शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

खटावची वाळू अन शासकीय कामांचा बोजवारा

By admin | Updated: March 30, 2017 17:58 IST

इतर विभागाचा महसूल विभागाला ठेंगा...

आॅनलाईन लोकमतवडूज : येरळा नदीचा उगम खटाव तालुक्यातील मोळ-मांजरवाडी या छोट्या गावापासून झाला असला तरी प्रारंभी निखळ असे असलेले हे पात्र अनेक कारणाने दिशाहीन झाले आहे. याला अवैध वाळू उपश्याप्रमाणेच अक्रिमण हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. अवैध वाळू उपसा नेमका कोणत्या शासकीय विभागाच्या हद्दीत जरी झाला तरी महसूल विभागाचीच जबाबदारी असा पायंडा पडल्याने इतर विभाग महूसल विभागाला कोणतेही सहकार्य करत नसल्याचे या निमित्ताने पुढे येत आहे. त्यामुळे सध्यातरी इतर विभाग महसूल विभागाला ठेंगाच दाखवत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.तहसीलदार हे पद तालुक्याचे मुख्य पद असले तरी इतर अतिरिक्त कामकाजांमुळे महसूल विभागाची मूळ कार्यप्रणाली फरफटतच चालली आहे. ब्रिटिशांच्या काळापासून या पदाला अनन्य साधारण महत्त्व असून, कार्यकारी दंडाधिकारी यांची विस्तृत व्याख्या जनसामान्यांसह इतर विभागातील अधिकाऱ्यांनाही ज्ञात असणे काळाची गरज आहे. यासाठी शासनाने प्रबोधन करण्याची गरज सध्याच्या काळात भेडसावू लागली असल्याचे चित्र खटाव तालुक्यात दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींच्या आढावा बैठक, मंत्र्यांचे दौरे, टंचाईग्रस्त परिस्थिती, वरिष्ठांना वेळोवेळी तालुक्याच्या सर्व शासकीय विभागाच्या इतर माहिती देणे यासह अनेक कागदोपत्री कामकाज आहेत. तालुक्यातील कोणत्याही विभागाच्या बाबतीत एखादी घटना घडली किंवा तक्रार जरी करायची असेल तर तहसीलदार कार्यालयाचे दरवाजे सताड उघडेच. यामध्ये हलगर्जीपणा दिसला तर तहसीलदार विभागालाच जबाबदार धरले जाते, ही शोकांतिका आहे.पाटबंधारे विभागाचे येरळवाडी मध्यम प्रकल्प अंतर्गत येरळा धरणाचे क्षेत्र येत असून, सध्या याच परिसरातून वाळू माफियांनी धुडगूस सुरू केला होता. मात्र, या विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वाळू माफियाबरोबर मिलीभगत असल्याचे स्पष्ट होत आहे. वास्तविक पाहता अवैध वाळूसंदर्भात याच विभागाने तक्रार देणे क्रमप्राप्त असताना कागदीघोडे नाचवित आहेत. तर पूर्वी आम्ही लेखी पत्रव्यवहार महसूल विभागाकडे आणि पोलिस यंत्रणेकडे दिले असल्याचे सांगतिले जाते. मात्र, यावर तहसीलदारांनी कागदपत्रे दाखवा,असे म्हणताच, ह्यया खात्याचा प्रभारी म्हणून माझी नियुक्ती असून, अजून मी हजर झालेलो नाही, अशी पळवाट काढीत महसूल विभागाला असहकार्य करत असल्याचे जाणवत आहे. दोन दिवसांत तक्रार द्या, अन्यथा वरिष्ठांकडे तुमच्या खात्यासंदर्भात अहवाल देईन, असा सज्जड दम दिला. तरी आजअखेर निर्ढावलेले हे खाते महसूल विभगाला ठेंगा दाखवित असल्याचे दिसून येत आहे.नदीच्या पात्रात वाळू का असावी? यासाठी जनजागृती झाली तर या भागातील अवैध वाळू उपश्यावर अंकुश बसेल. तसेच नदीपात्राच्या कडेला असणाऱ्या गावातील लोकांनी ही राष्ट्राची संपत्ती जोपासणे ही आपली देखील नैतिक जबाबदारी ओळखून कार्यरत राहिले तरच येरळा नदी खळखळून वाळू लागेल. संभाव्य जिहे-कठापूर योजनेमधून खटाव तालुक्यातील येरळा तर माण तालुक्यातील माणगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाळू लागेल. परंतु यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.( प्रतिनिधी)