शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

उदयनराजेंपुढे राष्ट्रवादीचे लोटांगण

By admin | Updated: September 22, 2014 00:48 IST

दबावतंत्र ठरले यशस्वी : राजे गटाला मिळाले उपाध्यक्षपद

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीवर टाकलेले दबावतंत्र अपेक्षेपेक्षा यशस्वी ठरले आणि राष्ट्रवादीला एक पाऊल मागे यावे लागले. उदयनराजेंच्या दबावतंत्रात राष्ट्रवादी पुरती घायाळ झाल्यामुळे उपाध्यक्षपद रवी साळुंखे यांना द्यावे लागले. लोकसभा निवडणुकीतील दबावतंत्रानंतर जिल्हा परिषदेतही त्यांचे दबावतंत्र यशस्वी ठरल्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर आनंद लपून राहिला नव्हता. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी रविवारी झाल्या. मात्र, तत्पूर्वी शुक्रवारी उदयनराजे समर्थकांची जलमंदिरमध्ये बैठक झाली आणि पदाधिकारी निवडीत सन्मान झालाच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. यानंतर शनिवारी राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीतही उदयनराजेंनी हाच सूर कायम ठेवत आपली मागणी पालकमंत्री शशिकांत शिंदे आणि नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर तसेच उपस्थित आमदारांच्यापुढे ठेवली. त्यांच्या मागणीमुळे राष्ट्रवादीपुढेही पेच निर्माण झाला आणि निवडीचा निर्णय रविवारीच होईल, असे यावेळी सांगण्यात आले.जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतील अनुभव आणि राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची होणारी गळचेपी उदयनराजेंनी अनुभवल्यामुळे त्यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे मंत्री शिंदे आणि रामराजेंपुढे जाहीर केले होते.रविवारी दुपारी बारा वाजता नावे जाहीर करण्याचा निर्णय झाला आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते राष्ट्रवादी भवनात जमले. रामराजे नाईक-निंबाळकर येण्यापूर्वीच मंत्री शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादंी भवनात नावांची घोषणा केली. अध्यक्षपदाचे नाव जाहीर झाल्यानंतर लगेचच उपाध्यक्ष म्हणून रवी साळुंखे यांच्या नावाची घोषणा झाली. दरम्यान, या निवडी एक वर्षासाठी असल्याचेही शिंदे सांगण्यास विसरले नाहीत. हवे होते सभापतिपद... मिळाले उपाध्यक्षपदउदयनराजे यांना स्वत: आणि त्यांच्या समर्थकांना जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची अपेक्षाच नव्हती. त्यांना फक्त समाजकल्याण अथवा शिक्षण समिती सभापतिपद हवे होते. परिणामी उदयनराजे गटाकडून उपाध्यक्ष नाही केले तरी शिक्षण समिती सभापतिपद तरी मिळायला हवे, असे स्पष्ट करण्यात आले होते. यासाठी रवी साळुंखे यांचे नाव पुढे करण्याचा निर्णयही झाला होता. मात्र,आपण उपाध्यक्षपदावर ठाम राहिलो, तरच आपल्याला सभापतिपद मिळेल, अशी सुप्त भूमिकाही होती. त्यातच राष्ट्रवादीने सर्वच पदांची वाटणी सव्वा-सव्वा वर्ष करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केल्यामुळे उदयनराजेंची बाजू आणखी भक्कम झाली आणि त्यांनी दबावतंत्र आणखी वाढविले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून उदयनराजेंनी राष्ट्रवादीवर जाळे टाकले आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते त्यात अलगद सापडले. परिणामी उदयनराजेंचे दबावतंत्र यशस्वी ठरले आणि सभापतिपदाऐवजी थेट उपाध्यक्षपदाची माळच रवी साळुंखे यांच्या गळ्यात पडली. (प्रतिनिधी)