शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रिक्षावाल्यांच्या ‘डीजे’वर संक्रांत !

By admin | Updated: September 16, 2014 23:26 IST

पोलीस तपासणार डेसिबल : ध्वनिमर्यादा ओलांडल्यास होणार कारवाई

कऱ्हाड : शहरात हौशी रिक्षावाल्यांची संख्या कमी नाही. रिक्षाला वेगळा ‘लुक’ देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी त्यांच्याकडून नवनविन क्लुप्त्याही लढविल्या जातात. काहीजण तर प्रवाशांना आकर्षीत करण्यासाठी ‘म्युझिक सिस्टम’चा आधार घेतात. मोठमोठ्या आवाजात गाणी लाऊन महाविद्यालयीन परीसरात असे रिक्षावाले फिरतात; पण सध्या अशा रिक्षांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षातील ‘म्युझिक सिस्टम’चा मर्यादेपेक्षा जास्त आवाज सोडणाऱ्या चालकांवर पोलीस कारवाई करीत आहेत. रिक्षावाल्यांविषयी सामान्यांच्या अनेक तक्रारी असतात. सध्या आणखी एका तक्रारीची त्यामध्ये भर पडली आहे. शहरातील बहुतांश रिक्षाचालक मोठ्या आवाजात गाणी लाऊन रस्त्यावरून फिरत असल्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्या आहेत. काही दिवसांपुर्वी एका नागरीकाने अशीच एक तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली. संबंधित रिक्षाचा क्रमांकही त्या नागरीकाने पोलिसांना दिला. तक्रारीनुसार पोलिसांनी शहरातून फिरणारी ती रिक्षा अडवली. वाहतुक शाखेचे कर्मचारी संदीप घोरपडे यांनी संबंधित रिक्षा पोलीस ठाण्यामध्ये आणली. त्यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासमोर पोलीस ठाण्यातच त्या रिक्षातील ‘म्युझिक सिस्टम’ सुरू करण्यात आली. ज्यावेळी म्युझिक सिस्टम सुरू झाली त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोलिसांसह कामानिमित्त पोलीस ठाण्यात आलेल्यांना अक्षरश: कानावर हात ठेवण्याची वेळ आली. डॉल्बीलाही लाजवेल असा त्या रिक्षातील ‘म्युझिक सिस्टम’चा आवाज होता. त्यानंतर पोलिसांकडून ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली असता तो आवाज ध्वनीमर्यादेपक्षाही जास्त असल्याचे निदर्शनास आले. संबंधित रिक्षावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. वास्तविक, रिक्षांमध्ये लावण्यात येणाऱ्या गाण्यांचा आवाज हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. महाविद्यालय, बसस्थानक परीसरात अशा रिक्षा हमखास भेटतात. संबंधित रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशासह इतरांनाही त्या आवाजाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांच्यावतीने सध्या एक विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे. रिक्षातील म्युझिक सिस्टमचा मर्यादेपेक्षा जास्त आवाज सोडणाऱ्या चालकावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनाही त्याबाबत सुचना करण्यात आल्या असुन अशी रिक्षा आढळल्यास ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी करण्याचे व चालकावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)चालकाच्या एकाग्रतेवरही परिणामरिक्षामध्ये मोठ्या आवाजात गाणी लावल्याने प्रवाशासह इतरांना त्रास होताच; पण त्याहीपेक्षा चालकाला त्याचा मोठा फटका बसतो. मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे चालक रिक्षा चालविताना एकाग्र राहू शकत नाही. तसेच पाठीमागून येणाऱ्या इतर वाहनांचा हॉनही संबंधित चालकाला ऐकू येणार नाही. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चालकांनी रिक्षातील ‘म्युझिक सिस्टम’चा आवाज मर्यादीत ठेवावा, अशी सुचना पोलिसांकडून करण्यात आली आहे.