शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

लाखाच्यावर उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांच्या शिधापत्रिका होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST

प्रशासनाची मोहीम : १ फेब्रुवारीपासून प्रारंभ; एकत्रित नावे असणाऱ्या कुटुंबांना फटका लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ज्या कुटुंबांचे उत्पन्न ...

प्रशासनाची मोहीम : १ फेब्रुवारीपासून प्रारंभ; एकत्रित नावे असणाऱ्या कुटुंबांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ज्या कुटुंबांचे उत्पन्न एक लाखांवर आहे अशांच्या शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही मोहीम १ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, अनेक शिधापत्रिकाधारकांना याचा फटका बसणार आहे.

सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना रेशनवर मिळणाऱ्या धान्यावर गुजराण करणारे अनेक लोक आहेत. अनेकांच्या शिधापत्रिकांमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे आहेत. अनेकांनी अशा शिधापत्रिका वेगळ्या केलेल्या नाहीत तसेच शासनाकडूनही नव्याने शिधापत्रिका मिळत नसल्यामुळे अनेकांची नावे जुन्यात शिधापत्रिकेत राहिलेली आहेत. साहजिकच जे लोक रेशनच्या धान्यावर अवलंबून आहेत, असे लोक धान्य उचलतात आणि आपले पोट भरतात. मात्र, आता शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आधारकार्ड लिंक करून कुटुंबातील सदस्यांचे बोटाचे ठसेदेखील देण्यात आलेले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आधारकार्ड लिंक केलेले असल्याने याद्वारे कुटुंबाचे उत्पन्न समजणार आहे.

वास्तविक, या मोहिमेमुळे शिधापत्रिकेत एकत्रित कुटुंबाची नोंदणी असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना मोठा फटका बसणार आहे. शासनाने स्वतंत्र शिधापत्रिका देऊन गरजूंना धान्यापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी होत आहे.

एकूण शिधापत्रिकाधारक : ७ लाख १९ हजार १३४

पिवळे शिधापत्रिकाधारक : २८,५००

अंत्योदय कार्डधारक : ३ लाख ८६ हजार

केशरी कार्डधारक : २ लाख ४६ हजार ७७५

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती

एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा शोध जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीतर्फे घेतला जात आहे. या शोध मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती यावर देखरेख करणार आहे.

हे पुरावे आवश्यक...

रेशनवरून धान्य मिळण्यासाठी अल्प उत्पन्न गटातील व्यक्तिंना प्राधान्य आहे. त्यासाठी तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. आधारकार्ड बँकेला लिंक असल्याने तपासणीमध्ये कुटुंबाचे उत्पन्न समजणार आहे.

या कारणाने रेशनकार्ड रद्द होणार

कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असेल, निवृत्तीवेतनधारक असेल, कुटुंबाचे उत्पन्न एक लाखांच्या वर असेल तर शिधापत्रिका रद्द होणार आहे.

कोट

जे ग्राहक शिधापत्रिका अनेक दिवसांपासून वापरत नाहीत अथवा त्या ठिकाणाहून धान्य घेतले जात नाही, अशा शिधापत्रिका बंद केल्या जात आहेत. ज्या लोकांना रेशनची खऱ्या अर्थाने गरज आहे, अशा कुटुंबांना लाभ देण्यात येत आहे.

- स्नेहा किसवे-देवकाते

जिल्हा पुरवठा अधिकारी