शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

संतप्त वडूजकरांचा पाण्यासाठी ठिय्या

By admin | Updated: September 23, 2014 00:10 IST

लाखो लीटर पाणी वाया : चार प्रभागांमध्ये आठवड्यापासून ठणठणाट

वडूज : ‘वडूज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक, चार, पाच व सहामध्ये आठवड्यापासून ठणठणात जाणवत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडला. याबाबत माहिती अशी की, येरळवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून वडूज परिसरात पाणीपुरवठा केला जात आहे. वडूज शहरातील जलवाहिनीला आठवड्यापासून गळती लागली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणीटंचाईची कुऱ्हाड वडूजकरांवर कोसळली आहे, ही गळती दूर करण्यातही प्रशासनाला अपयश येत आहेत. त्यामुळे पाण्याअभावी गृहिणींची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी सोमवारी (दि. २२) सकाळी वडूज ग्रामपंचायतीसमोर काही काळ ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी संबंधितांना खडेबोलही काहीनी सुनावले. ‘तांत्रिक अडचणींमुळे पाणी येत नाही,’ अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. मात्र, आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. हे लक्षात येताच सायंकाळी पाचपर्यंत पाणी येईल, असे तोंडी आश्वासन दिले. वडूज शहराची लोकसंख्या पाहता ग्रामपंचायत सर्व सुविधा देण्यास कमी पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. ग्रामपंचायत सदस्य विवेक येवले यांनी यावर तातडीने तोडगा काढण्यास सांगितले. आयलॅण्ड चौक, हुतात्मा परशुराम विद्यालय, नाथ मंदिर, खडकाचा मळा परिसर आदी मुख्य ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. या गळतीला जबाबदार कोण? असा यक्षप्रश्नही जनतेतून उमटत आहे. ग्रामपंचायत करातून पन्नास लाख वसूल होत असतानाही देखभाल दुरुस्ती करताना ग्रामपंचायतीस नाकीनऊ येत आहे. यासंदर्भात संबंधित विभागाने लक्ष घालून तहानलेल्या वडूजकरांना पाणी द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)