शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
4
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
5
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
6
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
7
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
8
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
9
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
10
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
11
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
12
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
13
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
14
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
15
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
16
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
17
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
18
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
19
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
20
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

सातारा : आरोग्य सांभाळा...!

By admin | Updated: September 20, 2014 00:34 IST

तापाचे रुग्ण वाढले : दवाखाने झाले फुल्ल

सातारा : सप्टेंबर महिन्यात गणपतीच्या आगमनापासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली होती. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस कमी झाला. मात्र, अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम सातारकरांच्या आरोग्यावर झालेला दिसून आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तापाचे अनेक रुग्ण आढळून आले, यात प्रामुख्याने लहानग्यांची संख्या अधिक आहे.गणपती बाप्पांच्या आगमनानंतर पावसाची संततधार सुरू झाली होती. ऊन, पाऊस आणि गारठा अशा तिन्ही ऋतूंचे टप्पे एका दिवसातच अनुभवायला मिळत होते. सकाळी ऊन, दिवसा पाऊस आणि रात्री थंडी अशा विचित्र वातावरणामुळे गेल्या काही दिवसांत आजारी पडणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली होती. सकाळी ठणठणीत बरे असणारेही दुपारी आडवे होत असल्याचे चित्र अनेक घरांमध्ये दिसत होते. घरातील छोट्यांची तर यापेक्षा वाईट अवस्था होती. दिवसभर आपल्या बाललीलांनी अवघे घर डोक्यावर घेणारे चिमुकलेही चिडीचूप झाले होते. तापाने फणफणलेल्या या चिमुकल्यांचा रडवेला चेहरा कुटुंबीयांना क्लेशकारक वाटत होता. घरातील प्रत्येकाला सूचना देऊन देऊन बेजार करणारे ज्येष्ठही अंथरूणाला खिळले आहेत. सकाळी लवकर उठून सर्वांना सूचना देत अवघ्या कुटुंबाला एका रेषेत चालायला लावणारे हे शेर ढेर झाले होते. ज्येष्ठांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना या आजाराचा सर्वाधिक त्रास झाला. सहसा कोणाचेही न ऐकणारे ज्येष्ठ वैद्यकीय सल्ल्याचे तंतोतंत पालन करून लवकर बरे होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घरातील या आजारमय वातावरणामुळे अवघे कुटुंब त्रासून गेले आहे. (प्रतिनिधी)स्थानिक प्रशासनाच्या उपाययोजनापावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून फवारणी करण्यात येते. यावर्षी पालिका आणि ग्रामपंचायत भागांमध्ये ही फवारणी झाली. ग्रामीण भागात ज्यांना बंदिस्त पाईपमधून पाणी मिळत नाही, अशा सर्वांना ‘मेडिक्लोर’चे मोफत वाटप करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही तापामुळे आजारी असलेल्या बालकांवर तातडीने उपचार करून त्यांना घरी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ग्रुग्णालय झाली हाऊसफुल्ल!ोल्या काही दिवसांपासून तापाची साथ चांगलीच वाढली आहे. त्यामुळे अबाल वृद्धांची गर्दी दवाखान्यात झाली आहे. शहरातील काही नामांकित रुग्णालयांनी तर चक्क जागा नाही म्हणून रुग्णांना अन्य दवाखान्यात जाण्याचे सल्ले दिले. तर काही रुग्णालयांनी दोन खाटांच्यामध्ये गादी टाकून रुग्णांवर उपचार केले. सकाळी लवकर नंबर लावाला तरच दुपारी नंबर येतो. त्यामुळे आजारी रुग्णांचे नातेवाईक फोनवरुनच डॉक्टरांची अपार्इंटमेंट घेताना पाहायला मिळत आहेत. १कधी नव्हे इतका पाऊस यावर्षी सातारकरांनी अनुभवला. त्यामुळे अनेक आजार मोठ्या प्रमाणावर पसरले जातात. या दिवसांत अशुध्द पाण्यामुळेही रोगराई पसरण्याची भीती असते. म्हणून पाणी उकळून पिणे आणि बाहेरील उघड्यावरील अन्न खाणे टाळले पाहिजे.- डॉ. अच्युत गोडबोले२पावसाळ्याच्या दिवसांत मुलांना खूप भूक लागते. वातावरणात बदल होत असल्यामुळे या बदलाबरोबर पुढे जाताना मुलांच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. अस्वच्छतेमुळेही मुले या दिवसात आजारी पडतात.- डॉ़ स्वाती श्रोत्री ३दमट वातावरण आणि पाण्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचा आजार होतो. त्यामुळे शक्यतो घरातील वातावरण कोरडे राहील, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या सवयीचा अवलंब होणे आवश्यक आहे. - डॉ. विकास जाधव