शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

‘पुरस्कृत’साठी अपक्षांचं मार्केट जोरात..!

By admin | Updated: February 8, 2017 22:52 IST

सर्वच पक्षांकडून ओढाओढी सुरू : राष्ट्रवादी, काँगे्रस, भाजप, शिवसेना या पक्षांमध्ये टक्कर

सागर गुजर ल्ल सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँगे्रस, भाजप या पक्षांमध्ये अपक्षांना पुरस्कृत करून घेण्यासाठी मोठी दंगल सुरू झाली आहे. काही जागी अधिकृत उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने त्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना आपल्याकडे ओढण्यासाठी या पक्षांची चढाओढ सुरू झाली आहे. ज्या मैदानात दोन काँगे्रस लढल्या, त्याच मैदानात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप बहुजन महासंघ, राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षांनी ललकारी दिली असल्याने भलतीच रंगत वाढली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अनेकांनी स्वत:च्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. १९२ जागांसाठी २ हजार २२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेसाठी ६४ गण व १२८ गणांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. कऱ्हाड तालुक्यात त्यांची काँगे्रसशी बोलणी सुरू आहेत. राष्ट्रवादीने प्रत्येक तालुकाध्यक्षांना आघाडी करण्यासंदर्भातले अधिकार दिले असल्याने कऱ्हाडात राष्ट्रवादी-काँगे्रसची मैत्री होण्याची शक्यता आहे. भाजपने ५९ गट व ११० गणांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. बाकी ठिकाणी अपक्षांशी बोलणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्याशी काही ठिकाणी भाजपने युती केली आहे. मात्र, या उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या पत्नी हेमलता गायकवाड या यशवंतनगर गणातून निवडणूक लढत आहेत. त्यांना भाजपचा एबी फॉर्म मिळाला असल्याने त्या भाजप चिन्हावरच निवडणूक लढणार आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील गटात भाजप उमेदवाराच्या शोधात आहे. शिवसेना ५८ गट ११६ गणांत स्वत:च्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. जिथे उमेदवार मिळाले नाहीत, तिथे अपक्षांना पुरस्कृत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. १३ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. साहजिकच या दिवशी दुपारी ३ नंतर निवडणुकीचे निश्चित चित्र स्पष्ट होणार आहे. स्वाभिमानी, भारिप यांच्यासह आता रासपही रिंगणात..स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप व रासपतर्फेही ठराविक ठिकाणी उमेदवार दिले गेले आहेत. फलटण, माण, खटाव, सातारा, कऱ्हाड या तालुक्यांत आघाडी करून निवडणूक लढण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. रासप भाजपसोबत असून, फलटण तालुक्यात ३ गटांत लढणार आहे. तर भारिप बहुजन महासंघ साताऱ्यात ४ पंचायत समिती व २ जिल्हा परिषद गटात लढणार आहे. कऱ्हाडात ३ जागी, मेढ्यात एका जागी अशा एकूण १० ठिकाणी भारिपने आपले उमेदवार दिले आहेत.