शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

आता ऑक्सिजनही विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:39 IST

सातारा : भविष्यात पाणी विकत घ्यावे लागेल असे एखाद्याने म्हटले, तर लोक त्याला वेड्यात काढायचे. एवढे मुबलक पाणी आणि ...

सातारा : भविष्यात पाणी विकत घ्यावे लागेल असे एखाद्याने म्हटले, तर लोक त्याला वेड्यात काढायचे. एवढे मुबलक पाणी आणि ते कशाला विकत घ्यायचे, असे म्हटले जायचे. पण, तेच पाणी आपण स्वखुशीने विकत घेऊ लागलो. तशीच परिस्थिती आता ऑक्सिजनची झाली आहे. मुबलक प्रमाणात असलेल्या ऑक्सिजनची किंमत कधीच कळली नाही. पण, आता रुग्णालयात ऑक्सिजन विकत घ्यावा लागत असल्याने ऑक्सिजनची किती गरज आहे याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनही विकत घेऊनच फिरावे लागेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता डॉक्टर व्यक्त करत आहेत.

पाणी आणि ऑक्सिजन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ऑक्सिजनपासून पाणी तयार करायचे आणि पाण्यापासून ऑक्सिजन वेगळा करायचा. वातावरणात या दोन्ही गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. पण, शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा याची आता वानवा निर्माण झाली आहे. शुद्ध पाणी मिळत नसल्याने सध्या उपलब्ध असलेले पाणी शुद्ध करून ते विकत घ्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचीही उणीव भासू लागली आहे. जेव्हा ऑक्सिजनशिवाय जीव कासावीस होतो, त्याचवेळी ऑक्सिजनची किंमत कळते. कोरोना झालेल्या अनेक रुग्णांना सध्या ऑक्सिजनची किती आवश्यकता आहे, याची जाणीव होऊ लागली आहे. त्यांना दर दिवसाला ८ ते ९ किलो ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे. असा ऑक्सिजन एकवेळ विकत घेता येईल, पण तो ज्या उपचार पद्धतीने स्वीकारावयाचा आहे, तो शरीरात घेण्यासाठी यंत्रणा कमी पडत आहे. कधी कधी तर हा ऑक्सिजन उपलब्धच न झाल्यामुळे जीव कासावीसही होत आहे. ऑक्सिजनमुळे लोकांचा जीव जाण्याचीही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत रुग्ण बरा झाल्यानंतर, किमान एक तरी झाड लावा, असा उल्लेख डॉक्टरही औषधांच्या चिठ्ठीवर आवर्जून करत आहेत.

चौकट

पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक

पर्यावरणाचा समतोल राखला गेला नाही, तर अनेक गोष्टी चिंताजनक ठरू शकतात. दिवसेंदिवस कमी होणारी जंगले आणि पाणवठे यामुळे नैसर्गिक स्त्रोत बंद होत चालले आहेत. नैसर्गिक हवेमुळे अनेकदा बाह्य जीवाणूंचा कमी उपद्रव होतो. जर हवा कोंदट बनत असेल, तर त्याठिकाणी जीवाणू तयार होतात. यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे.

स्वच्छता आणि कचरा निर्मूलनाला प्राधान्य हवे

शहरांमध्ये कमालीची अस्वच्छता पाहायला मिळते. त्यामुळे अनेक आजारांनाही निमंत्रण दिले जाते. आजारांपासून दूर राहायचे असेल तर त्यासाठी स्वच्छतेला महत्त्व दिले पाहिजे. त्याबरोबरच शहरात होणारा कचरा उचलणे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणे यासाठीही प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. भविष्यात या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.