शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

आता ऑक्सिजनही विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:39 IST

सातारा : भविष्यात पाणी विकत घ्यावे लागेल असे एखाद्याने म्हटले, तर लोक त्याला वेड्यात काढायचे. एवढे मुबलक पाणी आणि ...

सातारा : भविष्यात पाणी विकत घ्यावे लागेल असे एखाद्याने म्हटले, तर लोक त्याला वेड्यात काढायचे. एवढे मुबलक पाणी आणि ते कशाला विकत घ्यायचे, असे म्हटले जायचे. पण, तेच पाणी आपण स्वखुशीने विकत घेऊ लागलो. तशीच परिस्थिती आता ऑक्सिजनची झाली आहे. मुबलक प्रमाणात असलेल्या ऑक्सिजनची किंमत कधीच कळली नाही. पण, आता रुग्णालयात ऑक्सिजन विकत घ्यावा लागत असल्याने ऑक्सिजनची किती गरज आहे याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनही विकत घेऊनच फिरावे लागेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता डॉक्टर व्यक्त करत आहेत.

पाणी आणि ऑक्सिजन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ऑक्सिजनपासून पाणी तयार करायचे आणि पाण्यापासून ऑक्सिजन वेगळा करायचा. वातावरणात या दोन्ही गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. पण, शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा याची आता वानवा निर्माण झाली आहे. शुद्ध पाणी मिळत नसल्याने सध्या उपलब्ध असलेले पाणी शुद्ध करून ते विकत घ्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचीही उणीव भासू लागली आहे. जेव्हा ऑक्सिजनशिवाय जीव कासावीस होतो, त्याचवेळी ऑक्सिजनची किंमत कळते. कोरोना झालेल्या अनेक रुग्णांना सध्या ऑक्सिजनची किती आवश्यकता आहे, याची जाणीव होऊ लागली आहे. त्यांना दर दिवसाला ८ ते ९ किलो ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे. असा ऑक्सिजन एकवेळ विकत घेता येईल, पण तो ज्या उपचार पद्धतीने स्वीकारावयाचा आहे, तो शरीरात घेण्यासाठी यंत्रणा कमी पडत आहे. कधी कधी तर हा ऑक्सिजन उपलब्धच न झाल्यामुळे जीव कासावीसही होत आहे. ऑक्सिजनमुळे लोकांचा जीव जाण्याचीही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत रुग्ण बरा झाल्यानंतर, किमान एक तरी झाड लावा, असा उल्लेख डॉक्टरही औषधांच्या चिठ्ठीवर आवर्जून करत आहेत.

चौकट

पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक

पर्यावरणाचा समतोल राखला गेला नाही, तर अनेक गोष्टी चिंताजनक ठरू शकतात. दिवसेंदिवस कमी होणारी जंगले आणि पाणवठे यामुळे नैसर्गिक स्त्रोत बंद होत चालले आहेत. नैसर्गिक हवेमुळे अनेकदा बाह्य जीवाणूंचा कमी उपद्रव होतो. जर हवा कोंदट बनत असेल, तर त्याठिकाणी जीवाणू तयार होतात. यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे.

स्वच्छता आणि कचरा निर्मूलनाला प्राधान्य हवे

शहरांमध्ये कमालीची अस्वच्छता पाहायला मिळते. त्यामुळे अनेक आजारांनाही निमंत्रण दिले जाते. आजारांपासून दूर राहायचे असेल तर त्यासाठी स्वच्छतेला महत्त्व दिले पाहिजे. त्याबरोबरच शहरात होणारा कचरा उचलणे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणे यासाठीही प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. भविष्यात या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.