शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘पुरस्कृत’साठी अपक्षांचं मार्केट जोरात..!

By admin | Updated: February 8, 2017 22:52 IST

सर्वच पक्षांकडून ओढाओढी सुरू : राष्ट्रवादी, काँगे्रस, भाजप, शिवसेना या पक्षांमध्ये टक्कर

सागर गुजर ल्ल सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँगे्रस, भाजप या पक्षांमध्ये अपक्षांना पुरस्कृत करून घेण्यासाठी मोठी दंगल सुरू झाली आहे. काही जागी अधिकृत उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने त्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना आपल्याकडे ओढण्यासाठी या पक्षांची चढाओढ सुरू झाली आहे. ज्या मैदानात दोन काँगे्रस लढल्या, त्याच मैदानात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप बहुजन महासंघ, राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षांनी ललकारी दिली असल्याने भलतीच रंगत वाढली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अनेकांनी स्वत:च्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. १९२ जागांसाठी २ हजार २२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेसाठी ६४ गण व १२८ गणांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. कऱ्हाड तालुक्यात त्यांची काँगे्रसशी बोलणी सुरू आहेत. राष्ट्रवादीने प्रत्येक तालुकाध्यक्षांना आघाडी करण्यासंदर्भातले अधिकार दिले असल्याने कऱ्हाडात राष्ट्रवादी-काँगे्रसची मैत्री होण्याची शक्यता आहे. भाजपने ५९ गट व ११० गणांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. बाकी ठिकाणी अपक्षांशी बोलणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्याशी काही ठिकाणी भाजपने युती केली आहे. मात्र, या उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या पत्नी हेमलता गायकवाड या यशवंतनगर गणातून निवडणूक लढत आहेत. त्यांना भाजपचा एबी फॉर्म मिळाला असल्याने त्या भाजप चिन्हावरच निवडणूक लढणार आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील गटात भाजप उमेदवाराच्या शोधात आहे. शिवसेना ५८ गट ११६ गणांत स्वत:च्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. जिथे उमेदवार मिळाले नाहीत, तिथे अपक्षांना पुरस्कृत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. १३ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. साहजिकच या दिवशी दुपारी ३ नंतर निवडणुकीचे निश्चित चित्र स्पष्ट होणार आहे. स्वाभिमानी, भारिप यांच्यासह आता रासपही रिंगणात..स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप व रासपतर्फेही ठराविक ठिकाणी उमेदवार दिले गेले आहेत. फलटण, माण, खटाव, सातारा, कऱ्हाड या तालुक्यांत आघाडी करून निवडणूक लढण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. रासप भाजपसोबत असून, फलटण तालुक्यात ३ गटांत लढणार आहे. तर भारिप बहुजन महासंघ साताऱ्यात ४ पंचायत समिती व २ जिल्हा परिषद गटात लढणार आहे. कऱ्हाडात ३ जागी, मेढ्यात एका जागी अशा एकूण १० ठिकाणी भारिपने आपले उमेदवार दिले आहेत.