शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

खासगी बसमध्ये सापडला ‘आतंकवादी’!

By admin | Updated: October 9, 2015 21:50 IST

महामार्गावर ‘मॉकड्रील’चा थरार : कमांडोंनी केली प्रवाशांची सुखरूप सुटका

प्रगती जाधव-पाटील -- सातारा--निमशहरी आणि महानगर या दोन्हींचे मिश्रण सध्या साताऱ्यात बघायला मिळत आहे. जुन्या संस्कृतीचे विचार आणि महानगरांप्रमाणे आचार अशा द्वंद्वात अडकलेल्या सातारकर महिला- पुरुषांना मोठ्या प्रमाणावर चिंता आणि तणावाने ग्रासले असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. स्मृतिभ्रंशाच्या आजाराने ज्येष्ठ त्रस्त आहेत. तर जीवघेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी येथील विद्यार्थ्यांची मानसिक धडपड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.सातारकरांच्याभोवती अजूनही समाज व्यवस्थेची घट्ट चौकट आहे. येथील माणसांमध्ये भावनिक ओलावा असल्याचे दिसते. मोठ्या शहरांसारखा तुसडेपणा नसला तरीही बेफिकीर जगण्याचे धाडसही येथे पाहायला मिळत नाही. सामाजिक, कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे, हेच येथे अनेकांना ज्ञात नाही. मानसिक अस्वस्थता आणि त्याचे उपचार याविषयी फारशी जागरुकता दिसत नाही. शारीरिक तंदुरुस्तीसाठी औषधांचा डोस घेतो, त्याचप्रमाणे मनाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे वाढतोय आजारएकाकीपणा--मोठ्या शहरात नोकरीनिमित्त असणाऱ्या मुलांची वाट बघण्यात येथील अनेक घरातील ज्येष्ठांना एकाकीपणा सतावू लागला आहे. मोठ्या शहरात चुकल्यासारखे वाटणे आणि साताऱ्यात एकटे राहणे, अशा द्वंद्वात सध्या साताऱ्यातील ज्येष्ठ दिवस काढत आहेत.व्यक्त होण्यास मर्यादा‘तुला काय समजतंय’ हे वाक्य कमी अधिक प्रमाणात गृहिणींना ऐकायला मिळते. घरातील मोठ्यांनी मुलांपुढे हे वाक्य उच्चारल्यानंतर अनेक गृहिणींचे खच्चीकरण होते. त्यातून मग आपल्याला काहीच येत नाही, हा न्यूनगंड तयार होतो. त्यामुळे महिलांना व्यक्त होण्यास मर्यादा पडतात. म्हणे ठार वेडे : मानसोपचाराविषयी वाढते गैरसमजमानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे म्हणजे आपण ठार वेडे झाल्याचे लक्षण असते, असा समज अनेकांच्या मनात पक्का आहे. त्यामुळे मनातल्या मनात कुडणे, व्यक्त न होणे, मानसिक ताण नको इतका सहन करणे, या गोष्टी वाढत आहेत. मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत, हे समजल्यानंतर लोक काय म्हणतील, हा यक्षप्रश्न अनेकांना सतावत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळेच हे उपचार टाळले जात असल्याचे साताऱ्यात पाहायला मिळते.गृहिणींसाठी आर्थिक स्वातंत्र्य गरजेचे गृहिणी असणाऱ्या अनेक महिलांना आपण घरात कामासाठीच आहोत, अशी भावना निर्माण होते. पतीने कमवून आणलेले पैसे हे त्याचेच असतात, असे समीकरण पाहायला मिळते. वास्तविक कुटुंबाची जबाबदारी घेणारी म्हणून गृहिणीला थोडे आर्थिक स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. माझ्या कमाईवर तुझाही हक्क आहे, हे जाणवून देणे आवश्यक आहे.असे आहेत ताण...!मुलं : आठवी ते बारावीत असलेल्या मुलांना तंत्रज्ञान , व्हिडीओ गेम, यामुळे निर्माण होणारी तोडफोड वृत्ती.महिला : सर्वच ठिकाणी मी अव्वल असणार. सर्वांच्या इच्छा मीच पूर्ण करणार, अशी मानसिकतापुरुष : काहीही झाले तरी मी कोसळणार नाही, मी खंबीर असलं पाहिजे, ही पारंपरिक भावना.ज्येष्ठ : आता मी माझ्यापुरतं बघणार, मी परावलंबी आहे. घरातील अडगळ म्हणून स्वत:ची केलेली हेटाळणी.हे आहेत उपाय.....!१. घरातील कोणाही व्यक्तीचे वर्तन बदलले तर त्याकडे बारीक लक्ष ठेवा.२. दिवसभर मुलांबरोबर असण्यापेक्षा केवळ एक तास खास मुलांसाठी वेळ काढून त्यांच्याबरोबर त्यांचे होऊन खेळा.३. नोकरीच्यानिमित्ताने तुम्ही कुठेही बाहेर गावी राहत असला तरी पालकांच्या संपर्कात राहाच.