शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

तलावातील गाळ ग्रामस्थांच्या जिवावर

By admin | Updated: September 20, 2014 00:35 IST

ढेबेवाडी विभाग : शाळकरी मुलांच्या मृत्युनंतरही प्रशासन ढिम्म, उपाययोजना करण्याची गरज

सणबूर : नाईकबा-बनपुरी, ता़ पाटण येथील पाझर तलावात बुडून काही दिवसांपूर्वी दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी अंत झाला़ या घटनेमुळे ढेबेवाडी खोरे चांगलेच हादरले़ यापूर्वीही पाझर तलावाच्या गाळात रुतल्याने बुडून काहीजणांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे तलावातील गाळ जीवावर उठल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे़ अजून किती बळी गेल्यावर शासनाचे डोळे उघडणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे़विभागातील वाल्मीक पठारावरील दरी, खोऱ्यात व माळरानावर ठिकठिकाणी शासनाच्या कृषी व वन विभागाने वनतळी, पाझर तलाव बांधले आहेत़ भूगर्भात पाणीसाठा कायम राहावा व वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने शासनाने हे तलाव बांधले आहेत़ शासनाचा हेतू चांगला आहे़ मात्र, अनेक वर्षे या पाझर तलाव अथवा वनतळ्यांची डागडुजी अथवा साफसफाई करून वाहून आलेला गाळ न काढल्यामुळे हा साठलेला गाळ आता अनेकांच्या जीवावर उठू लागला आहे़ चार वर्षांपूर्वी ऐन दिवाळीच्या सणालाच विभागातील रुवले-नेहरुवाडी येथे तलावात पोहण्यास गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा वाल्मीक पठारावरील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला होता़ मात्र, शासनाच्या संबंधित विभागाने या घटनेचा कोणताही बोध घेतला नाही़ अशातच काही दिवसांपूर्वी या चार वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली़ नाईकबानगर येथील दोन शाळकरी मुलांचा पाझर तलावातील गाळात बुडून मृत्यू झाला़ प्रसाद भालेकर व भास्कर माने अशी त्या शाळकरी मुलांची नावे असून, हे दोघेही नाईकबा-बनपुरी येथील होते़ या दोन्ही घटना उत्सवाच्या कालावधीत घडल्याने विभागात नव्हे तर संपूर्ण पाटण तालुक्यात या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे़ या दोन्ही कुटुंबातील व्यक्तींचा आक्रोश आणि किंकाळ्या हृदय हेलावून टाकणाऱ्या होत्या़ त्यामुळे अनेकांना त्यांचा आक्रोश पाहून अश्रू अनावर होत होते़ या घटनेमुळे गावच्या बाजूला असणारा पाझर तलाव हाच चिंतेचा विषय बनू लागला असून, अजून किती जणांचे बळी गेल्यानंतर शासनाला जाग येणार? असा प्रश्न केला जात आहे़ संबंधितांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या योजनेतून शासनाने पाझर तलाव बांधले़ मात्र, पाझर तलावातील गाळ काढून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे़ तलावांच्या डागडुजीनंतरच अशा दुर्दैवी घटनांना आळा बसेल़- दीपक महाडिक,ग्रामस्थ, नाईकबा-बनपुरी