शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

उदयनराजेंपुढे राष्ट्रवादीचे लोटांगण

By admin | Updated: September 22, 2014 00:48 IST

दबावतंत्र ठरले यशस्वी : राजे गटाला मिळाले उपाध्यक्षपद

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीवर टाकलेले दबावतंत्र अपेक्षेपेक्षा यशस्वी ठरले आणि राष्ट्रवादीला एक पाऊल मागे यावे लागले. उदयनराजेंच्या दबावतंत्रात राष्ट्रवादी पुरती घायाळ झाल्यामुळे उपाध्यक्षपद रवी साळुंखे यांना द्यावे लागले. लोकसभा निवडणुकीतील दबावतंत्रानंतर जिल्हा परिषदेतही त्यांचे दबावतंत्र यशस्वी ठरल्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर आनंद लपून राहिला नव्हता. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी रविवारी झाल्या. मात्र, तत्पूर्वी शुक्रवारी उदयनराजे समर्थकांची जलमंदिरमध्ये बैठक झाली आणि पदाधिकारी निवडीत सन्मान झालाच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. यानंतर शनिवारी राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीतही उदयनराजेंनी हाच सूर कायम ठेवत आपली मागणी पालकमंत्री शशिकांत शिंदे आणि नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर तसेच उपस्थित आमदारांच्यापुढे ठेवली. त्यांच्या मागणीमुळे राष्ट्रवादीपुढेही पेच निर्माण झाला आणि निवडीचा निर्णय रविवारीच होईल, असे यावेळी सांगण्यात आले.जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतील अनुभव आणि राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची होणारी गळचेपी उदयनराजेंनी अनुभवल्यामुळे त्यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे मंत्री शिंदे आणि रामराजेंपुढे जाहीर केले होते.रविवारी दुपारी बारा वाजता नावे जाहीर करण्याचा निर्णय झाला आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते राष्ट्रवादी भवनात जमले. रामराजे नाईक-निंबाळकर येण्यापूर्वीच मंत्री शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादंी भवनात नावांची घोषणा केली. अध्यक्षपदाचे नाव जाहीर झाल्यानंतर लगेचच उपाध्यक्ष म्हणून रवी साळुंखे यांच्या नावाची घोषणा झाली. दरम्यान, या निवडी एक वर्षासाठी असल्याचेही शिंदे सांगण्यास विसरले नाहीत. हवे होते सभापतिपद... मिळाले उपाध्यक्षपदउदयनराजे यांना स्वत: आणि त्यांच्या समर्थकांना जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची अपेक्षाच नव्हती. त्यांना फक्त समाजकल्याण अथवा शिक्षण समिती सभापतिपद हवे होते. परिणामी उदयनराजे गटाकडून उपाध्यक्ष नाही केले तरी शिक्षण समिती सभापतिपद तरी मिळायला हवे, असे स्पष्ट करण्यात आले होते. यासाठी रवी साळुंखे यांचे नाव पुढे करण्याचा निर्णयही झाला होता. मात्र,आपण उपाध्यक्षपदावर ठाम राहिलो, तरच आपल्याला सभापतिपद मिळेल, अशी सुप्त भूमिकाही होती. त्यातच राष्ट्रवादीने सर्वच पदांची वाटणी सव्वा-सव्वा वर्ष करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केल्यामुळे उदयनराजेंची बाजू आणखी भक्कम झाली आणि त्यांनी दबावतंत्र आणखी वाढविले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून उदयनराजेंनी राष्ट्रवादीवर जाळे टाकले आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते त्यात अलगद सापडले. परिणामी उदयनराजेंचे दबावतंत्र यशस्वी ठरले आणि सभापतिपदाऐवजी थेट उपाध्यक्षपदाची माळच रवी साळुंखे यांच्या गळ्यात पडली. (प्रतिनिधी)