शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दहा तारखेपासून

By admin | Updated: April 10, 2015 00:23 IST

शिक्षण विभागाचा निर्णय : परीक्षा वेळापत्रकात केला बदल--लोकमतचा दणका

मांढरदेव : सातारा जिल्ह्यात ‘पाचवी ते आठवीपर्यंतच्या परीक्षांबाबत संभ्रमावस्था’ या सदराखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जाग आली आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन पंधरा एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता दहा एप्रिलपासून सुरू करण्याबाबतचे परिपत्रक या विभागाने काढले आहे. पाचवी ते आठवीपर्यंतच्या परीक्षा दरवर्षी १ एप्रिलला सुरू होतात. प्राथमिक शाळा वगळता माध्यमिक शाळांमध्ये या परीक्षा १ एप्रिलपासून सुरू असतात. मात्र, या परीक्षा १५ एप्रिलला घ्याव्यात,असा फतवा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढला होता. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. परीक्षेनंतर मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांकडे एकच आठवडा उपलब्ध होता. यात निकाल तयार करणे अवघड होते. विशेषत: माध्यमिक शाळांत पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्या मोठी असते. येथे अनेक अडचणी निकाल तयार करताना येणार होत्या. आरटीई कायद्यानुसार ‘ड’ श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक पूरक मार्गदर्शन करण्यासाठी परीक्षेनंतर पंधरा दिवस कालावधी उपलब्ध असणे आवश्यक असते. हा कालावधीदेखील पुरेसा उपलब्ध नव्हता, यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यातच पालक व विद्यार्थी यांचे सुटीचे वेळापत्रक पूर्ण कोलमडले होते. १५ एप्रिलला परीक्षा सुरू कराव्यात या फतव्याचे सातारा जिल्ह्यातील काही शाळांनी मान्य करून १५ एप्रिलला परीक्षा सुरू केल्या. मात्र, बऱ्याचशा शाळांनी या परीक्षा १ एप्रिल व सहा एप्रिलला सुरू केल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. या परीक्षांमध्ये एकवाक्यता असणे आवश्यक आहे. (वार्ताहर)परीक्षा पद्धतीत एकवाक्यता हवीचालू वर्षीच्या गोंधळानंतर येणाऱ्या पुढील वर्षी तरी संबंधित शिक्षण विभागाने आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांचे कामाचे दिवस व मूल्यमापन पद्धतीचा अभ्यासपूर्वक विचार करून परीक्षा पद्धतीमध्ये एकवाक्यता आणावी, अशी मागणी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.