शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दहा तारखेपासून

By admin | Updated: April 10, 2015 00:23 IST

शिक्षण विभागाचा निर्णय : परीक्षा वेळापत्रकात केला बदल--लोकमतचा दणका

मांढरदेव : सातारा जिल्ह्यात ‘पाचवी ते आठवीपर्यंतच्या परीक्षांबाबत संभ्रमावस्था’ या सदराखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जाग आली आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन पंधरा एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता दहा एप्रिलपासून सुरू करण्याबाबतचे परिपत्रक या विभागाने काढले आहे. पाचवी ते आठवीपर्यंतच्या परीक्षा दरवर्षी १ एप्रिलला सुरू होतात. प्राथमिक शाळा वगळता माध्यमिक शाळांमध्ये या परीक्षा १ एप्रिलपासून सुरू असतात. मात्र, या परीक्षा १५ एप्रिलला घ्याव्यात,असा फतवा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढला होता. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. परीक्षेनंतर मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांकडे एकच आठवडा उपलब्ध होता. यात निकाल तयार करणे अवघड होते. विशेषत: माध्यमिक शाळांत पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्या मोठी असते. येथे अनेक अडचणी निकाल तयार करताना येणार होत्या. आरटीई कायद्यानुसार ‘ड’ श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक पूरक मार्गदर्शन करण्यासाठी परीक्षेनंतर पंधरा दिवस कालावधी उपलब्ध असणे आवश्यक असते. हा कालावधीदेखील पुरेसा उपलब्ध नव्हता, यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यातच पालक व विद्यार्थी यांचे सुटीचे वेळापत्रक पूर्ण कोलमडले होते. १५ एप्रिलला परीक्षा सुरू कराव्यात या फतव्याचे सातारा जिल्ह्यातील काही शाळांनी मान्य करून १५ एप्रिलला परीक्षा सुरू केल्या. मात्र, बऱ्याचशा शाळांनी या परीक्षा १ एप्रिल व सहा एप्रिलला सुरू केल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. या परीक्षांमध्ये एकवाक्यता असणे आवश्यक आहे. (वार्ताहर)परीक्षा पद्धतीत एकवाक्यता हवीचालू वर्षीच्या गोंधळानंतर येणाऱ्या पुढील वर्षी तरी संबंधित शिक्षण विभागाने आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांचे कामाचे दिवस व मूल्यमापन पद्धतीचा अभ्यासपूर्वक विचार करून परीक्षा पद्धतीमध्ये एकवाक्यता आणावी, अशी मागणी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.