, असा आदेश जारी केला होता. मात्र, आजही अनेक गाड्यांना फलक दिसत नाहीत.गळक्या गाड्या, उचकटलेले पत्रे यामुळे एसटीची प्रतीमा डागाळत आहे. त्यामुळे खराब बस दाखवा बक्षीस मिळवा, ही मोहिम राबविण्याचा महामंडळाचा विचार होता. यासाठी देण्यात येणारी बक्षिसाची रक्कम अधिकारी व चालक-वाहकाच्या पगारातून घेण्यात येणार असल्याने त्याला महामंडळातूनच विरोध झाला.यांचे झाले कायबसस्थानकात आल्यानंतर तान्हुल्याला स्तनपान करण्यासाठी एकांत मिळत नाही. त्यामुळे भूकेमुळे बाळाला त्रास सहन करावा लागत होता. हे पाहून मातेच्या जीवाची घालमेल होत होती. यासाठी ‘हिरकनी कक्ष’ सुरू केले. मात्र, अनेक बसस्थानकात हे कक्ष नाहीत.बसस्थानकात एसटी उभी राहिल्यानंतर पुढील प्रवासाला निघण्यापूर्वी वाहकाने प्रवाशांना अभिवादन करण्याची संकल्पना आणली होती. यामध्ये वाहकाने स्वत:चे नाव सांगून एसटी बस कोठे जाणार आहे. या मार्गात कोठे-कोठे थांबणार आहे. किती वेळ थांबणार आहे, याची माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, ही योजना पंधरा दिवसही चालली नाही.नव्याचे नऊ दिवस...एसटीतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. खासगी स्पर्धेला तोंड देत असताना एसटीचा प्रवासी दूर जाऊ नये यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना केल्या जातात. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता चालक-वाहकांची नसल्याचे समोर येत आहे. त्याची अंमलबजावणी काही दिवस केली जाते, त्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या,’ असे चित्र पाहायला मिळत आहे.