शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

पवनचक्कीच्या आॅईलनं जळाली भातशेती!

By admin | Updated: August 10, 2015 21:15 IST

पाटण तालुका : शेतकऱ्यांचे नुकसान; मोरेवाडीच्या शिवारात प्रकार निदर्शनास --लोकमत विशेष

अरूण पवार- पाटण -तालुक्याच्या मोरणा परिसरात होऊ घातलेल्या पवनचक्की प्रकल्पाने शेतकऱ्यांच्या जमिनीतून अतिक्रमण करताना गुंडांचा आधार घेतला. बोगस चेक देऊन बळीराजाची बोळवण केली. एवढेच काय खंडणीचे खोटे गुन्हे लावून शेतकऱ्यांना तुरुंग दाखविले. याहीपुढे जाऊन आता शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आणण्याचे रसायन सोडले असून, पवनचक्की यार्डमध्ये उभ्या असलेल्या वाहनातील आॅईलची गळती सुरू झाल्याने परिसरातील भातशेती जळाल्याच्या घटना घडत आहेत. मोरेवाडीच्या शिवारात हा प्रकार निदर्शनास आल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.गेल्या तीन वर्षांपासून एका पवनचक्की प्रकल्पाचे वाहने थांबविण्याचे यार्ड मोरणा-गुरेघर प्रकल्पाकडे जाणाऱ्या रोडलगत आहे. याठिकाणी पवनचक्क्यांची पाती आणि इतर साहित्य उतरविले जात आहे. अजूनही तिथे काही वाहने उभी आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे सर्वत्र पाण्याचा प्रवाह आहे. पवनचक्की यार्डच्या आसपास भातशेती आहे. गेल्या काही दिवसांपासून याच पवनचक्की यार्डामधील उभ्या असलेल्या वाहनातील विषारी रसायनाची गळती सुरू झाली आहे. गळती झालेले रसायन पाण्यात मिसळले आहे. हेच पाणी शेतीला पुरविले जात असल्यामुळे तेलमिश्रित पाण्याने भातशेती करपली आहे, असा संबंधित शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यांच्या आरोपात तथ्य असून, दोघा भावांची शेती जळून गेल्यासारखी झाली आहे. भाताची रोपे वाळून गेली आहेत. या धोक्याची चर्चा मोरणा परिसरात सुरू असून शेतकरी चिंतेत आहेत. माझी स्वत:ची भातशेती पवनचक्की कंपनीच्या वाहनातील आॅईल गळतीमुळे जळून गेली आहे. याबाबत पवनचक्की कंपनीच्या प्रतिनिधीला फोन केला असता ते प्रतिसाद देत नाहीत. झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण? कंपनीने येऊन माझ्या शेतीची पाहणी करावी व मला नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा उपोषण करणार आहे.-दिलीप मोरे, शेतकरी, मोरेवाडी (पेठ शिवापूर)ता. पाटण.आॅईल गळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भातशेतीत पवनचक्की वाहनातील गळती झालेले आॅईल शिरल्याने मोरेवाडी (पेठशिवापूर) येथील दिलीप मोरे, आनंदा मोरे, विजय मोरे, हरिबा मोरे, रामचंद्र मोरे, हणमंत मोरे आदी शेतकऱ्यांची भातशेती जळून खाक झाली आहे. याबाबत कंपनीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.